<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.lokprant.com/satara/category-2" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Lokprant RSS Feed Generator</generator>
                <title>सातारा - Lokprant</title>
                <link>https://www.lokprant.com/category/2/rss</link>
                <description>सातारा RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>सुरूर ब्रिजखाली पिस्तूलासह तरुण अटकेत; भुईंज पोलिसांची मध्यरात्री कारवाई</title>
                                    <description><![CDATA[<p>साताऱ्यातील सुरूर ब्रिजखाली ४५ हजार रुपयांच्या देशी पिस्तूलासह प्रसाद बागल या तरुणाला भुईंज पोलिसांनी अटक केली. ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/midnight-operation-of-bhujnj-police-arrests-youth-with-pistol-under/article-4186"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/whatsapp-image-2026-08-29-at-3.33.44-pm.jpeg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">सातारा: </span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">मध्यरात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन सुरूर ब्रिजखाली हातात देशी बनावटीचे पिस्तूल बाळगून संशयास्पद रीत्या उभ्या असलेल्या एका तरुणाला भुईंज पोलिसांनी अत्यंत थरारक कारवाई करत जेरबंद केले आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी सुमारे ४५ हजार रुपये किमतीचे घातक देशी पिस्तूल जप्त केले असून</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">या घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील वाई आणि सुरूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रसाद शुक्राचार्य बागल (रा. सुरूर</span>, <span lang="mr" xml:lang="mr">ता. वाई) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">त्याच्या या कृत्यामुळे अवैधरीत्या शस्त्र बाळ</span>g<span lang="mr" xml:lang="mr">णाऱ्या गुन्हेगारी घटकांचे धाबे दाणणले आहेत.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"><span>       </span><span lang="mr" xml:lang="mr">पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार</span>, <span lang="mr" xml:lang="mr">२८ ऑगस्ट रोजी रात्री साधारण सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे हे आपल्या पथकासह भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियमित रात्रीची गस्त घालत होते. गस्ती दरम्यान पोलिसांना एका गोपनीय बातमीदारा मार्फत अत्यंत खात्रीशीर माहिती मिळाली की</span>, <span lang="mr" xml:lang="mr">सुरूर ब्रिजखाली एक इसम बेकायदा पिस्तूल घेऊन संशयास्पद हालचाली करत उभा आहे. माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक ताटे यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने पोलीस पथकाला कारवाईचे आदेश दिले. पंचांना सोबत घेऊन पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. बातमीदाराने सांगितलेल्या वर्णनाशी हुबेहूब जुळणारा एक तरुण तिथे संशयास्पद स्थितीत उभा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"><span>      </span><span lang="mr" xml:lang="mr">पोलिसांनी अत्यंत सावधगिरी बाळगून त्या तरुणाला ताब्यात घेतले आणि पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली. या झडतीमध्ये त्याच्या कमरेला एक देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले</span>, <span lang="mr" xml:lang="mr">ज्यामुळे पोलिसांचा संशय खरा ठरला. पोलिसांनी तातडीने ते पिस्तूल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत जप्त केले आणि संबंधित तरुणाला बेड्या ठोकल्या. रात्रीच्या वेळी अशा प्रकारे निर्जन स्थळी हातात शस्त्र घेऊन हा तरुण नेमका कोणत्या मोठ्या गुन्हेगारी उद्देशाने उभा होता</span>, <span lang="mr" xml:lang="mr">याचा कसून तपास आता पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८९/२०२६ अन्वये शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"><span>       </span><span lang="mr" xml:lang="mr">अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीला वाई येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर न्यायालयात हजर करण्यात आले</span>, <span lang="mr" xml:lang="mr">जिथे न्यायालयाने त्याची सखोल चौकशी करण्यासाठी चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या कोठडीच्या काळात पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी केली जाणार आहे. हे पिस्तूल त्याच्याकडे नेमके कशासाठी आले</span>, <span lang="mr" xml:lang="mr">यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का</span>, <span lang="mr" xml:lang="mr">तसेच आरोपीचा यापूर्वीच्या कोणत्या गंभीर गुन्हेगारी प्रकरणाशी संबंध आहे का</span>, <span lang="mr" xml:lang="mr">या सर्व बाबींचा उलगडा आगामी तपासात होणार आहे. अवैध शस्त्रांच्या खरेदी-विक्रीची ही साखळी कुठेपर्यंत पसरली आहे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">याचा छडा लावण्यासाठी पोलीस आता अधिक वेगाने तपास करत आहेत.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"><span>         </span><span lang="mr" xml:lang="mr">ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूनम झगडे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">पोलीस हवालदार नितीन जाधव</span>, <span lang="mr" xml:lang="mr">आप्पा कोलवडकर</span>, <span lang="mr" xml:lang="mr">पोलीस शिपाई सोमनाथ बल्लाळ व सागर मोहिते यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली</span>, <span lang="mr" xml:lang="mr">तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश मोरे करत आहेत. रात्रीच्या गस्ती दरम्यान दाखवलेल्या या तत्परतेमुळे एका संभाव्य मोठ्या गुन्ह्याला आळा बसल्याचे बोलले जात असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">पोलिसांच्या या प्रभावी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/midnight-operation-of-bhujnj-police-arrests-youth-with-pistol-under/article-4186</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/midnight-operation-of-bhujnj-police-arrests-youth-with-pistol-under/article-4186</guid>
                <pubDate>Sat, 29 Aug 2026 19:21:13 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/whatsapp-image-2026-08-29-at-3.33.44-pm.jpeg"                         length="185296"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>साताऱ्यात ‘पेपर ब्लास्ट’विरोधात पालिका आक्रमक; प्लॅस्टिक युक्त कचऱ्यावर दंडात्मक कारवाई</title>
