<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.lokprant.com/administrator/author-1" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Lokprant RSS Feed Generator</generator>
                <title>Lokprant - Lokprant</title>
                <link>https://www.lokprant.com/author/1/rss</link>
                <description>Lokprant RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>विश्वकर्मा सुपरमार्ट गुंतवणूकदारांनो सावधान! फसवणूकप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे पुरावे सादर करण्याचे आवाहन</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>सातारा: </strong>जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा येथील 'विश्वकर्मा सुपरमार्ट सर्व्हिसेस' आणि 'विश्वकर्मा सुपरमार्ट प्रा. लि.' या कंपन्यांच्या संचालकांविरोधात पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून, सर्व गुंतवणूकदारांना आवश्यक कागदपत्रांसह हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.</p>
<p><strong>काय आहे प्रकरण?</strong></p>
<p>विश्वकर्मा सुपरमार्टच्या कोडोली (सातारा) आणि इतर शाखांमध्ये गुंतवणूक केल्यास वार्षिक १३.५ टक्के दराने परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. मात्र, या परताव्याच्या नावाखाली गुंतवणूकदारांची मोठी आर्थिक फसवणूक झाली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात कलम ४०६, ४०९, ४२०, ३४ आणि महाराष्ट्र ठेवदारांचे (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ च्या कलमांनुसार गुन्हा</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/vishwakarma-supermart-investors-cautioned-to-submit-evidence-to-financial-crimes/article-2426"><img src="https://www.lokprant.com/media/400/2025-12/360_f_315496895_ljzj4t3bmwwd7jadugam5tob6b7zgicr.jpg" alt=""></a><br /><p><strong>सातारा: </strong>जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा येथील 'विश्वकर्मा सुपरमार्ट सर्व्हिसेस' आणि 'विश्वकर्मा सुपरमार्ट प्रा. लि.' या कंपन्यांच्या संचालकांविरोधात पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून, सर्व गुंतवणूकदारांना आवश्यक कागदपत्रांसह हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.</p>
<p><strong>काय आहे प्रकरण?</strong></p>
<p>विश्वकर्मा सुपरमार्टच्या कोडोली (सातारा) आणि इतर शाखांमध्ये गुंतवणूक केल्यास वार्षिक १३.५ टक्के दराने परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. मात्र, या परताव्याच्या नावाखाली गुंतवणूकदारांची मोठी आर्थिक फसवणूक झाली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात कलम ४०६, ४०९, ४२०, ३४ आणि महाराष्ट्र ठेवदारांचे (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ च्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीत पैसे गुंतवले आहेत, त्यांनी आपली तक्रार आणि पुरावे नोंदवण्यासाठी खालील कालावधीत आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.</p>
<p>तारीख: ३ जानेवारी २०२६ ते ९ जानेवारी २०२६<br />वेळ: सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत<br />ठिकाण: आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, सातारा.</p>
<p><strong> सोबत आणायची आवश्यक कागदपत्रे:</strong></p>
<p>गुंतवणूकदारांनी खालील कागदपत्रांच्या मूळ प्रती आणि दोन छायांकित (झेरॉक्स) प्रती सोबत आणणे अनिवार्य आहे:<br />१. गुंतवणुकीचा पुरावा (मूळ ठेव पावती, प्रमाणपत्र).<br />२. ज्या बँक खात्यातून व्यवहार झाला, त्या खात्याचे स्टेटमेंट.<br />३. बँक पासबुकच्या पहिल्या पानाची स्पष्ट छायांकित प्रत.<br />४. आधार कार्ड आणि पॅन कार्ड.<br />५. जर काही परतावा (व्याज/मुद्दल) मिळाला असेल, तर त्याचे पुरावे किंवा बँक स्टेटमेंट.<br />६. बँक खात्याचे जे वारसदार असतील, त्यांचे आधार कार्ड व पॅन कार्ड.</p>
<p>     ज्या गुंतवणूकदारांनी दहीवडी पोलीस ठाणे (सातारा) किंवा वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे (पुणे) येथे आधीच तक्रार नोंदवून आपले जबाब दिले आहेत, त्यांना साताऱ्यातील कार्यालयात पुन्हा हजर राहण्याची आवश्यकता नाही.गुंतवणूकदारांची रक्कम परत मिळवण्याच्या कायदेशीर प्रक्रियेसाठी हे पुरावे अत्यंत महत्त्वाचे आहेत. तरी संबंधित सर्वांनी विहित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालय, सातारा यांच्या वतीने करण्यात आले आहे.</p>
<p> </p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/vishwakarma-supermart-investors-cautioned-to-submit-evidence-to-financial-crimes/article-2426</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/vishwakarma-supermart-investors-cautioned-to-submit-evidence-to-financial-crimes/article-2426</guid>
                <pubDate>Sun, 28 Dec 2025 15:58:22 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2025-12/360_f_315496895_ljzj4t3bmwwd7jadugam5tob6b7zgicr.jpg"                         length="31516"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Lokprant]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>बांगलादेश हिंसाचाराने हादरले: विद्यार्थी नेत्याच्या हत्येतील आरोपी भारतात पसार; मेघालय सीमेवर खळबळ</title>
                                    <description><![CDATA[<p>विद्यार्थी नेते शरीफ हादी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.<br />​ आरोपींनी बांगलादेशातील हलुआघाट सीमेचा वापर केला.<br />​ मैमनसिंगमधील घटनेमुळे अल्पसंख्याक समुदायामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/national/bangladesh-shaken-by-violence-accused-in-student-leaders-murder-in/article-2425"><img src="https://www.lokprant.com/media/400/2025-12/img_20251228_154806.jpg" alt=""></a><br /><p><strong>​ढाका/नवी दिल्ली: </strong>बांगलादेशातील अस्थिरता आणि हिंसाचाराचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या आठवड्यात झालेल्या दोन विद्यार्थी नेत्यांच्या हत्येनंतर आता या प्रकरणाला आंतरराष्ट्रीय वळण लागले आहे. या हत्येतील मुख्य आरोपी मेघालय सीमेवरून बेकायदेशीरपणे भारतात घुसल्याचा दावा ढाका महानगर पोलिसांनी (DMP) केला आहे.<br /><strong>​नेमकी घटना काय?</strong><br />​विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येचा तपास करत असताना बांगलादेश पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. अतिरिक्त आयुक्त एस.एन. नजरुल इस्लाम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, हत्येतील मुख्य आरोपी फैसल करीम मसूद आणि आलमगीर शेख हे स्थानिक साथीदारांच्या मदतीने हलुआघाट सीमा ओलांडून भारतात पळून गेले आहेत. सीमेपलीकडे एका व्यक्तीने त्यांचे स्वागत केले आणि टॅक्सीने ते मेघालयाच्या दिशेने रवाना झाले.<br /><strong>​भारतात दोन संशयित ताब्यात?</strong><br />​मिळालेल्या अनधिकृत माहितीनुसार, या आरोपींना सीमा ओलांडण्यास मदत करणाऱ्या दोन व्यक्तींना भारतीय सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, भारतीय परराष्ट्र मंत्रालय किंवा सीमा सुरक्षा दलाने (BSF) अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.<br /><strong>​अल्पसंख्याकांवरील अत्याचाराचा उद्रेक</strong><br />​दुसरीकडे, बांगलादेशातील मैमनसिंग भागात एका हिंदू कामगाराची निर्घृण हत्या झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. २९ वर्षीय दीपू चंद्र दास या तरुणाला इस्लामी कट्टरपंथीयांच्या जमावाने झाडाला बांधून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली. १८ डिसेंबर रोजी झालेल्या या लिंचिंग प्रकरणात आतापर्यंत १२ जणांना अटक करण्यात आली आहे.<br />​<br />​ </p>]]></content:encoded>
                
