<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.lokprant.com/june-news/tag-5725" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Lokprant RSS Feed Generator</generator>
                <title>जुन्नर बातम्या - Lokprant</title>
                <link>https://www.lokprant.com/tag/5725/rss</link>
                <description>जुन्नर बातम्या RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>पुणे-नाशिक रेल्वेमार्गासाठी एल्गार; क्रांतीदिनी महामार्गावर चक्का जाम आंदोलन</title>
                                    <description><![CDATA[<p>पुणे-नाशिक सेमी-हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलल्याने उत्तर महाराष्ट्र व पुणे पट्ट्यात संताप. क्रांतीदिनी महामार्गावर चक्का जाम आंदोलन, बाळासाहेब थोरातांचा इशारा.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/pune/chakka-jam-agitation-on-elgar-krantidini-highway-for-pune-nashik-railway/article-3527"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/new-project-2026-08-09t162333.669.webp" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">पुणे: </span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">नाशिक-पुणे सेमी-हायस्पीड सरळ रेल्वेमार्गाचा मूळ मार्ग बदलण्याच्या निर्णया विरुद्ध उत्तर महाराष्ट्र आणि पुणे पट्ट्यात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. क्रांतीदिनाचे औचित्य साधून रविवारी (ता. ९) नाशिक</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">सिन्नर</span>, <span lang="mr" xml:lang="mr">संगमनेर</span>, <span lang="mr" xml:lang="mr">जुन्नर</span>, <span lang="mr" xml:lang="mr">मंचर</span>, <span lang="mr" xml:lang="mr">चाकण आणि आळेफाटा परिसरात हजारो ग्रामस्थ</span>, <span lang="mr" xml:lang="mr">शेतकरी व विविध पक्षांचे नेते रस्त्यावर उतरले. पुणे-नाशिक महामार्गावर एकाच वेळी जोरदार ‘चक्का जाम’ आंदोलन करत शासनाच्या नवीन मार्ग बदलाच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “रेल्वे आमच्या हक्काची</span>, <span lang="mr" xml:lang="mr">नाही कुणाच्या बापाची” आणि “नाशिक-पुणे सरळ रेल्वे हीच एकच मागणी” अशा नारांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>       </span>सुमारे १६ हजार कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मूळ मार्ग खेड</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">आंबेगाव आणि जुन्नर यांसारख्या कृषीप्रधान तालुक्यांमधून आखण्यात आला होता. यामुळे या भागातील शेतमाल वाहतुकीला आणि औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळण्याची दाट शक्यता होती. मात्र</span>, <span lang="mr" xml:lang="mr">जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील जागतिक दर्जाच्या ‘जीएमआरटी’ (</span>GMRT) <span lang="mr" xml:lang="mr">दुर्बिणीला धोका निर्माण होत असल्याचे कारण पुढे करत रेल्वे मंत्रालयाने अचानक या मार्गात बदल करण्याचा घाट घातला. स्थानिक जनतेला विश्वासात न घेता घेतलेला हा निर्णय या भागातील विकासाला बाधा पोहोचवणारा आणि अन्यायकारक असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>      </span>या आंदोलना दरम्यान विविध भागांत अभूतपूर्व जनसमुदाय दिसून आला. संगमनेर येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हिवरगाव पावसा टोलनाक्यावर प्रचंड चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी संताप व्यक्त करत म्हटले की</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">केंद्र व राज्य सरकारसह संबंधित सर्व विभागांची मंजुरी असताना हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अचानक थांबला कसा आणि या चांगल्या कामात कोणी खोडा घातला</span>, <span lang="mr" xml:lang="mr">हे जनतेला समजले पाहिजे. जेथे रेल्वेचे काम थांबले आहे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">तेथूनच पुन्हा सरळ मार्गाने काम सुरू करावे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">आम्ही अटकेला किंवा दडपशाहीला घाबरणारे नाही</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>       </span>दुसरीकडे</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">सिन्नर आणि संगमनेर तालुक्यातील तब्बल चार हजारांहून अधिक नागरिकांनी महामार्गावरील गोंदे येथे नाशिक-पुणे महामार्ग व समृद्धी महामार्गावर एकत्र येत रास्ता रोको केला. चाकण</span>, <span lang="mr" xml:lang="mr">मंचर</span>, <span lang="mr" xml:lang="mr">नारायणगाव आणि आळे फाटा परिसरातही नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आंदोलकांनी प्रवाशांची कोणतीही मोठी गैरसोय होऊ नये म्हणून संयम पाळत पोलिसांना सहकार्य केले आणि महामार्गावर वाहतूक संथगतीने सुरू ठेवली. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. जर शासनाने या जनभावनांचा व मागण्यांचा तातडीने फेरविचार केला नाही</span>, <span lang="mr" xml:lang="mr">तर यापेक्षाही अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी आणि रेल्वे कृती समितीने दिला आहे. राजकारण बाजूला सारून या प्रकल्पासाठी सर्वपक्षीय नेते व ग्रामस्थ एकत्र लढा देत असल्याने शासनाला यावर काय निर्णय घ्यावा लागतो</span>, <span lang="mr" xml:lang="mr">याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"> </span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/pune/chakka-jam-agitation-on-elgar-krantidini-highway-for-pune-nashik-railway/article-3527</link>
                <guid>https://www.lokprant.com/pune/chakka-jam-agitation-on-elgar-krantidini-highway-for-pune-nashik-railway/article-3527</guid>
                <pubDate>Mon, 10 Aug 2026 12:07:06 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/new-project-2026-08-09t162333.669.webp"                         length="31566"                         type="image/webp"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; २० वर्षांनंतर कायम नियुक्तीचा मार्ग मोकळा</title>
                                    <description><![CDATA[<p>महाराष्ट्रातील समग्र शिक्षा अभियानातील ३,२७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगानुसार समकक्ष पदांवर सामावून घेण्याचा ऐतिहासिक शासन निर्णय जारी.