                                    <description><![CDATA[<p>साताऱ्यात गणेशोत्सवात 'पेपर ब्लास्ट'मुळे पसरणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्यावर पालिकेची कारवाई. १० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आणि विशेष पथके तैनात.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/punitive-action-against-paper-blast-in-satara-by-municipal-corporation/article-4180"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/1b_1493957495.jpg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">सातारा: </span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">गणेशोत्सवाच्या आगमनानिमित्त काढल्या जाणाऱ्या मिरवणुकांमध्ये अलीकडच्या काळात वेगाने रुढ झालेला ‘पेपर ब्लास्ट’चा (</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">Paper Blast) <span lang="mr" xml:lang="mr">ट्रेण्ड सातारा शहरातील स्वच्छतेसमोर आणि प्रशासना समोर एक मोठे आव्हान उभे करत असल्याचे समोर आले आहे. लाडक्या बाप्पाच्या स्वागताचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उडवले जाणारे रंगीबेरंगी कागद आणि त्यात प्रामुख्याने असणारे प्लॅस्टिकयुक्त फॉइल कोटिंगचे घटक संपूर्ण रस्त्यांवर पसरत असल्याने सातारा नगरपालिकेची चिंता वाढली आहे. या गंभीर प्रकारामुळे शहराचे सौंदर्य आणि आरोग्य धोक्यात येत असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">प्रशासनाने आता यावर कडक नियंत्रण आणत कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्याचे संकेत दिले आहेत.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>        </span>शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून बाप्पाला मोठ्या जल्लोषात आणि वाजत-गाजत मंडपात आणण्याची जय्यत तयारी केली जात आहे. ढोल-ताशांचा गजर</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">गुलालाची उधळण आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर निघणाऱ्या या आगमन सोहळ्यांमध्ये अनेक ठिकाणी आधुनिक ‘पेपर ब्लास्ट’ तोफांचा वापर केला जात असल्याचे चित्र आहे. विशेषतः गणपती कारखान्यांच्या परिसरात आणि शहरातील प्रमुख चौकांमध्ये हा ट्रेण्ड मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. तोफांमधून आकाशात उडवले जाणारे हे कागद साधे नसून ते प्रामुख्याने प्लॅस्टिक किंवा फॉइल कोटिंगचे असतात. हे चकाकणारे प्लॅस्टिकचे तुकडे ओल्या रस्त्यांवर</span>, <span lang="mr" xml:lang="mr">झाडांवर आणि वाहनांवर अतिशय घट्ट चिकटून बसतात. उत्सव संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रस्ते स्वच्छ करताना पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. साधा कागद काही वेळाने नष्ट होतो किंवा सहज गोळा करता येतो</span>, <span lang="mr" xml:lang="mr">मात्र हे प्लॅस्टिकचे कस्पट साध्या झाडूने निघत नसल्याने कर्मचाऱ्यांना हाताने वेचून काढावे लागते</span>, <span lang="mr" xml:lang="mr">ज्यामुळे त्यांच्यावरील कामाचा ताण कैक पटीने वाढतो.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">       या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेत सातारा पालिकेचे आरोग्य विभागप्रमुख राकेश गलियल यांनी स्पष्ट केले आहे की</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">शहरात कचरा पसरवणाऱ्या आणि विशेषतः प्लॅस्टिकचा कचरा निर्माण करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल. अशा प्रकारे पर्यावरणाला आणि स्वच्छतेला मारक ठरणारे कृत्य करणाऱ्यांना दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्याची तरतूद कायद्यात असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">यावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथकेही नेमली जाणार आहेत. गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा आणि पर्यावरणाचा समतोल राखणारा पवित्र सण आहे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">त्यामुळे तात्पुरत्या आनंदासाठी सार्वजनिक ठिकाणी कचरा पसरवणे योग्य नाही</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे मत पालिकेच्या आरोग्य समितीचे सभापती धनंजय जांभळे यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्र नगरपरिषद</span>, <span lang="mr" xml:lang="mr">नगरपंचायत आणि औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ अंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असा इशारा त्यांनी दिला आहे. </span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"><span lang="mr" xml:lang="mr">     बाप्पाचे स्वागत धुम धडाक्यात व उत्साहात व्हावे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">परंतु त्यामुळे शहराचे आरोग्य आणि स्वच्छता धोक्यात येणार नाही</span>, <span lang="mr" xml:lang="mr">याची जबाबदारी आता शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळे आणि नागरिकांनी घ्यावी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/punitive-action-against-paper-blast-in-satara-by-municipal-corporation/article-4180</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/punitive-action-against-paper-blast-in-satara-by-municipal-corporation/article-4180</guid>
                <pubDate>Sat, 29 Aug 2026 10:07:14 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/1b_1493957495.jpg"                         length="113573"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>भाजपला धक्का; शेखर गोरे शिवसेनेत प्रवेश करणार, माणमध्ये शिंदे गटाची ताकद वाढणार</title>
                                    <description><![CDATA[<p>साताऱ्यातील राजकीय घडामोडीत भाजपला धक्का. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/bjps-shock-shekhar-gore-will-join-the-shiv-sena-the/article-4159"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/bjp-6.webp" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">सातारा:</span></strong><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"> </span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर वेगाने बदलत असलेल्या राजकीय समीकरणांमध्ये सत्ताधारी महायुती मधून एक मोठी घडामोड समोर आली आहे. यापूर्वी विरोधकांना धक्के देणाऱ्या महायुतीमध्ये आता मित्र पक्षांमध्येच इनकमिंग-आऊटगोइंगचे राजकारण रंगल्याचे दिसून येत आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वा खालील शिवसेनेने थेट मित्रपक्ष असलेल्या भाजपलाच मोठा राजकीय धक्का दिला आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे हे आगामी १ सप्टेंबर रोजी अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. या घडामोडीमुळे माण तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे बळ वाढणार असून</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">भाजपसाठी हा एक मोठा झटका मानला जात आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>       </span>विधानसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर राजकीय पक्षांतरांना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी आणि खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा होती. मात्र</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">आता थेट भाजपच्या नेत्याला आपल्या गळाला लावून शिंदे गटाने विरोधकां सोबतच मित्र पक्षालाही आश्चर्याचा धक्का दिला आहे. मिळालेल्या माहिती नुसार</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शेखर गोरे यांना उमेदवारी किंवा अन्य महत्त्वाच्या भूमिके बाबत शब्द देण्यात आला होता. मात्र</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">ऐनवेळी हा शब्द पाळला न गेल्यामुळे शेखर गोरे गेल्या काही दिवसांपासून पक्षावर तीव्र नाराज होते. अखेर भाजप मधील या अंतर्गत अस्वस्थतेमुळे त्यांनी भाजपची साथ सोडत शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १ सप्टेंबर रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असून</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">या निर्णयामुळे सातारा जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>         </span>या पक्ष प्रवेशामुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना त्यांच्याच होमपिचवर मोठा राजकीय धक्का बसल्याचे चर्चा रंगली आहे. मागील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर अनेक नेत्यांनी शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">परंतु आता शेखर गोरे यांच्या माध्यमातून शिवसेनेने भाजपची कोंडी केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शेखर गोरे यांच्या या निर्णयामुळे माण तालुक्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद तळागाळात अधिक मजबूत होणार आहे. आगामी स्थानिक व इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड अत्यंत महत्त्वाची मानली जात असून</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">या राजकीय बदलाचे दूरगामी परिणाम सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="en-us"> </span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/bjps-shock-shekhar-gore-will-join-the-shiv-sena-the/article-4159</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/bjps-shock-shekhar-gore-will-join-the-shiv-sena-the/article-4159</guid>