                                                            <category>देश</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/national/bangladesh-shaken-by-violence-accused-in-student-leaders-murder-in/article-2425</link>
                <guid>https://www.lokprant.com/national/bangladesh-shaken-by-violence-accused-in-student-leaders-murder-in/article-2425</guid>
                <pubDate>Sun, 28 Dec 2025 15:50:52 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2025-12/img_20251228_154806.jpg"                         length="205344"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Lokprant]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>​सोलापुरात महायुतीत बिघाडी! जागावाटपावरून भाजपला डच्चू; शिंदे गट अन् अजित पवार गट आले एकत्र</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>​सोलापूर: </strong>राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले असतानाच सोलापूरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील चर्चा फिसकटली असून, आता सोलापुरात 'शिवसेना-राष्ट्रवादी (अजित पवार गट)' अशी नवी युती आकारास आली आहे. भाजपने सन्मानजनक जागा न दिल्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे शिंदे गटाचे नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी स्पष्ट केले आहे.<br /><strong>​५१-५१ चा नवा फॉर्म्युला</strong><br />​सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण १०२ जागांसाठी आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ५०-५० टक्क्यांच्या फॉर्म्युल्यानुसार निवडणूक लढवणार आहेत. या दोन्ही पक्षांत प्रत्येकी ५१ जागांवर एकमत झाले असून, सोलापूरचा महापौर देखील या युतीचाच असेल, असा विश्वास दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केला</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/in-solapur-due-to-the-failure-of-the-grand-alliance/article-2424"><img src="https://www.lokprant.com/media/400/2025-12/img_20251228_151649.jpg" alt=""></a><br /><p><strong>​सोलापूर: </strong>राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले असतानाच सोलापूरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील चर्चा फिसकटली असून, आता सोलापुरात 'शिवसेना-राष्ट्रवादी (अजित पवार गट)' अशी नवी युती आकारास आली आहे. भाजपने सन्मानजनक जागा न दिल्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे शिंदे गटाचे नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी स्पष्ट केले आहे.<br /><strong>​५१-५१ चा नवा फॉर्म्युला</strong><br />​सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण १०२ जागांसाठी आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ५०-५० टक्क्यांच्या फॉर्म्युल्यानुसार निवडणूक लढवणार आहेत. या दोन्ही पक्षांत प्रत्येकी ५१ जागांवर एकमत झाले असून, सोलापूरचा महापौर देखील या युतीचाच असेल, असा विश्वास दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.<br /><strong>​भाजपसोबत का फिस्कटले समीकरण?</strong><br />​जागावाटपाच्या चर्चेबाबत माहिती देताना माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले की, "आम्ही सुरुवातीला भाजपकडे ४२ जागांची मागणी केली होती, परंतु भाजपने केवळ ८ जागा देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर आम्ही ३० जागांचा मध्यममार्ग काढला, तरीही त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. अखेर स्वाभिमानासाठी आम्ही राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला."<br /><strong>​विकासासाठी एकत्रित पाऊल</strong><br />​राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे आणि सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात काल रात्री झालेल्या बैठकीनंतर या युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. राज्याच्या सत्तेत आम्ही सोबत आहोतच, शिवाय नगरविकास आणि अर्थ खाते आमच्याच नेत्यांकडे असल्याने सोलापूरच्या विकासाला या युतीमुळे मोठी गती मिळेल, असेही यावेळी सांगण्यात आले.<br /><strong>​महत्त्वाचे मुद्दे:</strong><br />​भाजपसोबतची युती तुटली; शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र.<br />​दोन्ही पक्ष प्रत्येकी ५१ जागांवर निवडणूक लढवणार.<br />​पुणे, पिंपरी-चिंचवडनंतर सोलापुरातही महायुतीचे गणित बिघडले.<br />​सन्मानजनक जागा न मिळाल्याने शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला जय महाराष्ट्र.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/in-solapur-due-to-the-failure-of-the-grand-alliance/article-2424</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/in-solapur-due-to-the-failure-of-the-grand-alliance/article-2424</guid>
                <pubDate>Sun, 28 Dec 2025 15:17:06 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2025-12/img_20251228_151649.jpg"                         length="114452"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Lokprant]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघात: ११ प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले, ३ गाड्यांना आग</title>