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/pune/a-big-relief-to-samagra-shiksha-employees-after-20-years/article-3493"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/samagra-shiksha-abhiyan-(1).jpg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">जुन्नर:</span></strong><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"> </span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">समग्र शिक्षा अभियानांतर्गत गेल्या तब्बल २० वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने सेवा बजावणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासा दायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. या कर्मचाऱ्यांच्या समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य (</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">Supernumerary) </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">पदांवर नियुक्तीचा मार्ग आता अधिकृतरीत्या मोकळा झाला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून याबाबतचा महत्त्वाचा शासन निर्णय ४ ऑगस्ट रोजी पारित करण्यात आला असून</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील समग्र शिक्षा अभियानातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा संघर्ष समितीचे प्रसिद्धी प्रमुख रवींद्र तोरणे यांनी या ऐतिहासिक निर्णयाची माहिती दिली आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"><span>      </span><span lang="mr" xml:lang="mr">प्राप्त माहितीनुसार</span></span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">राज्यामध्ये ‘समग्र शिक्षा’ अभियान अंतर्गत एकूण ३</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">,</span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">२७६ कर्मचारी मागील वीस वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर प्रामाणिकपणे सेवेत कार्यरत होते. यामध्ये केवळ पुणे जिल्ह्यातीलच ९४ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना समकक्ष वेतन श्रेणीतील नियमित व अधिसंख्य पदांवर सामावून घेण्यात यावे</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">या प्रमुख मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध स्तरांवर संघर्ष समितीच्या माध्यमातून तीव्र पाठपुरावा सुरू होता.</span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"><span>    </span><span lang="mr" xml:lang="mr">या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली २२ जुलै २०२४ रोजी सह्याद्री अतिथी गृहात एक उच्चस्तरीय बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर शिफारसी करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली</span></span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">जिची प्रशासकीय कारणास्तव ४ जून २०२५ रोजी पुनर्रचना करण्यात आली. या समितीला १० सप्टेंबर आणि १२ नोव्हेंबर २०२५ रोजी मुदतवाढ देण्यात आल्यानंतर</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">२६ नोव्हेंबर २०२५ रोजी या समितीने शासनाला आपला सविस्तर अहवाल सादर केला. या समितीच्या सकारात्मक शिफारसींच्या आधारे राज्य मंत्रिमंडळाने २ जुलै २०२६ रोजी झालेल्या बैठकीत या महत्त्वपूर्ण प्रस्तावाला अधिकृत मंजुरी दिली होती.</span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"><span>    </span><span lang="mr" xml:lang="mr">मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ४ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार</span></span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">३० जून २०२६ पर्यंत दहा वर्षे किंवा त्याहून अधिक काळ अखंडित कंत्राटी सेवा पूर्ण केलेल्या एकूण ३</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">,</span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">२७६ कर्मचाऱ्यांसाठी समकक्ष वेतन श्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करून त्यावर सामावून घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"><span>    </span><span lang="mr" xml:lang="mr">या नव्या निर्णयानुसार</span></span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">संबंधित कर्मचारी सध्या जी पदे सांभाळत आहेत</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">ती शालेय शिक्षण विभाग किंवा इतर विभागांतील उपलब्ध नियमित मंजूर पदांशी समकक्ष ठरवली जातील. सदर पदांचे कामाचे स्वरूप</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">कर्तव्ये</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">जबाबदाऱ्या आणि सेवाप्रवेश नियम विचारात घेऊन वित्त विभागाच्या सहमतीने त्यांची वेतनश्रेणी निश्चित केली जाणार आहे. विशेष म्हणजे</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार होणार असून त्यांचे सध्याचे वेतन पूर्णपणे संरक्षित राहील. तसेच निम्न स्तरावरील मूळ वेतना सोबत महागाई भत्ता (</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">DA) </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">आणि प्रवास भत्ता (</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">TA) </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">देखील अनुज्ञेय असणार आहे. मात्र</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">तांत्रिक संवर्गातील कर्मचारी या निर्णयाच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहेत.</span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"><span>    </span><span lang="mr" xml:lang="mr">शासनाच्या या ऐतिहासिक व न्याय्य निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. राज्य शासनाच्या या भूमिकेबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस</span></span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">सुनेत्रा पवार</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">राज्यमंत्री पंकज भोयर यांसह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जिल्हा संघर्ष समितीच्या वतीने अध्यक्षा योगिता बलाक्षे</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">नामदेव गवळी आणि रवींद्र तोरणे यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.</span></p>
<p class="MsoNormal"><strong><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></strong></p>
<p class="MsoNormal"><strong><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></strong></p>
<p class="MsoNormal"><strong><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></strong></p>
<p class="MsoNormal"><strong><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></strong></p>
<p class="MsoNormal"><strong><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></strong></p>
<p class="MsoNormal"><strong><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></strong></p>
<p class="MsoNormal"><strong><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></strong></p>
<p class="MsoNormal"><strong><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></strong></p>
<p class="MsoNormal"><strong><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></strong></p>
<p class="MsoNormal"><strong><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></strong></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुणे</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/pune/a-big-relief-to-samagra-shiksha-employees-after-20-years/article-3493</link>
                <guid>https://www.lokprant.com/pune/a-big-relief-to-samagra-shiksha-employees-after-20-years/article-3493</guid>
                <pubDate>Sat, 08 Aug 2026 18:25:34 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/samagra-shiksha-abhiyan-%281%29.jpg"                         length="14373"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        