                <pubDate>Fri, 28 Aug 2026 20:19:40 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/bjp-6.webp"                         length="49348"                         type="image/webp"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>भाजीपाला देण्याच्या कारणावरून मुख्याध्यापकांना शाळेत घुसून मारहाण; ग्रामस्थांचा संताप</title>
                                    <description><![CDATA[<p>साताऱ्यातील पिंपोळी बुद्रुक येथे पोषण आहाराच्या वादातून मुख्याध्यापक ब्रह्मदेव वाघमोडे यांना मारहाण. वाठार पोलिसांत गुन्हा दाखल; ग्रामस्थांचा संताप.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/villagers-angered-by-breaking-into-the-school-and-beating-up/article-4139"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/859674-75199-axhywvjxyg-1511960362.jpg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">सातारा :</span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"> </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">पोषण आहारासाठी भाजीपाला देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पिंपोळी बुद्रुक येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयाचे मुख्याध्यापक ब्रह्मदेव वाघमोडे यांच्यावर शाळेच्या कार्यालयात घुसून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मुख्याध्यापकांना शिवीगाळ करून दमदाटी करण्यात आल्याने पालक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="en-us"><span>      </span></span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">मिळालेल्या माहितीनुसार</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">शालेय पोषण आहारासाठी भाजीपाला देण्याच्या मुद्द्यावरून संबंधित व्यक्ती आणि मुख्याध्यापक यांच्यात वाद झाला. या वादातून संबंधित व्यक्तीने थेट शाळेच्या कार्यालयात प्रवेश करून मुख्याध्यापक ब्रह्मदेव वाघमोडे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांच्यासोबत मारहाण करत दमदाटी केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर संबंधित व्यक्ती तेथून निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="en-us"><span>       </span></span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">शाळेच्या परिसरात मुख्याध्यापकांवर झालेल्या या प्रकारामुळे विद्यार्थी</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">पालक आणि ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली. घटनेच्या निषेधार्थ पालक आणि ग्रामस्थांनी एकत्र येत शाळा बंद ठेवून आपला तीव्र विरोध नोंदवला. शैक्षणिक संस्थेत अशा प्रकारे घुसून शिक्षकावर हल्ला होणे ही गंभीर बाब असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="en-us"><span>      </span></span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">दरम्यान</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">या प्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. संबंधित आरोपीला तातडीने अटक करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">अशी मागणी ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली आहे. याबाबत ग्रामस्थांच्या वतीने पोलिसांना निवेदनही देण्यात आले आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="en-us"><span>      </span></span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">शाळा ही विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि शैक्षणिक विकासासाठीची जागा असून</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">तेथे शिक्षकांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे या घटनेतील आरोपीवर कायद्यानुसार कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी पालक आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="en-us"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="en-us" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="en-us"> </span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/villagers-angered-by-breaking-into-the-school-and-beating-up/article-4139</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/villagers-angered-by-breaking-into-the-school-and-beating-up/article-4139</guid>
                <pubDate>Fri, 28 Aug 2026 17:21:06 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/859674-75199-axhywvjxyg-1511960362.jpg"                         length="127835"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला कृत्रिम बुद्धिमत्तेची नवी दिशा; दहावीच्या विद्यार्थिनी सृष्टी कुंभारचा पवारवाडीत कौतुकास्पद उपक्रम</title>
                                    <description><![CDATA[<p>जावलीतील पवारवाडी येथे १० वीच्या सृष्टी कुंभार हिने विद्यार्थ्यांना दिले AI तंत्रज्ञानाचे धडे. ग्रामीण विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेशी जोडणाऱ्या उपक्रमाचे कौतुक.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/a-new-direction-of-artificial-intelligence-to-students-knowledge-appreciable/article-4107"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/whatsapp-image-2026-08-27-at-5.25.53-pm.jpeg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">सातारा:</span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"> आजच्या आधुनिक युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">AI) <span lang="mr" xml:lang="mr">हे तंत्रज्ञान शिक्षणासह प्रत्येक क्षेत्रात वेगाने पाय पसरत आहे. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान केवळ शहरांपुरते मर्यादित न राहता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे आणि त्यांना त्याचे योग्य ज्ञान व्हावे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">या उद्देशाने जावली तालुक्यातील पवारवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये एका विशेष एआय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. लिंब येथील प्रसिद्ध प्रतापसिंह हायस्कूलमध्ये दहावीत शिक्षण घेणाऱ्या गुणी विद्यार्थिनी सृष्टी कुंभार हिने या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एआयच्या अथांग विश्वाची ओळख करून देत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाशी जोडणारा हा उपक्रम सध्या संपूर्ण परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>      </span>या मार्गदर्शन शिबिरामध्ये सृष्टी कुंभार हिने कृत्रिम बुद्धिमत्तेचे विविध पैलू</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">त्याचा अभ्यास</span>, <span lang="mr" xml:lang="mr">दैनंदिन जीवनातील उपयोग</span>, <span lang="mr" xml:lang="mr">शिक्षण क्षेत्रातील त्याचे महत्त्व तसेच तंत्रज्ञानाचा जबाबदारीने व सुरक्षित वापर कसा करावा</span>, <span lang="mr" xml:lang="mr">याविषयी अत्यंत सोप्या आणि प्रभावी भाषेत मार्गदर्शन केले. शिबिरात उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विचारलेल्या विविध प्रश्नांना सृष्टीने अत्यंत आत्मविश्वासाने आणि तत्काळ उत्तरे देत त्यांच्या शंकांचे उत्तम निरसन केले. सृष्टी ही पवारवाडीचे तलाठी गोरक्षनाथ कुंभार यांची कन्या असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">तिने स्वतः एआयचा सखोल अभ्यास केला आहे. तिच्या या ज्ञानार्जनात रयत शिक्षण संस्थेच्या वतीने सर्व विद्यालयांमध्ये सुरू असलेल्या एआय प्रकल्पाचा आणि शाळेच्या मार्गदर्शनाचा मोठा सहभाग लाभला आहे. विद्यालयाचे एआय विभाग प्रमुख किरण गायकवाड</span>, <span lang="mr" xml:lang="mr">प्रकल्प प्रमुख दादासाहेब कचरे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">वर्गशिक्षिका मनीषा साळुंखे आणि मुख्याध्यापक श्यामराव गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन तिला मिळाले.