                                    <description><![CDATA[<p>      यमुना एक्सप्रेसवेवर शनिवारी रात्री उशिरा एका चालकाच्या निष्काळजीपणामुळे भीषण साखळी अपघात झाला. ओव्हरटेकिंग लेनमध्ये चालकाने अचानक ब्रेक लावल्याने एकामागोमाग एक तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या. या धडकेनंतर तिन्ही गाड्यांनी भीषण पेट घेतला, मात्र सुरक्षा रक्षकांच्या तत्परतेमुळे ११ प्रवाशांना गाड्यांमधून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.<br /><strong>​नेमकी घटना काय?</strong><br />​मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा-ग्रेटर नोएडा मार्गावर रबुपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० व्या किलोमीटरच्या मैलाच्या दगडाजवळ हा अपघात झाला. वेगात असलेल्या एका कारने अचानक ब्रेक दाबला. यामुळे मागून येणाऱ्या दोन कारची समोरील कारशी जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की काही वेळातच तिन्ही गाड्यांनी पेट घेतला.<br /><strong>​देवदूत बनून धावले सुरक्षा रक्षक</strong><br />​घटनेची माहिती मिळताच जेपी</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/national/fatal-accident-on-yamuna-expressway-11-passengers-narrowly-escaped-3/article-2423"><img src="https://www.lokprant.com/media/400/2025-12/img_20251228_150746.jpg" alt=""></a><br /><p>   यमुना एक्सप्रेसवेवर शनिवारी रात्री उशिरा एका चालकाच्या निष्काळजीपणामुळे भीषण साखळी अपघात झाला. ओव्हरटेकिंग लेनमध्ये चालकाने अचानक ब्रेक लावल्याने एकामागोमाग एक तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या. या धडकेनंतर तिन्ही गाड्यांनी भीषण पेट घेतला, मात्र सुरक्षा रक्षकांच्या तत्परतेमुळे ११ प्रवाशांना गाड्यांमधून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.<br /><strong>​नेमकी घटना काय?</strong><br />​मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा-ग्रेटर नोएडा मार्गावर रबुपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० व्या किलोमीटरच्या मैलाच्या दगडाजवळ हा अपघात झाला. वेगात असलेल्या एका कारने अचानक ब्रेक दाबला. यामुळे मागून येणाऱ्या दोन कारची समोरील कारशी जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की काही वेळातच तिन्ही गाड्यांनी पेट घेतला.<br /><strong>​देवदूत बनून धावले सुरक्षा रक्षक</strong><br />​घटनेची माहिती मिळताच जेपी इन्फ्राटेकची 'क्विक रिस्पॉन्स टीम' (QRT) रुग्णवाहिका, क्रेन आणि अग्निशमन दलासह घटनास्थळी दाखल झाली. गाड्या आगीच्या विळख्यात असतानाच या पथकाने शौर्य दाखवत खिडक्यांमधून सर्व ११ प्रवाशांना बाहेर काढले. अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांनी अथक प्रयत्नांनंतर आग विझवली, मात्र तोपर्यंत एक कार पूर्णपणे जळून खाक झाली होती.<br /><strong>​दोन प्रवासी गंभीर जखमी</strong><br />​या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने ग्रेटर नोएडा येथील कैलास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून एक्सप्रेसवेवरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>देश</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/national/fatal-accident-on-yamuna-expressway-11-passengers-narrowly-escaped-3/article-2423</link>
                <guid>https://www.lokprant.com/national/fatal-accident-on-yamuna-expressway-11-passengers-narrowly-escaped-3/article-2423</guid>
                <pubDate>Sun, 28 Dec 2025 15:09:47 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2025-12/img_20251228_150746.jpg"                         length="101653"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Lokprant]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>इतिहासात पहिल्यांदाच म्हसवड निवडणूक ठरली रक्तरंजित संघर्षाविना; API अक्षय सोनवणेंचे सर्वत्र कौतुक</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>दहिवडी: </strong>म्हसवड नगरपालिकेची निवडणूक म्हटली की डोळ्यांसमोर उभे राहायचे ते कार्यकर्त्यांमधील वाद, तुंबळ हाणामारी आणि त्यानंतर दाखल होणारे पोलिसांमधील गुन्हे. मात्र, यावेळच्या निवडणुकीने एक नवा इतिहास रचला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) अक्षय सोनवणे यांच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे आणि कडक अंमलबजावणीमुळे म्हसवडची निवडणूक अत्यंत शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पडली आहे.<br /><strong>​राजकीय संघर्षाला खाकीचा लगाम</strong><br />​म्हसवड नगर परिषदेत नामदार जयकुमार गोरे आणि विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नेहमीच टोकाचा राजकीय संघर्ष पाहायला मिळतो. या संघर्षाचे रूपांतर अनेकदा वादात होते. मात्र, अक्षय सोनवणे यांनी आपल्या कार्यकाळात कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता काम केले. त्यांनी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना सज्जड दम</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/for-the-first-time-in-history-mhaswad-elections-were-held/article-2422"><img src="https://www.lokprant.com/media/400/2025-12/img-20251129-wa0144.jpg" alt=""></a><br /><p><strong>दहिवडी: </strong>म्हसवड नगरपालिकेची निवडणूक म्हटली की डोळ्यांसमोर उभे राहायचे ते कार्यकर्त्यांमधील वाद, तुंबळ हाणामारी आणि त्यानंतर दाखल होणारे पोलिसांमधील गुन्हे. मात्र, यावेळच्या निवडणुकीने एक नवा इतिहास रचला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) अक्षय सोनवणे यांच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे आणि कडक अंमलबजावणीमुळे म्हसवडची निवडणूक अत्यंत शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पडली आहे.<br /><strong>​राजकीय संघर्षाला खाकीचा लगाम</strong><br />​म्हसवड नगर परिषदेत नामदार जयकुमार गोरे आणि विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नेहमीच टोकाचा राजकीय संघर्ष पाहायला मिळतो. या संघर्षाचे रूपांतर अनेकदा वादात होते. मात्र, अक्षय सोनवणे यांनी आपल्या कार्यकाळात कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता काम केले. त्यांनी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना सज्जड दम दिला. स्थानिक राजकारणात कोणाच्याही सांगण्यावरून हस्तक्षेप न करता, त्यांनी 'खाकी'ची ताकद आणि निष्पक्षता दाखवून दिली.<br /><strong>​३२ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई</strong><br />​निवडणूक काळात शांतता भंग होऊ नये यासाठी सोनवणे यांनी अत्यंत धाडसी निर्णय घेतले. रेकॉर्डवरील तब्बल ३२ भुरट्या गुन्हेगारांना निवडणूक काळात तडीपार करून त्यांनी गुन्हेगारी जगताचे कंबरडे मोडले. या आक्रमक पवित्र्यामुळेच निवडणुकीत कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.<br /><strong>​सातारा जिल्ह्यातील 'सर्वोत्कृष्ट पोलीस अधिकारी'</strong><br />​अक्षय सोनवणे यांच्या कामाची दखल केवळ म्हसवडमध्येच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात घेतली जात आहे. सातारा जिल्ह्यातील ३२ पोलीस ठाण्यांमधील अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा विचार करता, सोनवणे यांनी आपल्या कार्यकुशलतेने 'सर्वोत्कृष्ट पोलीस अधिकारी' असा मान मिळवला आहे. सर्वांना समान वागणूक आणि कायद्याचे राज्य ही त्यांची कार्यपद्धती सध्या सातारा जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.<br />      ​"आजपर्यंतच्या इतिहासात म्हसवडची निवडणूक इतकी शांत कधीच झाली नव्हती. हे केवळ अक्षय सोनवणे यांच्या निस्पृह आणि कणखर धोरणामुळे शक्य झाले आहे," अशी भावना आता स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.</p>
