<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.lokprant.com/amol-fox/tag-5920" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Lokprant RSS Feed Generator</generator>
                <title>अमोल कोल्हे - Lokprant</title>
                <link>https://www.lokprant.com/tag/5920/rss</link>
                <description>अमोल कोल्हे RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>अदानी जलविद्युत प्रकल्पावरून जुन्नर मध्ये विरोध; कोल्हेंचा संतप्त सवाल</title>
                                    <description><![CDATA[<p>जुन्नरमधील अंजनावळे येथील प्रस्तावित अदानी जलविद्युत प्रकल्पा विरोधात खासदार अमोल कोल्हे आक्रमक. २१ ऑगस्टची जन सुनावणी स्थगित.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/angry-protestors-question-in-junnar-over-adani-hydropower-project/article-3798"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/images-(39).jpg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">जुन्नर: </span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">जुन्नर तालुक्यातील अंजनावळे येथे प्रस्तावित करण्यात आलेल्या अदानी जलविद्युत प्रकल्पामुळे गेल्या दहा दिवसांपासून संपूर्ण परिसरात तीव्र विरोध पाहायला मिळत असून</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">या प्रकल्पा विरोधातील वातावरण चांगलेच तापले आहे. शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या प्रकल्पावर आक्रमक भूमिका घेत</span>, "<span lang="mr" xml:lang="mr">राज्यात माळशेज-भोरांडे प्रकल्पासारखे तब्बल ५९ प्रकल्प प्रस्तावित आहेत</span>, <span lang="mr" xml:lang="mr">ज्यातून ८० हजार मेगा वॅट वीज निर्मिती होणार आहे. मात्र</span>, <span lang="mr" xml:lang="mr">आगामी २०३० मध्ये महाराष्ट्राला या एवढ्या मोठ्या ऊर्जेची गरजच भासणार नाही</span>, <span lang="mr" xml:lang="mr">मग हे विनाशकारी प्रकल्प सह्याद्रीच्या पर्वत रांगांवर लादण्याची गरज काय</span>?" <span lang="mr" xml:lang="mr">असा सणसणीत सवाल उपस्थित केला आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>         </span>जुन्नर येथे आयोजित एका विशेष पत्रकार परिषदेत डॉ. कोल्हे यांनी चित्रफितीच्या माध्यमातून या प्रकल्पाचे संभाव्य धोके सविस्तरपणे स्पष्ट केले. हा प्रकल्प केवळ आदिवासी भागासाठीच नव्हे</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">तर संपूर्ण पूर्व भागासाठी एक मोठी धोक्याची घंटा असल्याचे त्यांनी नमूद केले. जलविद्युत किंवा स्टोरेज प्रकल्पाचा मुखवटा घालून रेटला जाणारा हा प्रकल्प प्रत्यक्षात पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे. या प्रकल्पासाठी मोठे बोगदे तयार करावे लागणार असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">त्यासाठी होणारे स्फोट (ब्लास्टिंग) सह्याद्रीच्या अस्तित्वासाठी धोकादायक ठरू शकतात. विशेष म्हणजे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">ज्या भागात हा प्रकल्प प्रस्तावित आहे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">तो परिसर भूकंप प्रवण क्षेत्र (झोन ३) आणि पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात मोडत असल्याने भविष्यात गंभीर संकटांना सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>         </span>या प्रकल्पा विरोधात आदिवासी बांधवांसह तालुक्यातील नागरिकांमध्ये तीव्र रोष पसरला असून</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">पुणे येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाबाहेर जनसुनावणी रद्द करण्यासाठी जोरदार आंदोलन छेडण्यात आले आहे. गेल्या ९ ऑगस्ट पासून जन सुनावणीच्या विरोधात जुन्नर येथे सुरज वाजगे हे आमरण उपोषणाला बसले असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">खासदार डॉ. कोल्हे यांनी प्रत्यक्ष जाऊन त्यांची भेट घेतली आणि आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>           </span>दरम्यान</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">वाढता विरोध आणि जनक्षोभ पाहता खासदार डॉ. कोल्हे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर २१ ऑगस्ट रोजी होणारी जनसुनावणी तात्पुरती स्थगित करण्यात आली असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">या प्रकल्पाबाबत १९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">बाधित गावांचे सरपंच आणि पर्यावरण प्रेमी यांची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सह्याद्रीचे पर्यावरण आणि स्थानिकांचे हित जपण्यासाठी या प्रकल्पा विरोधातील लढा अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"> </span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/angry-protestors-question-in-junnar-over-adani-hydropower-project/article-3798</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/angry-protestors-question-in-junnar-over-adani-hydropower-project/article-3798</guid>
                <pubDate>Mon, 17 Aug 2026 19:58:23 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/images-%2839%29.jpg"                         length="26701"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>मोदींसोबत २० मिनिटांची चर्चा; अमोल कोल्हेंनी सांगितला भेटीचा तपशील</title>