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;">     </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">इंग्रजी भाषेवरील मजबूत प्रभुत्व आणि तंत्रज्ञानातील तीव्र रुची यामुळे सृष्टी विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन तरुण पिढीला आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे देत आहे. तिच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक आणि एआय तंत्रज्ञानाची अगदी जवळून ओळख होत असून त्यांच्यातील सुप्त गुण बाहेर येत आहेत. सृष्टीच्या या प्रेरणादायी आणि ज्ञानदायी उपक्रमाचे चीज करत पवारवाडी ग्रामस्थ</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">न्यू इंग्लिश स्कूल तसेच प्राथमिक शाळेच्या वतीने तिचा सस्नेह सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">पालक</span>, <span lang="mr" xml:lang="mr">शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. एका तरुण विद्यार्थिनीने हाती घेतलेल्या या तंत्रज्ञान साक्षरतेच्या मोहिमे मुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल होईल</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/a-new-direction-of-artificial-intelligence-to-students-knowledge-appreciable/article-4107</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/a-new-direction-of-artificial-intelligence-to-students-knowledge-appreciable/article-4107</guid>
                <pubDate>Thu, 27 Aug 2026 19:00:43 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/whatsapp-image-2026-08-27-at-5.25.53-pm.jpeg"                         length="148449"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>विरमाडेत बिअर बार विरोधात महिलांची एकजूट; ग्रामसभेचा ठराव, आंदोलनाचा इशारा</title>
                                    <description><![CDATA[<p>वाई तालुक्यातील विरमाडे गावात बिअर बार बंद करण्यासाठी महिलांचा एल्गार. ३८८ महिलांच्या स्वाक्षऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/womens-ekjut-gram-sabha-resolution-warns-against-beer-bar-in/article-4105"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/whatsapp-image-2026-08-27-at-5.25.52-pm.jpeg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">सातारा: </span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">वाई तालुक्यातील विरमाडे गावात ग्रामपंचायतीची परवानगी न घेता व नियमांना डावलून सुरू असलेल्या बिअर बार विरोधात आता ग्रामस्थ आणि महिलांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. गावात सुरू असलेले ‘माला बिअर बार ॲन्ड रेस्टो’ आणि ‘मूनलाईट बिअर बार ॲन्ड रेस्टो’ ही दोन्ही आस्थापने तातडीने बंद करण्यात यावीत</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">या मागणीसाठी गावातील शेकडो महिला व ग्रामस्थांनी सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांची भेट घेत त्यांना धडक निवेदन दिले आहे. विशेष ग्रामसभेचा अधिकृत ठराव आणि शेकडो महिलांच्या स्वाक्षऱ्यांचे हत्यार उपसत प्रशासनाला कडक कारवाईचा इशारा देण्यात आल्यामुळे या प्रकरणाने आता तीव्र स्वरूप धारण केले आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>       </span>महामार्गालगत सुरू असलेल्या या बारमुळे परिसरातील महिला</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">शेतकरी आणि शेतीच्या कामासाठी नियमित ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे ग्रामस्थांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. बाहेरील मद्यपी व्यक्ती गावात येत असल्याने येथील शांत आणि सामाजिक वातावरण दूषित होत आहे. तसेच</span>, <span lang="mr" xml:lang="mr">या बारमुळे गावातील तरुण पिढीमध्ये व्यसनाधीनता झपाट्याने वाढत असून अनेक कुटुंबांमध्ये कौटुंबिक कलह आणि हिंसाचाराच्या घटनांमध्ये भर पडत असल्याचा संतापजनक आरोप महिलांनी केला आहे. या सर्व प्रकारामुळे त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी एकत्र येत नुकतीच एक विशेष ग्रामसभा पार पाडली</span>, <span lang="mr" xml:lang="mr">ज्यामध्ये हे दोन्ही बार त्वरित बंद करण्यात यावेत</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">ग्रामपंचायत क्षेत्रातील ६२९ महिला मतदारांपैकी तब्बल ३८८ महिलांनी बारविरोधी मोहिमेत सहभाग घेत आपल्या स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यावरून या मागणीला संपूर्ण ग्रामस्थांचे आणि विशेषतः महिलांचे मोठे जनसमर्थन लाभल्याचे स्पष्ट होते.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>     </span><span> </span>महिला व ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांच्याकडे ग्रामसभेचा हा ठराव व महिलांच्या स्वाक्षऱ्यांची कागदपत्रे अधिकृतपणे सुपूर्द केली. संबंधित आस्थापनांच्या कागदपत्रांची आणि परवान्यांची कायदेशीर तपासणी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई न केल्यास महिला व ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता जिल्हा प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभाग यावर काय पावले उचलतो</span>, <span lang="mr" xml:lang="mr">याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/womens-ekjut-gram-sabha-resolution-warns-against-beer-bar-in/article-4105</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/womens-ekjut-gram-sabha-resolution-warns-against-beer-bar-in/article-4105</guid>
                <pubDate>Thu, 27 Aug 2026 18:37:11 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/whatsapp-image-2026-08-27-at-5.25.52-pm.jpeg"                         length="257475"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>रक्षारक्षक म्हणून वृक्षांचे जतन; सातारा व तासगाव येथे विद्यार्थ्यांनी वृक्षांना राखी बांधून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश </title>
                                    <description><![CDATA[<p>सातारा व तासगाव येथे विद्यार्थ्यांनी झाडांना राखी बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे केले. आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन व संजय काळे विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/preservation-of-trees-as-raksharakshak-in-satara-and-tasgaon-students/article-4103"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/whatsapp-image-2026-08-27-at-5.25.54-pm.jpeg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">सातारा:</span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"> रक्षाबंधन हा सण केवळ भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे आणि सुरक्षेचे प्रतीक मानला जातो</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">परंतु या परंपरेला निसर्ग संवर्धनाची जोड देत सातारा आणि तासगाव येथील विद्यार्थ्यांनी एक अत्यंत प्रेरणादायी आणि स्तुत्य उपक्रम राबविला आहे. रयत शिक्षण संस्थेचे आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन</span>, <span lang="mr" xml:lang="mr">सातारा आणि संजय भैरवनाथ काळे विद्यालय</span>, <span lang="mr" xml:lang="mr">तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधनाचे औचित्य साधत पर्यावरणपूरक राखी बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी केवळ नैसर्गिक