<p><strong>निपक्षपाती पोलीस अधिकारी</strong><br />         सपोनि. अक्षय सोनवणे यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केले नाही. कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो कायद्यापुढे कोणालाही त्यांनी क्षमा केलेली नाही. अनेकदा त्यांच्यावरती राजकीय दबाव आणण्याचाही प्रयत्न झाला होता मात्र त्या दबावाला कधीही बळी पडले नाहीत. स्थानिक राजकारण्यांच्या दबावाला बळी पडून कधीही कोणाला नाहक त्रास दिला नाही. त्यामुळे सपोनि. अक्षय सोनवणे हे आदर्श पोलीस अधिकारी म्हणून जिल्ह्यामध्ये त्यांची ख्याती आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/for-the-first-time-in-history-mhaswad-elections-were-held/article-2422</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/for-the-first-time-in-history-mhaswad-elections-were-held/article-2422</guid>
                <pubDate>Sun, 28 Dec 2025 15:00:17 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2025-12/img-20251129-wa0144.jpg"                         length="503397"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Lokprant]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>लाचखोर पोलीस उपनिरीक्षक १ लाखाची लाच घेताना रंगेहात अटक; विमानतळ पोलीस ठाण्यातील कारवाई</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>नांदेड:</strong> नांदेड येथील विमानतळ पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकास (PSI) एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणात एका पोलीस कॉन्स्टेबलवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.</p>
<p><strong>नेमके प्रकरण काय?</strong><br />मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील २५ वर्षीय महिला तक्रारदार यांच्या वडिलांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात एक अदखलपात्र (NC) गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यामध्ये अटकेची कारवाई टाळण्यासाठी आणि तक्रारदाराच्या वडिलांना मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक गोविंद बालाजीराव जाधव (वय ५७) यांनी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.</p>
<p><strong>एसीबीचा सापळा आणि अटक</strong><br />तक्रारदाराने या मागणीबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/bribery-police-sub-inspector-arrested-red-handed-taking-1-lakh-bribe-operation/article-2421"><img src="https://www.lokprant.com/media/400/2025-12/gme7gy3waaasxly.jpg" alt=""></a><br /><p><strong>नांदेड:</strong> नांदेड येथील विमानतळ पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकास (PSI) एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणात एका पोलीस कॉन्स्टेबलवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.</p>
<p><strong>नेमके प्रकरण काय?</strong><br />मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील २५ वर्षीय महिला तक्रारदार यांच्या वडिलांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात एक अदखलपात्र (NC) गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यामध्ये अटकेची कारवाई टाळण्यासाठी आणि तक्रारदाराच्या वडिलांना मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक गोविंद बालाजीराव जाधव (वय ५७) यांनी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.</p>
<p><strong>एसीबीचा सापळा आणि अटक</strong><br />तक्रारदाराने या मागणीबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. विभागामार्फत करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच पोलीस कॉन्स्टेबल वैजनाथ संभाजी तांबोळी (वय ४३) यांनी या लाच मागणीसाठी प्रोत्साहन (अपप्रेरणा) दिल्याचे समोर आले.२३ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १०:३० ते २०:१२ च्या दरम्यान, नांदेड येथील नमस्कार चौक, ब्रम्हसिंग नगर भागात सापळा रचण्यात आला. 'किंग कोब्रा बिअर बार'च्या पाठीमागे असलेल्या तक्रारदाराच्या वडिलांच्या घरी, १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना पीएसआय गोविंद जाधव यांना पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले. गोविंद बालाजीराव जाधव (पोलीस उपनिरीक्षक, विमानतळ पोलीस स्टेशन) याला अटक करण्यात आले असून वैजनाथ संभाजी तांबोळी (पोलीस कॉन्स्टेबल) सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.</p>
<p>     ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे, अपर पोलीस अधीक्षक अशोक कदम आणि पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक करीमखान पठाण व त्यांच्या पथकाने केली.कोणत्याही शासकीय कामासाठी सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास, तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल-फ्री क्रमांक १०६४ वर किंवा कार्यालयीन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/bribery-police-sub-inspector-arrested-red-handed-taking-1-lakh-bribe-operation/article-2421</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/bribery-police-sub-inspector-arrested-red-handed-taking-1-lakh-bribe-operation/article-2421</guid>
                <pubDate>Thu, 25 Dec 2025 17:46:34 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2025-12/gme7gy3waaasxly.jpg"                         length="24154"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Lokprant]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>जेजुरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदारासह खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात; लाच स्वीकारताना मोठी कारवाई</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>पुणे: </strong>पुणे ग्रामीण पोलीस दलातील जेजुरी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराने आणि एका खाजगी इसमाने (एजंट) संगनमताने लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुन्हा दाखल केला आहे. कोर्टातील वॉरंट रद्द करून देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे.</p>
<p><strong>नेमके प्रकरण काय?</strong><br />मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील ५९ वर्षीय तक्रारदार यांचा कापडाचा व्यवसाय आहे. त्यांच्या विरोधात असलेल्या कोर्टाचे वॉरंट रद्द करून देण्याच्या बदल्यात जेजुरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार दशरथ शिवाजी बनसोडे यांनी लाचेची मागणी केली होती.</p>