                                    <description><![CDATA[<p>खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गटाच्या खासदारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. नाशिक-पुणे रेल्वे व चाकण एमआयडीसीवर चर्चा; अमोल कोल्हेंनी दिली सविस्तर माहिती.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/amol-kolhe-had-a-20-minute-discussion-with-modi-and-told/article-3547"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/images-(15).jpg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">नवी दिल्ली:</span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"> संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग आला असतानाच</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील आठ खासदारांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान मोदींसोबत सुमारे २० मिनिटे सविस्तर चर्चा केली. या भेटी दरम्यान मतदार संघातील रखडलेले प्रश्न</span>, <span lang="mr" xml:lang="mr">नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प</span>, <span lang="mr" xml:lang="mr">चाकण एमआयडीसी आणि इंद्रायणी मेडिसिटी यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर गंभीर चर्चा झाल्याची माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>      </span>या भेटीत कोणत्याही राजकारणा पेक्षा पूर्णपणे मतदार संघातील विकासकामे आणि धोरणात्मक निर्णयांवर (</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">Policy Making) <span lang="mr" xml:lang="mr">भर देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी दिलेल्या माहिती नुसार</span>, <span lang="mr" xml:lang="mr">बैठकीत नाशिक-पुणे सेमी-हायस्पीड रेल्वे प्रकल्प</span>, <span lang="mr" xml:lang="mr">चाकण एमआयडीसीची दुरवस्था आणि वाढती वाहतूक कोंडी यांसारखे कळीचे मुद्दे पंतप्रधानांसमोर मांडण्यात आले. चाकणमधील रस्त्यांच्या कामासाठी ५९ कोटी रुपयांचे टेंडर मंजूर होऊनही प्रत्यक्षात परिस्थितीत सुधारणा झालेली नाही</span>, <span lang="mr" xml:lang="mr">याकडे लक्ष वेधत वाढत्या अपघातांवर चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच</span>, <span lang="mr" xml:lang="mr">महात्मा ज्योतिराव फुले</span>, <span lang="mr" xml:lang="mr">क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर </span>'<span lang="mr" xml:lang="mr">भारतरत्न</span>' <span lang="mr" xml:lang="mr">पुरस्कार प्रदान करण्यात यावा</span>, <span lang="mr" xml:lang="mr">अशी प्रमुख मागणीही या शिष्टमंडळाने केली. याशिवाय</span>, <span lang="mr" xml:lang="mr">खासदार निलेश लंके यांनी आरोग्य क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्न पंतप्रधानांसमोर मांडले.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>          </span>पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या या भेटीनंतर शरद पवार गट एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा आणि विविध राजकीय तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">खासदार अमोल कोल्हे यांनी या सर्व चर्चा स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहेत. या भेटीचा कोणताही राजकीय उद्देश</span>, <span lang="mr" xml:lang="mr">पक्षप्रवेश किंवा संभाव्य समीकरणांशी संबंध नाही</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे सांगत त्यांनी या केवळ मतदार संघाच्या विकासा साठी घेतल्याचे स्पष्ट केले. तसेच</span>, <span lang="mr" xml:lang="mr">आगामी </span>'<span lang="mr" xml:lang="mr">डिलिमिटेशन</span>' (<span lang="mr" xml:lang="mr">सीमांकन) विधेयका बाबतही बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अद्याप अस्तित्वात नसलेल्या किंवा संसदेत सादर न झालेल्या विधेयकावर आगाऊ अंदाज बांधणे योग्य नाही</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे सांगत त्यांनी राजकीय अफवांना पूर्णविराम दिला.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>       </span>चर्चे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कार्यक्षमतेचे आणि अनुभवाचे कौतुक केल्याचेही कोल्हे यांनी आवर्जून सांगितले. आरोग्य विषयक मुद्द्यांवर चर्चा सुरू असताना पंतप्रधानांनी हे गौरवोद्गार काढले. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू असल्या तरी</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">या शिष्टमंडळाने केवळ जनहिताचे आणि विकासाचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून ही भेट घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/amol-kolhe-had-a-20-minute-discussion-with-modi-and-told/article-3547</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/amol-kolhe-had-a-20-minute-discussion-with-modi-and-told/article-3547</guid>
                <pubDate>Mon, 10 Aug 2026 18:30:48 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/images-%2815%29.jpg"                         length="29187"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        