साहित्यातून आकर्षक राख्या तयार केल्या नाहीत</span>, <span lang="mr" xml:lang="mr">तर थेट विद्यालयाच्या परिसरातील वृक्षांना राखी बांधून ‘वृक्षांचे रक्षण करूया</span>, <span lang="mr" xml:lang="mr">पर्यावरणाचे संवर्धन करूया’ असा मोलाचा संदेश दिला आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>      </span>विद्यार्थ्यांमध्ये लहान पणापासूनच पर्यावरणा विषयी जाणीव निर्माण व्हावी आणि पारंपरिक सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करण्याची संस्कृती रुजावी</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">या मुख्य उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या नैसर्गिक</span>, <span lang="mr" xml:lang="mr">पर्यावरणपूरक व पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर करून अत्यंत सुंदर आणि आकर्षक राख्या बनवल्या. मानवी जीवनासाठी प्राणवायू</span>, <span lang="mr" xml:lang="mr">सावली आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यात वृक्षांचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी झाडांना राखी बांधून निसर्गाच्या रक्षणाचा आणि संगोपनाचा दृढ संकल्प केला.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>       </span>या संपूर्ण उपक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. व्ही. एस. नलवडे</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">उपप्राचार्य डॉ. व्ही. डी. धोंडगे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">आंतरवासिता विभाग प्रमुख प्रा. व्ही. डी. रवलेकर</span>, <span lang="mr" xml:lang="mr">गट मार्गदर्शक प्रा. डॉ. एस. एस. वाघमारे तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व्ही. ए. बैताडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. बी.एड.च्या सर्व छात्राध्यापकांनी या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन अत्यंत उत्साहात पार पाडले. रक्षाबंधन हा सण केवळ मानवी नातेसंबंधापुर</span></span><span dir="rtl" lang="ar-sa" style="font-size:16pt;line-height:107%;font-family:'Times New Roman', serif;" xml:lang="ar-sa">تا</span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"> मर्यादित न राहता</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">मानवाचे निसर्गाशी असलेले अतूट नाते जपण्याची प्रेरणा देणारा ठरावा</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">विद्यार्थ्यांच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/preservation-of-trees-as-raksharakshak-in-satara-and-tasgaon-students/article-4103</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/preservation-of-trees-as-raksharakshak-in-satara-and-tasgaon-students/article-4103</guid>
                <pubDate>Thu, 27 Aug 2026 18:20:40 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/whatsapp-image-2026-08-27-at-5.25.54-pm.jpeg"                         length="263137"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>रस्ता रजिस्टरमध्ये नोंदच नाही; मग काँक्रीटीकरण कसे? कुडाळ ग्रामपंचायतीवर प्रश्नचिन्ह</title>
                                    <description><![CDATA[<p>कुडाळ ग्रामपंचायतीत नोंद नसलेल्या रस्त्यावर ४६,९०० रुपयांचे काँक्रीटीकरण केल्याचे माहिती अधिकारात उघड. सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय शिंदे यांची चौकशीची मागणी.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/there-is-no-entry-in-the-road-register-then-how/article-4101"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/whatsapp-image-2026-08-27-at-5.25.50-pm.jpeg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">आनेवाडी:</span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"> जावली तालुक्यातील कुडाळ ग्रामपंचायतीत सार्वजनिक निधीचा गैरवापर झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायत हद्दीतील ‘व्यायाम शाळेसमोरील रस्ता काँक्रीटीकरण करणे’ या कामासाठी ४६ हजार ९०० रुपयांचा सार्वजनिक निधी खर्च करण्यात आला असला</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">तरी हा रस्ता ग्रामपंचायतीच्या अधिकृत ‘रस्ता रजिस्टर’मध्ये नोंदवलेलाच नसल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे. कागदपत्रांमधील तफावत</span>, <span lang="mr" xml:lang="mr">जागेचा मालकी हक्क</span>, <span lang="mr" xml:lang="mr">संशयास्पद करारनामे आणि प्रशासकीय दिरंगाई यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">अशी आक्रमक मागणी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय शिंदे यांनी एका पत्रकार परिषदेत केली आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>     </span>माहिती अधिकारातून प्राप्त कागद पत्रांनुसार आणि उपलब्ध शासकीय अभिलेखांवरून या कामाबाबत अनेक संशयास्पद बाबी पुढे आल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या लेखी माहिती नुसार सदर रस्ता ग्रामपंचायत दप्तरी नोंदवलेलाच नाही. असे असताना ग्रामपंचायतीच्या निधीतून या रस्त्याचे काँक्रीटीकरण कोणत्या अधिकाराखाली आणि कोणत्या निकषांवर करण्यात आले</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">असा मूळ सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणाच्या तक्रारीनंतर विस्ताराधिकाऱ्यांनी २९ जुलै रोजी प्रत्यक्ष स्थळ पाहणी व मोजमाप केले होते. या पाहणी दरम्यान</span>, <span lang="mr" xml:lang="mr">काँक्रीटीकरणाची जागा आणि ग्रामपंचायतीच्या मालकीचा सिटी सर्व्हे नंबर ७९३ यांच्यामध्ये मोठी तफावत असल्याचे निदर्शनास आले. तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी रजनीकांत गायकवाड यांनी ही जागा ग्रामपंचायतीची असल्याचे सांगितले होते</span>, <span lang="mr" xml:lang="mr">तर विद्यमान ग्रामपंचायत अधिकारी उमेश जाधव यांनी अभिलेखात रस्त्याची नोंद नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा रस्ता नेमका ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवर आहे का</span>, <span lang="mr" xml:lang="mr">याची शासकीय मोजणी करून मालकी हक्क निश्चित करण्याची मागणी जोर धरत आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>       </span>या कामासाठी स्वप्नील चंद्रकांत गवळी यांची ठेकेदार म्हणून नियुक्ती कागदपत्रांवर दाखवण्यात आली आहे. मात्र</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">उपलब्ध कागदपत्रांमध्ये चक्क कोऱ्या स्टॅम्प पेपरवर ठेकेदाराची सही जोडलेली असल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे. या कराराची आणि सहीची सत्यता तपासण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच या कामाच्या मोजमाप पुस्तिकेवर तत्कालीन सरपंच सुरेखा निवृत्ती कुंभार आणि तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी रविकांत संपकाळ यांच्या स्वाक्षऱ्या असल्याचा उल्लेख आहे. </span></span><span lang="hi" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="hi">यामुळे मोजमाप पुस्तिकेत नमूद केलेली रस्त्याची लांबी</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="hi" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="hi">रुंदी</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="hi" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="hi">काँक्रीटची जाडी</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="hi" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="hi">वापरलेले साहित्य आणि प्रत्यक्ष कामाचे प्रमाण यांची</span><span lang="hi" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="hi"> </span><span lang="hi" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="hi">जागेवर प्रत्यक्ष पाहणी करून काटेकोर पडताळणी करणे आवश्यक आहे<strong>.