<p><strong>एसीबीची पडताळणी आणि कारवाई</strong><br />तक्रारदाराने या संदर्भात पुणे एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. १० डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान, हवालदार</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/pune/police-constable-of-jejuri-police-station-along-with-private-isam/article-2420"><img src="https://www.lokprant.com/media/400/2025-12/sddefault.jpg" alt=""></a><br /><p><strong>पुणे: </strong>पुणे ग्रामीण पोलीस दलातील जेजुरी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराने आणि एका खाजगी इसमाने (एजंट) संगनमताने लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुन्हा दाखल केला आहे. कोर्टातील वॉरंट रद्द करून देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे.</p>
<p><strong>नेमके प्रकरण काय?</strong><br />मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील ५९ वर्षीय तक्रारदार यांचा कापडाचा व्यवसाय आहे. त्यांच्या विरोधात असलेल्या कोर्टाचे वॉरंट रद्द करून देण्याच्या बदल्यात जेजुरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार दशरथ शिवाजी बनसोडे यांनी लाचेची मागणी केली होती.</p>
<p><strong>एसीबीची पडताळणी आणि कारवाई</strong><br />तक्रारदाराने या संदर्भात पुणे एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. १० डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान, हवालदार दशरथ बनसोडे (वय ५७) यांनी वॉरंट रद्द करण्यासाठी २,००० रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. या गुन्ह्यात सचिन अरविंद चव्हाण या खाजगी इसमाने तक्रारदाराला लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे तपासात समोर आले. दोन्ही आरोपींनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना ताब्यात घेतले आहे. दशरथ शिवाजी बनसोडे (वय ५७ वर्षे, पद- पोलीस हवालदार, जेजुरी पोलीस स्टेशन), सचिन अरविंद चव्हाण (रा. वाल्हा, ता. पुरंदर – खाजगी इसम) अशी आरोपींची नावे आहेत.या प्रकरणी जेजुरी पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७, ७अ आणि १२ नुसार गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.</p>
<p>      ही मोहीम लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक  अजित पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी करण्यात आली.कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) शासकीय कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास, नागरिकांनी तात्काळ एसीबी पुणे कार्यालयाशी ०२०-२६१२२१३४ या क्रमांकावर किंवा १०६४ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.</p>
<p> </p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/pune/police-constable-of-jejuri-police-station-along-with-private-isam/article-2420</link>
                <guid>https://www.lokprant.com/pune/police-constable-of-jejuri-police-station-along-with-private-isam/article-2420</guid>
                <pubDate>Thu, 25 Dec 2025 17:40:28 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2025-12/sddefault.jpg"                         length="26255"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Lokprant]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमास ५ वर्षे सश्रम कारावास; सत्र न्यायालयाचा मोठा निकाल</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>मुंबई: </strong>मुंबईतील चेंबूर परिसरातील आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या विनयभंग आणि पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्ह्यातील आरोपीला सत्र न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. आरोपी फुलदेव रामप्रीत पासवान याला दोषी ठरवून ५ वर्षे सश्रम कारावास आणि ८,००० रुपये दंडाची शिक्षा देण्यात आली आहे.</p>
<p><strong>काय आहे प्रकरण?</strong><br />२०१९ मध्ये आरसीएफ पोलीस ठाण्यात आरोपी फुलदेव पासवान याच्याविरुद्ध कलम ३५४, ३५४(अ), ४५२ आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो कायदा) कलम १० नुसार गुन्हा (गु.र.क्र. ८१/२०१९) दाखल करण्यात आला होता. आरोपीने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता.</p>
<p><strong>न्यायालयाचा निकाल</strong><br />या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून पोलिसांनी न्यायालयात सबळ पुरावे सादर केले होते. २४ डिसेंबर २०२५ रोजी</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/5-years-rigorous-imprisonment-for-the-murderer-who-molested-a/article-2419"><img src="https://www.lokprant.com/media/400/2025-12/atyachar-1.jpg" alt=""></a><br /><p><strong>मुंबई: </strong>मुंबईतील चेंबूर परिसरातील आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या विनयभंग आणि पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्ह्यातील आरोपीला सत्र न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. आरोपी फुलदेव रामप्रीत पासवान याला दोषी ठरवून ५ वर्षे सश्रम कारावास आणि ८,००० रुपये दंडाची शिक्षा देण्यात आली आहे.</p>
<p><strong>काय आहे प्रकरण?</strong><br />२०१९ मध्ये आरसीएफ पोलीस ठाण्यात आरोपी फुलदेव पासवान याच्याविरुद्ध कलम ३५४, ३५४(अ), ४५२ आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो कायदा) कलम १० नुसार गुन्हा (गु.र.क्र. ८१/२०१९) दाखल करण्यात आला होता. आरोपीने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता.</p>
<p><strong>न्यायालयाचा निकाल</strong><br />या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून पोलिसांनी न्यायालयात सबळ पुरावे सादर केले होते. २४ डिसेंबर २०२५ रोजी मुंबई सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुराव्यांच्या आधारे आरोपीला दोषी ठरवले. न्यायालयाने आरोपीस ५ वर्षे सश्रम कारावास, ८,००० रुपये दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त ३ महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे.</p>