</strong></span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">कामाचे बिल अदा झाले असल्यास त्याची मूळ प्रत</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">बिल क्रमांक</span>, <span lang="mr" xml:lang="mr">दिनांक</span>, <span lang="mr" xml:lang="mr">ठेकेदाराचा जीएसटी तपशील</span>, <span lang="mr" xml:lang="mr">बँक खाते</span>, <span lang="mr" xml:lang="mr">व्हाउचर आणि चेक व्यवहाराची माहिती सार्वजनिक करावी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">अशी मागणीही लावून धरण्यात आली आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>       </span>दरम्यान</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">२७ जानेवारी रोजी गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देऊनही या प्रकरणातील चौकशीचा अंतिम अहवाल अद्याप प्रलंबित आहे. एका अधिकाऱ्याचा जबाब मिळणे अद्याप बाकी असल्यामुळे अहवाल तयार झालेला नाही</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे कारण प्रशासनाकडून दिले जात आहे. मात्र</span>, <span lang="mr" xml:lang="mr">५ ऑगस्ट रोजी विस्ताराधिकाऱ्यांकडे पाच पानी निवेदन सादर करूनही कारवाईला विलंब होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सार्वजनिक निधीतील प्रत्येक रुपयाचा हिशोब जनतेला मिळणे हा नागरिकांचा अधिकार असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">एका निश्चित कालमर्यादेत निष्पक्ष चौकशी पूर्ण करून अहवाल जाहीर करावा</span>, <span lang="mr" xml:lang="mr">अशी ठाम भूमिका दत्तात्रय शिंदे यांनी मांडली आहे. या संपूर्ण प्रकरणात कोणालाही विनाकारण लक्ष्य करण्याचा उद्देश नसून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">जनतेच्या पैशाचा योग्य विनियोग झाला किंवा नाही</span>, <span lang="mr" xml:lang="mr">हे पारदर्शक चौकशीतून समोर आले पाहिजे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे त्यांनी स्पष्ट केले आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/there-is-no-entry-in-the-road-register-then-how/article-4101</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/there-is-no-entry-in-the-road-register-then-how/article-4101</guid>
                <pubDate>Thu, 27 Aug 2026 18:01:52 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/whatsapp-image-2026-08-27-at-5.25.50-pm.jpeg"                         length="240809"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>उत्सवांच्या दिखाव्यापेक्षा वास्तव महत्त्वाचे; दहिवडीतील परिसंवादात तज्ज्ञांचे मत</title>
                                    <description><![CDATA[<p>दहिवडीत शिवसंकल्प फाउंडेशनतर्फे 'महाराष्ट्रातील समकालीन प्रश्न' विषयावर परिसंवाद. डॉ. दीपक पवार, डॉ. प्रकाश परब व मान्यवरांचे ज्वलंत मुद्द्यांवर मार्गदर्शन.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/experts-opined-at-a-seminar-in-dahiwadi-that-reality-is/article-4057"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/whatsapp-image-2026-08-26-at-5.18.18-pm.jpeg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">दहिवडी: </span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">मराठी माणूस केवळ डीजे</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">ढोल-ताशे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">भव्य मिरवणुका आणि पूर्व गौरवाच्या आठवणीं मध्ये रमून राहिला</span>, <span lang="mr" xml:lang="mr">तर त्याच्या हक्काच्या जमिनी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">व्यवसाय आणि रोजगाराच्या बहुमूल्य संधी इतर घटकांच्या हातात जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता उत्सवांच्या बाह्य भपक्यात आणि देखाव्यां मध्ये न रमता समाजाने शिक्षण</span>, <span lang="mr" xml:lang="mr">रोजगार</span>, <span lang="mr" xml:lang="mr">आर्थिक स्वावलंबन आणि वास्तव प्रश्नांवर गांभीर्याने विचार करण्याची नितांत गरज आहे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे रोखठोक प्रतिपादन मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी केले आहे. शिवसंकल्प फाउंडेशनच्या वतीने दहिवडी येथे आयोजित ‘महाराष्ट्रातील समकालीन प्रश्न’ या विषयावरील विशेष परिसंवादात ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>       </span>दहिवडी येथे पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण परिसंवादाचे आयोजन शिवसंकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष अभयसिंह जगताप यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाषा सल्लागार समितीचे सदस्य डॉ. प्रकाश परब</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">प्रा. रोहित पाटील</span>, <span lang="mr" xml:lang="mr">पत्रकार प्राजक्ता जोशी यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कविता म्हेत्रे यांनी केले. यावेळी बोलताना डॉ. दीपक पवार यांनी मराठी तरुणांना भविष्याचा वेध घेत केवळ सोशल मीडिया वरील स्टेटस आणि उत्सवांपुरते मर्यादित न राहता हक्काच्या अधिकारांसाठी सजग होण्याचे आवाहन केले.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>      </span>या परिसंवादात इतर वक्त्यांनीही महाराष्ट्रा पुढील विविध ज्वलंत प्रश्नांवर सखोल प्रकाश टाकला. डॉ. प्रकाश परब यांनी आपल्या मनोगतात</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">सद्यस्थितीत समाजाची वाटचाल बौद्धिक ऱ्हास आणि सांस्कृतिक सपाटी करणाच्या दिशेने सुरू असल्याची खंत व्यक्त केली. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतल्या शिवाय प्रगती होत नाही हा एक मोठा भ्रम असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">मातृभाषेचे महत्त्व अधोरेखित करतानाच सुजाण व विचारशील नागरिकांनी राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दुसरीकडे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">प्रा. रोहित पाटील यांनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकामुळे महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील राज्यांवर होणाऱ्या संभाव्य अन्यायाबद्दल चिंता व्यक्त केली. लोकसंख्या नियंत्रणाच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या राज्यांना त्याचा फटका बसू नये</span>, <span lang="mr" xml:lang="mr">याविषयी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>         </span>विकासाच्या मुद्द्यावर बोलताना पत्रकार प्राजक्ता जोशी यांनी</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">स्थानिकांना त्यांच्या मूळ परिसरा पासून विस्थापित करून आणि पर्यावरणाचा महाविनाश करून राबविला जाणारा तथाकथित विकास कितपत योग्य आहे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असा परखड सवाल उपस्थित केला. विकास हा स्थानिकांच्या गरजा</span>, <span lang="mr" xml:lang="mr">पर्यावरण आणि संस्कृतीशी सुसंगत असावा</span>, <span lang="mr" xml:lang="mr">तरच तो खऱ्या अर्थाने शाश्वत ठरेल</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे आयोजक अभयसिंह जगताप यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की</span>, <span lang="mr" xml:lang="mr">आजचा समाज हळूहळू जाती पातीच्या भिंतींमध्ये आणि धर्म धंद्यांमध्ये अडकत चालला असून </span>'<span lang="mr" xml:lang="mr">देश प्रथम</span>' <span lang="mr" xml:lang="mr">ही भावना मागे पडत आहे. समाजात वैचारिक प्रबोधन व्हावे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">उत्तम विचारांची देवाण घेवाण व्हावी आणि विविध विषयांवर मंथन घडवून आणण्यासाठीच अशा व्यासपीठांची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या परिसंवादाच्या माध्यमातून भाषा</span>, <span lang="mr" xml:lang="mr">संस्कृती</span>, <span lang="mr" xml:lang="mr">राजकारण आणि सामाजिक प्रश्नांवर झालेली खुली चर्चा उपस्थितांसाठी अत्यंत विचार प्रवर्तक ठरली.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/experts-opined-at-a-seminar-in-dahiwadi-that-reality-is/article-4057</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/experts-opined-at-a-seminar-in-dahiwadi-that-reality-is/article-4057</guid>