<p><strong>पोलीस पथकाची उल्लेखनीय कामगिरी</strong><br />हा खटला यशस्वीरित्या तडीस नेण्यासाठी मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने विशेष मेहनत घेतली. यामध्ये अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) डॉ. महेश पाटील, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ ६) समीर शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त कलीम शेख आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांचा समावेश होता.तसेच, या गुन्ह्याचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप देसाई (सध्या गावदेवी पोलीस ठाणे), पोलीस निरीक्षक गजानन देशमुख, पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दिपाली पावसे आणि त्यांच्या पथकाने न्यायालयात भक्कम पुरावे मांडल्यामुळे आरोपीला शिक्षा मिळवून देण्यात यश आले आहे.या निकालामुळे गुन्हेगारांवर जरब बसेल आणि पीडितेला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/5-years-rigorous-imprisonment-for-the-murderer-who-molested-a/article-2419</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/5-years-rigorous-imprisonment-for-the-murderer-who-molested-a/article-2419</guid>
                <pubDate>Thu, 25 Dec 2025 17:34:28 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2025-12/atyachar-1.jpg"                         length="48945"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Lokprant]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमा निमित्त ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी पुण्यात मोठे वाहतूक बदल; जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>पुणे: </strong>कोरेगाव भिमा, पेरणेफाटा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी १ जानेवारी २०२६ रोजी राज्यभरातून मोठ्या संख्येने अनुयायी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे शहराची वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्यासाठी पुणे पोलीस वाहतूक शाखेने ३१ डिसेंबर २०२५ च्या मध्यरात्रीपासून ते १ जानेवारी २०२६ च्या रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीत मोठे बदल करण्याचे आदेश दिले आहेत.पोलीस उप-आयुक्त (वाहतूक) हिंमत जाधव यांनी मोटार वाहन कायद्यातील अधिकारांचा वापर करून हे आदेश निर्गमित केले आहेत.</p>
<p>  <strong>महत्त्वाचे वाहतूक बदल आणि निर्बंध</strong></p>
<p>कार्यक्रमाच्या दिवशी गर्दी टाळण्यासाठी खालील मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल (अत्यावश्यक सेवा वगळून):</p>
<p><br /><strong>नगर रोड:  </strong>खराडी बायपास ते लोणीकंद आणि पुणे पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/pune/major-traffic-changes-in-pune-on-31st-december-and-1st/article-2418"><img src="https://www.lokprant.com/media/400/2025-12/people-gathering-to-see-bhima-koregaon-vijay-sthambh-of-mumbai_730x365.jpg" alt=""></a><br /><p><strong>पुणे: </strong>कोरेगाव भिमा, पेरणेफाटा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी १ जानेवारी २०२६ रोजी राज्यभरातून मोठ्या संख्येने अनुयायी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे शहराची वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्यासाठी पुणे पोलीस वाहतूक शाखेने ३१ डिसेंबर २०२५ च्या मध्यरात्रीपासून ते १ जानेवारी २०२६ च्या रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीत मोठे बदल करण्याचे आदेश दिले आहेत.पोलीस उप-आयुक्त (वाहतूक) हिंमत जाधव यांनी मोटार वाहन कायद्यातील अधिकारांचा वापर करून हे आदेश निर्गमित केले आहेत.</p>
<p> <strong>महत्त्वाचे वाहतूक बदल आणि निर्बंध</strong></p>
<p>कार्यक्रमाच्या दिवशी गर्दी टाळण्यासाठी खालील मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल (अत्यावश्यक सेवा वगळून):</p>
<p><br /><strong>नगर रोड:  </strong>खराडी बायपास ते लोणीकंद आणि पुणे पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व प्रकारचे प्रवेश बंद राहतील.</p>
<p><strong>इतर बंद मार्ग: </strong>मरकळ नदी ब्रिज ते तुळापूर फाटा आणि वाघोली-केसनंद फाटा ते लोणीकंद (थेऊर फाटा) दरम्यानची वाहतूक बंद असेल.</p>
<p><strong>जड वाहने: </strong>आळंदी-मरकळ रोडवरील मरकळ ब्रिज हा जड वाहनांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला असून, तेथून केवळ हलकी चारचाकी वाहनेच जाऊ शकतील.</p>
<p><strong>बाहेरील जिल्ह्यांतून येणाऱ्या अनुयायांसाठी मार्ग</strong></p>
<p>प्रशासनाने विविध जिल्ह्यांतून येणाऱ्या वाहनांसाठी विशिष्ट मार्ग आणि पार्किंगची सोय केली आहे:</p>
<p><strong>मुंबई/ठाणे: </strong>तळेगाव दाभाडे - चाकण - शिक्रापूर मार्गे किंवा येरवडा-खराडी बायपास मार्गे 'आपले घर' पार्किंग.</p>
<p><strong>छत्रपती संभाजीनगर/अहिल्यानगर:</strong> शिरूर-शिक्रापूर मार्गे.</p>
<p><strong>सोलापूर/लातूर: </strong>केडगाव चौफुला - यवत - थेऊर फाटा मार्गे खंडोबा माळ पार्किंग.</p>
<p><strong>सातारा/कोल्हापूर: </strong>कात्रज - खडी मशीन चौक - मंतरवाडी फाटा - थेऊर फाटा मार्गे पार्किंग.</p>
<p> <strong>सर्वसामान्य प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग</strong></p>
<p>पुणे ते अहिल्यानगर (नगर रोड) कडे जाणाऱ्या हलक्या वाहनांनी खराडी बायपास, हडपसर, सोलापूर रोड, केडगाव चौफुला, न्हावरा आणि शिरूर या पर्यायी मार्गांचा वापर करावा.</p>
<p> <strong>जड वाहनांना 'नो-एंट्री'</strong></p>
<p>३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून १ जानेवारीच्या रात्रीपर्यंत संपूर्ण पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जड आणि अवजड वाहनांना (ट्रक, डंपर, मिक्सर, जेसीबी इ.) अंतर्गत वाहतुकीसाठी पूर्णपणे प्रवेशबंदी असेल. थेऊर फाटा, हॅरीश ब्रिज, नवले ब्रिज, कात्रज चौक आणि मंतरवाडी फाटा यांसारख्या शहराच्या महत्त्वाच्या प्रवेशद्वारांवरून ही वाहने आत येऊ शकणार नाहीत.नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे आणि या बदलांची नोंद घेऊनच आपला प्रवास करावा, असे आवाहन पुणे वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/pune/major-traffic-changes-in-pune-on-31st-december-and-1st/article-2418</link>
                <guid>https://www.lokprant.com/pune/major-traffic-changes-in-pune-on-31st-december-and-1st/article-2418</guid>
                <pubDate>Thu, 25 Dec 2025 15:28:49 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2025-12/people-gathering-to-see-bhima-koregaon-vijay-sthambh-of-mumbai_730x365.jpg"                         length="30899"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Lokprant]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>​&quot;आरोग्य सेवा हीच वाढदिवसाची भेट! २६ डिसेंबरला दहिवडीत तज्ज्ञ डॉक्टरांचा फौजफाटा&quot;</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>दहिवडी: </strong>शिवसेना जिल्हाप्रमुख (सातारा) मा. श्री. चंद्रकांत (दादा) जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, 'धर्मवीर आरोग्याचा महायज्ञ' या उपक्रमांतर्गत शुक्रवारी, २६ डिसेंबर २०२५ रोजी दहिवाडी येथे भव्य मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.​ हे शिबिर धर्मवीर प्रतिष्ठान कुस्ती संकुल (माण तालुका) आणि सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (मिरज) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.</p>
<div><strong>​प्रमुख वैशिष्ट्ये आणि मोफत सुविधा:</strong></div>
<div>​या शिबिरात नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जाणार असून खालील सुविधा मोफत पुरवल्या जातील:</div>
<div>​तपासणी: ईसीजी (ECG), डोळे तपासणी, हृदयदोग तपासणी, हाडांच्या तपासणीसह कान-नाक-घसा आणि दात तपासणी.</div>
<div><strong>​मोफत शस्त्रक्रिया: </strong>मूत्रखड्याचे ऑपरेशन, एन्जोओग्राफी, एन्जोप्लास्टी आणि बायपास सर्जरी यांसारख्या मोठ्या शस्त्रक्रियांची</div>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/healthcare-is-a-birthday-gift-on-26th-december-in-dahiwadi/article-2417"><img src="https://www.lokprant.com/media/400/2025-12/orig_new-project-86_1674265341.jpg" alt=""></a><br /><p><strong>दहिवडी: </strong>शिवसेना जिल्हाप्रमुख (सातारा) मा. श्री. चंद्रकांत (दादा) जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, 'धर्मवीर आरोग्याचा महायज्ञ' या उपक्रमांतर्गत शुक्रवारी, २६ डिसेंबर २०२५ रोजी दहिवाडी येथे भव्य मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.​ हे शिबिर धर्मवीर प्रतिष्ठान कुस्ती संकुल (माण तालुका) आणि सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (मिरज) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.</p>
<div><strong>​प्रमुख वैशिष्ट्ये आणि मोफत सुविधा:</strong></div>
<div>​या शिबिरात नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जाणार असून खालील सुविधा मोफत पुरवल्या जातील:</div>
<div>​तपासणी: ईसीजी (ECG), डोळे तपासणी, हृदयदोग तपासणी, हाडांच्या तपासणीसह कान-नाक-घसा आणि दात तपासणी.</div>
<div><strong>​मोफत शस्त्रक्रिया: </strong>मूत्रखड्याचे ऑपरेशन, एन्जोओग्राफी, एन्जोप्लास्टी आणि बायपास सर्जरी यांसारख्या मोठ्या शस्त्रक्रियांची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.</div>
<div><strong>​उपस्थित तज्ज्ञ डॉक्टर:</strong></div>
<div>​या शिबिरात डॉ. सुरेश पाटील (हाडांचे तज्ज्ञ), डॉ. समृद्धी देसाई (हृदय तज्ज्ञ), डॉ. तुषार थोपाडे (हार्ट सर्जन), डॉ. श्रीनाथ पाटील (युरॉलॉजी), डॉ. राहुल चडा (ई.एन.टी.) आणि डॉ. राजकुमार खंबे (लिव्हर तज्ज्ञ) यांसारखे अनुभवी डॉक्टर रुग्णांची तपासणी करतील.</div>
<div><strong>​शिबिराचा तपशील:</strong></div>
<div>​दिनांक: शुक्रवार, २६ डिसेंबर २०२५</div>
<div>​वेळ: सकाळी ०९:०० ते सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत</div>
<div>​ठिकाण: बालाजी मंगल कार्यालय, भटकी मळा रोड, दहिवडी.</div>
<div><strong>​नोंदणी व संपर्क:</strong></div>
<div>ज्या रुग्णांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी तात्काळ ७७७५९५९५२२ या व्हॉट्सॲप नंबरवर आपले नाव आणि मोबाईल नंबर पाठवून नोंदणी करावी. आज (२६ डिसेंबर) थेट शिबिराच्या ठिकाणी नोंदणी करणाऱ्या रुग्णांना १०० रुपये शुल्क भरावे लागेल, असे आयोजकांमार्फत कळवण्यात आले आहे.</div>
<div>​या शिबिराचे आयोजन शिवसेना पदाधिकारी व माण-खटाव-फलटण-माळशिरस तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी केले आहे. जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.</div>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/healthcare-is-a-birthday-gift-on-26th-december-in-dahiwadi/article-2417</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/healthcare-is-a-birthday-gift-on-26th-december-in-dahiwadi/article-2417</guid>
                <pubDate>Thu, 25 Dec 2025 15:22:56 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2025-12/orig_new-project-86_1674265341.jpg"                         length="79822"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Lokprant]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>थरारक! कराडमध्ये महामार्गावर व्यापाऱ्याचे अपहरण करून ५ कोटींची मागणी; चालकानेच रचला होता कट</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>कराड: </strong>राष्ट्रीय महामार्गावर प्रवासादरम्यान गाडी अडवून, व्यापाऱ्याला शस्त्राचा धाक दाखवत अपहरण करून ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याची खळबळजनक घटना कराड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, ज्या चालकावर व्यापाऱ्याने विश्वास ठेवला, त्याच चालकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने हा कट रचल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार चालकासह पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत.</p>
<p>  <strong>महामार्गावर फिल्मी स्टाईलने अपहरण</strong></p>
<p>दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथील पेपर विक्रीचे होलसेल व्यापारी आपल्या खाजगी गाडीतून प्रवास करत होते. त्यांची गाडी नांदलापूर (ता. कराड) गावच्या हद्दीत आली असता, आरोपींनी त्यांच्या गाडीला जोराची धडक दिली आणि रस्ता अडवला. त्यानंतर</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/in-a-thrilling-plot-the-driver-had-hatched-a-conspiracy/article-2416"><img src="https://www.lokprant.com/media/400/2025-12/img-20251225-wa0079.jpg" alt=""></a><br /><p><strong>कराड: </strong>राष्ट्रीय महामार्गावर प्रवासादरम्यान गाडी अडवून, व्यापाऱ्याला शस्त्राचा धाक दाखवत अपहरण करून ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याची खळबळजनक घटना कराड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, ज्या चालकावर व्यापाऱ्याने विश्वास ठेवला, त्याच चालकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने हा कट रचल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार चालकासह पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत.</p>
<p> <strong>महामार्गावर फिल्मी स्टाईलने अपहरण</strong></p>
<p>दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथील पेपर विक्रीचे होलसेल व्यापारी आपल्या खाजगी गाडीतून प्रवास करत होते. त्यांची गाडी नांदलापूर (ता. कराड) गावच्या हद्दीत आली असता, आरोपींनी त्यांच्या गाडीला जोराची धडक दिली आणि रस्ता अडवला. त्यानंतर अज्ञात आरोपींनी गाडीचा ताबा घेत व्यापारी आणि त्यांचा चालक नवनाथ चोरमुले यांना लाकडी दांडके आणि चाकूचा धाक दाखवून अज्ञात ठिकाणी नेले.</p>
<p><strong> ५ कोटींची खंडणी आणि लूट</strong></p>
<p>अपहरणकर्त्यांनी व्यापाऱ्याला मारहाण करत चक्क ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. अखेर व्यापाऱ्याजवळील ३३,३५,७०० रुपयांची रोकड आणि २ तोळे वजनाची सोन्याची चैन (किंमत २ लाख रुपये) असा एकूण ३५ लाख ३५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून घेऊन आरोपी पसार झाले.</p>