                <pubDate>Wed, 26 Aug 2026 18:05:02 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/whatsapp-image-2026-08-26-at-5.18.18-pm.jpeg"                         length="135685"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>दहिवडीतील मार्डी चौकातील अतिक्रमणा विरोधात नागरिक आक्रमक; १ सप्टेंबरला आंदोलनाचा इशारा</title>
                                    <description><![CDATA[<p>दहिवडीतील मार्डी चौकातील अतिक्रमणाविरोधात नागरिकांचा एल्गार. ४ दिवसांत कारवाई न झाल्यास १ सप्टेंबर २०२६ रोजी आंदोलनाचा नगरपंचायतीला इशारा.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/aggressive-citizens-against-encroachment-in-mardi-chowk-in-dahiwadi-warning/article-4053"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/whatsapp-image-2026-08-26-at-3.16.30-pm.jpeg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">दहिवडी: </span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">दहिवडी शहराच्या मध्यवर्ती भागातील मार्डी चौकात दिवसें दिवस वाढत चाललेल्या बेकायदा अतिक्रमणामुळे सामान्य नागरिक आणि वाहन चालकांची मोठी कुचंबणा होत असून</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या दहिवडी नगरपंचायत प्रशासना विरुद्ध नागरिकांचा रोष उच्चांकावर पोहोचला आहे. प्रशासनाच्या या बेफिकीर आणि निष्क्रीय कारभाराचा निषेध म्हणून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">आगामी चार दिवसांत मार्डी चौकातील अतिक्रमणावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्यास येत्या १ सप्टेंबर २०२६ रोजी तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन छेडण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>       </span>मार्डी चौकातील हे वाढते अतिक्रमण तात्काळ हटवून रस्ते मोकळे करावेत</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">या प्रमुख मागणीसाठी दादासो शंकर जाधव आणि संभाजी ज्ञानदेव पाटोळे यांनी २८ जुलै २०२६ रोजी दहिवडी नगरपंचायत प्रशासनाला अधिकृतपणे लेखी निवेदन सादर केले होते. या चौकात सार्वजनिक जागेवर व रस्त्यांवर अनधिकृत ताबा घेतल्यामुळे दररोज ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना</span>, <span lang="mr" xml:lang="mr">महिलांना</span>, <span lang="mr" xml:lang="mr">शाळकरी मुलांना आणि वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र</span>, <span lang="mr" xml:lang="mr">निवेदनाची पायमल्ली करत तब्बल वीस ते पंचवीस दिवस उलटून गेल्यानंतरही नगरपंचायत प्रशासनाने ना कोणती पाहणी केली</span>, <span lang="mr" xml:lang="mr">ना जागेच्या कागदपत्रांची कायदेशीर तपासणी केली आणि ना नागरिकांना किंवा तक्रारदारांना कोणतीही ठोस माहिती दिली. प्रशासनाच्या या संथ आणि संशयास्पद भूमिकेमुळे "नगपंचायतीचा नक्की कोणाला पाठबळ आहे आणि प्रशासन कोणाचे भले करत आहे</span>?" <span lang="mr" xml:lang="mr">असा संतप्त सवाल आता सामान्य जनतेतून विचारला जात आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>        </span>प्रशासनाच्या अशा टोल वाटोलू आणि हलगर्जी कारभारामुळे संतप्त झालेल्या तक्रार दारांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. पुढील चार दिवसांच्या आत प्रशासनाने संबंधित जागेची प्रत्यक्ष पाहणी करून नियमा नुसार अतिक्रमण हटवण्याची कारवाई न केल्यास</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">आगामी १ सप्टेंबर २०२६ रोजी मार्डी चौक येथे लोकशाही व कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असा अल्टिमेटम देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे शहरात उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस व कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नाला सर्वस्वी दहिवडी नगरपंचायत प्रशासनच जबाबदार राहील</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी प्रशासनावर वचक राहावा म्हणून सदर निवेदनाची प्रत माहिती व योग्य कारवाईसाठी दहिवडी पोलीस ठाण्यालाही सुपूर्द करण्यात आली आहे.</span></span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/aggressive-citizens-against-encroachment-in-mardi-chowk-in-dahiwadi-warning/article-4053</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/aggressive-citizens-against-encroachment-in-mardi-chowk-in-dahiwadi-warning/article-4053</guid>
                <pubDate>Wed, 26 Aug 2026 17:31:53 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/whatsapp-image-2026-08-26-at-3.16.30-pm.jpeg"                         length="212443"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>मुळीकवस्तीच्या ७०० एकर शेतीचा प्रश्न ऐरणीवर; उपसा सिंचन योजना थांबवण्याची मागणी</title>
                                    <description><![CDATA[<p>दहिवडीतील मुळीकवस्ती येथे ७०० एकर शेतीला पाण्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप. शेखर गोरे यांनी चेंबर मंजूर होईपर्यंत उपसा सिंचन योजनेचे काम थांबवण्याचे दिले निर्देश.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/demand-to-stop-sub-irrigation-scheme-on-the-issue-of-700/article-4051"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/whatsapp-image-2026-08-26-at-3.16.06-pm-(1).jpeg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">दहिवडी: </span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">दहिवडी परिसरातील बहुचर्चित </span><span style="font-size:16pt;line-height:107%;">'<span lang="mr" xml:lang="mr">गुरुवर्य कै. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेच्या</span>' <span lang="mr" xml:lang="mr">कामात स्थानिक शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्याया वरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. मुळीकवस्ती परिसरातील सुमारे ७०० एकर शेतीला सिंचनाचा लाभ मिळण्या पासून जाणीव पूर्वक वंचित ठेवले जात असल्याच्या शेतकरी तक्रारीची गंभीर दखल घेत</span>, <span lang="mr" xml:lang="mr">जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी थेट घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. जोपर्यंत मुळीकवस्तीतील ७०० एकर शेती ओलिताखाली आणण्यासाठी आवश्यक असलेल्या चेंबरचे काम प्रत्यक्षात मंजूर होऊन सुरू होत नाही</span>, <span lang="mr" xml:lang="mr">तोपर्यंत या उपसा सिंचन योजनेचे पुढील सर्व काम ताबडतोब बंद ठेवण्याचे सक्त आदेश त्यांनी संबंधित अधिकारी व कंत्राट दारांना दिले आहेत.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"><span>         </span><span lang="mr" xml:lang="mr">मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार</span>, <span lang="mr" xml:lang="mr">दहिवडी अंतर्गत येणाऱ्या मुळीकवस्ती येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीला सिंचनाचे पाणी मिळावे यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र</span>, <span lang="mr" xml:lang="mr">स्थानिक नेत्यांचा दबाव आणि प्रशासकीय मनमानी कारभारामुळे या भागाला डावलले जात असल्याची संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. या अन्याया विरोधात परिसरातील शेतकरी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">कार्यकर्ते व ग्रामस्थांनी एकत्र येत शेखर गोरे यांच्याकडे कैफियत मांडली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शेखर गोरे यांनी तातडीने मुळीकवस्ती गाठली आणि प्रत्यक्ष सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान लाभ क्षेत्रातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"><span>   </span><span>  </span><span>  </span><span lang="mr" xml:lang="mr">घटना स्थळावरील वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतर शेखर गोरे यांनी तीव्र आक्रमक भूमिका घेत जलसंपदा विभागाचे अधिकारी व कंत्राटदारांना खडसावले. "जोपर्यंत मुळीकवस्तीतील ७०० एकर शेतीला पाणी मिळण्याचा मार्ग सुकर करणारे चेंबर मंजूर होत नाही आणि त्याचे काम प्रत्यक्ष सुरू होत नाही</span>, <span lang="mr" xml:lang="mr">तोपर्यंत या उपसा सिंचन योजनेचे एकही पुढचे काम चालू दिले जाणार नाही</span>," <span lang="mr" xml:lang="mr">असा कडक व स्पष्ट इशारा त्यांनी दिला. शेखर गोरे यांनी घेतलेल्या या ठाम आणि शेतकऱ्यांच्या बाजूच्या भूमिके मुळे स्थानिक ग्रामस्थांमधून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे. या दणक्यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल</span>, <span lang="mr" xml:lang="mr">अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><strong><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></strong></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/demand-to-stop-sub-irrigation-scheme-on-the-issue-of-700/article-4051</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/demand-to-stop-sub-irrigation-scheme-on-the-issue-of-700/article-4051</guid>
                <pubDate>Wed, 26 Aug 2026 17:16:34 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/whatsapp-image-2026-08-26-at-3.16.06-pm-%281%29.jpeg"                         length="152746"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>श्रीराम साखर कारखाना बंद पाडण्याचा सरकारचा डाव; राजू शेट्टींचा गंभीर आरोप</title>
                                    <description><![CDATA[<p>फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखाना बंद पाडण्याचा सरकारचा डाव असल्याचा राजू शेट्टींचा आरोप. उसाला प्रतिटन ५५०० रुपये दराची मागणी करत तीव्र आंदोलनाचा इशारा.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/satara/raju-shettys-serious-allegation-of-governments-plot-to-close-sriram/article-4043"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/images-(8)1.jpg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">फलटण: </span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">राज्यातील प्रमुख सहकारी साखर कारखान्यां पैकी एक असलेल्या फलटण येथील </span><span style="font-size:16pt;line-height:107%;">'<span lang="mr" xml:lang="mr">श्रीराम सहकारी साखर कारखाना</span>' <span lang="mr" xml:lang="mr">बंद पाडण्यासाठी थेट राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचा खळबळजनक आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. सहकारी साखर कारखाने आधीच विविध अडचणींचा सामना करत असताना</span>, <span lang="mr" xml:lang="mr">दुसरीकडे खासगी कारखान्यांना जाणीव पूर्वक प्रोत्साहन दिले जात आहे का</span>? <span lang="mr" xml:lang="mr">असा संतप्त सवाल उपस्थित करत त्यांनी शासन धोरणांवर कडाडून टीका केली आहे. फलटण येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते</span>, <span lang="mr" xml:lang="mr">यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर</span>, <span lang="mr" xml:lang="mr">तालुकाध्यक्ष नितीन यादव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>     </span>यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी देशातील साखर बाजारातील अनिर्बंध दरवाढीवर आणि उत्पादनावर लक्ष वेधले. गतवर्षी ऑगस्ट २०२५ मध्ये साखरेचा दर सुमारे ३७०० रुपये प्रति क्विंटल होता</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">जो यंदाच्या ऑगस्टमध्ये थेट ६७०० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे. एका वर्षाच्या कालावधीत साखरेच्या दरात तब्बल ३००० रुपयांची वाढ झाली असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">अलीकडच्या काळात किलोमागे २० रुपयांची अचानक झालेली वाढ थक्क करणारी आहे. देशात २०२४-२५ मध्ये २६० लाख टन आणि २०२५-२६ मध्ये २९० लाख टन साखरेचे बंपर उत्पादन झाले आहे. त्यातच मागील हंगामातील ५० लाख टनांचा प्रारंभिक साठा शिल्लक असतानाही</span>, <span lang="mr" xml:lang="mr">देशात साखरेचा तुटवडा नसताना दर गगनाला भिडण्या मागील नेमके कारण काय</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला. तसेच</span>, <span lang="mr" xml:lang="mr">साखरेच्या वाढलेल्या दराचा प्रत्यक्ष फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार का</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असा परखड प्रश्न त्यांनी सरकारला विचारला. सध्याच्या बाजार भावानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन किमान ५५०० रुपये दर मिळणे आवश्यक असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">मागील वर्षी पुरवलेल्या ऊसा साठी अतिरिक्त १००० रुपये प्रतिटन देण्यात यावेत</span>, <span lang="mr" xml:lang="mr">अशी आक्रमक मागणी त्यांनी केली.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>     </span>श्रीराम कारखाना हा केवळ साखर उत्पादनाचा एक प्रकल्प नसून</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">तो फलटण तालुक्यातील हजारो शेतकरी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">मजूर</span>, <span lang="mr" xml:lang="mr">वाहतूकदार आणि या उद्योगावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अवलंबून असलेल्या विविध व्यावसायिकांच्या अर्थकारणाचा कणा आहे. हा कारखाना पूर्ववत सुरू झाल्यास शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळण्या बरोबरच वाहतूक</span>, <span lang="mr" xml:lang="mr">व्यापार आणि पूरक व्यवसायांना मोठी गती मिळून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे शेट्टी यांनी स्पष्ट केले. मात्र</span>, <span lang="mr" xml:lang="mr">कारखाना दीर्घकाळ बंद राहिल्यास त्याचा अत्यंत विपरीत परिणाम संपूर्ण परिसराच्या आर्थिक घडीवर होईल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत श्रीराम कारखाना सुरू झालाच पाहिजे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">हीच सर्व शेतकरी व सभासदांची मुख्य मागणी आहे. कारखाना त्वरित सुरू करण्यासाठी आणि शासनावर योग्य तो दबाव आणण्यासाठी गरज भासल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्यात येईल</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असा कडक  इशाराही माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.</span></span></p>
<p class="MsoNormal"><strong><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></strong></p>
<p class="MsoNormal"><strong><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></strong></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>सातारा</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/satara/raju-shettys-serious-allegation-of-governments-plot-to-close-sriram/article-4043</link>
                <guid>https://www.lokprant.com/satara/raju-shettys-serious-allegation-of-governments-plot-to-close-sriram/article-4043</guid>
                <pubDate>Wed, 26 Aug 2026 09:13:46 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/images-%288%291.jpg"                         length="20390"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        