<p><strong>पोलिसांची चाणाक्ष नजर आणि तपासाचा वेग</strong></p>
<p>ही घटना अत्यंत गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले. उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपासाला सुरुवात केली. व्यापाऱ्याचा चालक नवनाथ चोरमुले याच्या जबाबातील विसंगतीमुळे पोलिसांना संशय आला. त्याची सखोल चौकशी केली असता, त्यानेच आपल्या साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली.सपोनि सखाराम बिराजदार आणि पोउपनि धनंजय पाटील यांच्या पथकाने तांत्रिक कौशल्याचा वापर करून पाचही आरोपींना निष्पन्न केले आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या. </p>
<p>      पोलिसांनी आरोपींकडून रोख रक्कम व दागिने असा ३४,५५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच आरोपींच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले आहे. गुन्ह्यात वापरलेली गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी शुभम महेश कदम (वय २९, रा. मलकापूर), श्रीहरी धनाजी साळुंखे (वय २५, रा. मलकापूर), वरुन विकास मोहिते (वय २८, रा. रेठरे बुद्रुक), राहूल दिपक खडंग (वय २६, रा. उंब्रज), नवनाथ बाळासो चोरमुले (वय ३१, रा. जयसींगपूर - फितूर चालक) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३११, ३०८(५), १४०(२), १२६(२), ३२४(१), २८१ व शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा पोलीस दलाच्या या उत्कृष्ट कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/in-a-thrilling-plot-the-driver-had-hatched-a-conspiracy/article-2416</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/in-a-thrilling-plot-the-driver-had-hatched-a-conspiracy/article-2416</guid>
                <pubDate>Thu, 25 Dec 2025 15:19:23 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2025-12/img-20251225-wa0079.jpg"                         length="259924"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Lokprant]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>म्हसवडपालिका निडणुकीत सूर्यवंशी दाम्पत्याने रचला नवा इतिहास </title>
                                    <description><![CDATA[<p><strong>दहिवडी: </strong>      नुकत्याच झालेल्या म्हसवड पालिकेच्या निवडणुकीत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी एकहाती सत्ता मिळवताना सर्वच ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडुन आणुन विरोधकांना व्हाईट वॉश देताना नवा इतिहास रचला आहे, या नव्या इतिहासासोबतच येथील सूर्यवंशी दांपत्यानीही निवडुन येत आणखी एक इतिहास रचला आहे. म्हसवड पालिकेची स्थापना ही १८५७ च्या काळातील असुन या पालिकेला ऐतिहासिक वारसा आहे, आशीया खंडातील सर्वात जुन्या पालिकेतील म्हसवड पालिका एक आहे. या पालिकेने आजवर अनेक राजकिय स्थित्यांतरे पाहिली आहेत. अनेकांनी सत्ता उपभोगताना आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे, तर काहीजण नामधारी म्हणुनच गणले गेलेत. अनेक राजकिय स्थित्यांतरे पाहणार्या या पालिकेने यंदा झालेल्या पालिका निवडणुकीत नवीन राजकिय बदल</p>
<p>     <br />एकीकडे</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/suryavansi-couple-created-a-new-history-in-mhaswadpalika-nidanuk/article-2415"><img src="https://www.lokprant.com/media/400/2025-12/img_20251224_161058.jpg" alt=""></a><br /><p><strong>दहिवडी: </strong>   नुकत्याच झालेल्या म्हसवड पालिकेच्या निवडणुकीत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी एकहाती सत्ता मिळवताना सर्वच ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडुन आणुन विरोधकांना व्हाईट वॉश देताना नवा इतिहास रचला आहे, या नव्या इतिहासासोबतच येथील सूर्यवंशी दांपत्यानीही निवडुन येत आणखी एक इतिहास रचला आहे. म्हसवड पालिकेची स्थापना ही १८५७ च्या काळातील असुन या पालिकेला ऐतिहासिक वारसा आहे, आशीया खंडातील सर्वात जुन्या पालिकेतील म्हसवड पालिका एक आहे. या पालिकेने आजवर अनेक राजकिय स्थित्यांतरे पाहिली आहेत. अनेकांनी सत्ता उपभोगताना आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे, तर काहीजण नामधारी म्हणुनच गणले गेलेत. अनेक राजकिय स्थित्यांतरे पाहणार्या या पालिकेने यंदा झालेल्या पालिका निवडणुकीत नवीन राजकिय बदल पाहिला आहे, तो बदल घडवण्याची किमया येथील युवराज सूर्यवंशी व स्नेहल सूर्यवंशी या दांपत्याने केली आहे.</p>
<p>     पालिकेच्या इतिहासात प्रथमच शहरातील पती, पत्नी ने एकत्रित निवडणुक लढवण्याचा आणी निवडुन येण्याचा सम्मान पटकावताना नवा इतिहास रचला आहे, अर्थातच हा नवा इतिहास रचताना मंत्री गोरे यांचेच त्यांना मोठे पाठबळ मिळाल्याचे हे दांपत्य जाहीरपणे सांगत असले तरी एकाच पालिकेत एकाच पार्टीतुन पती, पत्नी निवडुन येण्याची ही पालिका इतिहासातील पहिलीच वेळ असल्यानेच सूर्यवंशी दांपत्याचे विशेष कौतुक व अभिनंदन शहरात होत आहे. वास्तविक पाहता निवडणुक जाहीर झाल्यापासुन सूर्यवंशी यांच्यातील कोणाला एकाला उमेदवारी मिशेल असे सर्वच स्तरातुन बोलले जात होते, मात्र नेहमीच धक्कातंत्र देणार्या ना. गोरे यांनी यावेळी सूर्यवंशी पती, पत्नी या दोघांनाही उमेदवारी जाहीर केल्याने अनेकांचे डोळे विस्फारले, अनेकांना हा निर्णय अत्यंत चुकीचा वाटला तर अनेकजण नाराजही झाले मात्र मंत्री गोरे यांनी एकदा शब्द दिला की ते प्रमाण बनते हे ही येथील जनतेने अनुभवलेले आहे. मंत्री गोरे यांनी दिलेला शब्द खरा करुन दाखवण्यासाठी मग युवराज सूर्यवंशी व स्नेहल सूर्यवंशी या पती, पत्नी ने अक्षरशा पायाला भिंगरी बांधुन प्रचाराची अशी काही राळ उडवुन दिली की त्या राळेतुन त्यांची प्रचाराची गाडी सुसाटपणे धावत विजयी स्टेशनवरच येवुन थांबली.<br />एकीकडे मंत्री गोरे यांनी पालिकेवर सत्ता स्थापन करताना २१/० ने विरोधकांना व्हाइट वॉश देत नवा इतिहास रचला तर याच निवडणुकीत सूर्यवंशी दांपत्यानीही वेगवेगळ्या प्रभागातुन निवडुन येत पालिका निवडणुकीत ऐतिहासिक कामगिरी केल्याने सन २०२५ ही पालिका निवडणुक ही सर्वांसाठी अविस्मरणीय अशी राहिल असे राजकिय विश्लेशकांतुन बोलले जात आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/suryavansi-couple-created-a-new-history-in-mhaswadpalika-nidanuk/article-2415</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/suryavansi-couple-created-a-new-history-in-mhaswadpalika-nidanuk/article-2415</guid>
                <pubDate>Wed, 24 Dec 2025 16:11:19 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2025-12/img_20251224_161058.jpg"                         length="458453"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Lokprant]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        