<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.lokprant.com/rahul-narwekar/tag-5978" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Lokprant RSS Feed Generator</generator>
                <title>Rahul Narwekar - Lokprant</title>
                <link>https://www.lokprant.com/tag/5978/rss</link>
                <description>Rahul Narwekar RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>संजय राऊत आक्रमक; नार्वेकरांसह निवडणूक आयोगावर गंभीर टीका</title>
                                    <description><![CDATA[<p>शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात संजय राऊतांची राहुल नार्वेकर आणि निवडणूक आयोगावर घणाघाती टीका; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/sanjay-raut-criticizes-election-commission-with-aggressive-norwegians/article-3852"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/images-(49).jpg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">मुंबई :</span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"> शिवसेना पक्ष आणि आमदारांच्या अपात्रते संदर्भातील प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. संवैधानिक संस्थांच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करत राऊत यांनी नार्वेकर आणि निवडणूक आयोगाला ‘बौद्धिक नक्षलवादी’ अशी उपमा दिली. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>         </span>सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी दरम्यान ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलेल्या युक्तिवादाचा संदर्भ देत संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. सिब्बल यांचा युक्तिवाद कायद्याच्या चौकटीत आणि अत्यंत प्रभावी असल्याचे राऊत यांनी म्हटले. शिवसेनेतील आमदारांच्या फुटीच्या प्रकरणात आधी अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय झाला असता</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">तर त्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती टाळता आली असती</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असा दावा त्यांनी केला.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>      </span>शिवसेनेतील तत्कालीन राजकीय घडामोडींचा संदर्भ देताना राऊत यांनी सांगितले की</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">काही आमदार पक्ष सोडून सुरतला गेल्यानंतरच त्यांच्या अपात्रतेची मागणी करण्यात आली होती. मात्र</span>, <span lang="mr" xml:lang="mr">त्या प्रकरणाचा निर्णय प्रलंबित असतानाच विधिमंडळातील संख्या बळाच्या आधारे पुढील प्रक्रिया करण्यात आली</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असा आरोप त्यांनी केला. यामुळे पक्षातील फुटीला वैधता मिळाल्याचे राऊत यांनी म्हटले.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>       </span>शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हा संदर्भातील निर्णयावरही राऊत यांनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केले. पक्षातील अंतर्गत वाद आणि विधिमंडळातील फुटीचा आधार घेत पक्षाचे नाव व चिन्ह दुसऱ्या गटाला देण्याच्या प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप नोंदवला. या संपूर्ण प्रक्रियेमुळे संविधानाच्या मूलभूत तत्त्वांवर परिणाम झाल्याचा आरोप त्यांनी केला.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>      </span>राहुल नार्वेकर यांच्या सार्वजनिक भूमिकेवरही राऊत यांनी सवाल उपस्थित केले. विधानसभा अध्यक्ष हे संवैधानिक पद असल्याने त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षापासून तटस्थ राहणे अपेक्षित असल्याचे राऊत यांनी म्हटले. नार्वेकर यांच्या सामाजिक माध्यमांवरील काही राजकीय संदर्भांचा दाखला देत त्यांनी त्यांच्या तटस्थतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>      </span>या प्रकरणात आपल्याला नोटीस बजावली तरी आपण त्याला सामोरे जाण्यास तयार असल्याचेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयांमुळे संविधानाच्या प्रक्रियेवर परिणाम झाला असल्याचा पुनरुच्चार करत त्यांनी या संस्थांच्या भूमिकेची कठोर शब्दांत चिकित्सा केली. दरम्यान</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">शिवसेना पक्षातील फुटीशी संबंधित प्रकरण सर्वोच्च न्यायालया समोर असल्याने या प्रकरणातील पुढील सुनावणीकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">या आरोपांवर संबंधितांकडून काय प्रतिक्रिया येते</span>, <span lang="mr" xml:lang="mr">याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/sanjay-raut-criticizes-election-commission-with-aggressive-norwegians/article-3852</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/sanjay-raut-criticizes-election-commission-with-aggressive-norwegians/article-3852</guid>
                <pubDate>Wed, 19 Aug 2026 11:07:33 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/images-%2849%29.jpg"                         length="14051"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>‘राष्ट्र प्रथम तिरंगा उत्सवा’त देशभक्तीचा जल्लोष; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन</title>
                                    <description><![CDATA[<p>मुंबईतील वरळी सी फेस येथे 'राष्ट्र प्रथम तिरंगा उत्सव' रॅली थाटात पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/inauguration-of-rally-of-patriotism-in-rashtra-pratham-tricolor-utsav/article-3563"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/ewtw-e1786375033633.jpeg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">मुंबई:</span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"> भारतीय तिरंगा हा केवळ हातात घेण्याचा ध्वज नसून तो प्रत्येक भारतीयाच्या मनामनात व अंतःकरणात वसत असलेली राष्ट्रभावना</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">संविधानाचा सन्मान आणि देशाचा स्वाभिमान आहे. नवभारत घडविण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आता देशातील प्रत्येक नागरिकाची असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली तरच हातातील तिरंग्याला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होईल</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. तिरंगा यात्रा ही केवळ एक सामान्य रॅली नसून नागरिकांमध्ये देशप्रेमी भावना जागृत करणारा एक प्रेरणादायी उपक्रम असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. वरळी सी फेस येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘राष्ट्र प्रथम तिरंगा उत्सव’ रॅलीच्या उद्घाटनाप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"><span>       </span><span lang="mr" xml:lang="mr">वरळी सी फेस येथे पार पडलेल्या या शानदार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिरंग्याचे महत्त्व विशद करताना देशाच्या प्रगतीचा आणि ‘नवभारता’च्या संकल्पनेचा आढावा घेतला. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर</span>, <span lang="mr" xml:lang="mr">सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार</span>, <span lang="mr" xml:lang="mr">कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा</span>, <span lang="mr" xml:lang="mr">मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह आमदार रवींद्र चव्हाण</span>, <span lang="mr" xml:lang="mr">अमित साटम</span>, <span lang="mr" xml:lang="mr">योगेश सागर</span>, <span lang="mr" xml:lang="mr">मिहिर कोटेचा</span>, <span lang="mr" xml:lang="mr">कॅप्टन तमिळ सेल्वन</span>, <span lang="mr" xml:lang="mr">राजहंस सिंह</span>, <span lang="mr" xml:lang="mr">प्रवीण दरेकर</span>, <span lang="mr" xml:lang="mr">प्रसाद लाड आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. हजारो मुंबईकर</span>, <span lang="mr" xml:lang="mr">तरुण</span>, <span lang="mr" xml:lang="mr">विद्यार्थी आणि एनसीसी (</span>NCC) <span lang="mr" xml:lang="mr">कॅडेट्स यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण वरळी सी फेस परिसर ‘भारत माता की जय’</span>, ‘<span lang="mr" xml:lang="mr">जय शिवाजी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">जय भवानी’ आणि ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने व देशभक्तीपर गीतांनी दुमदुमून गेला होता.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"><span>    </span><span lang="mr" xml:lang="mr">कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की</span>, <span lang="mr" xml:lang="mr">आजचा हा सोहळा पाहताना मला दोन सागर दिसत आहेत</span>, <span lang="mr" xml:lang="mr">एक समोर पसरलेला अथांग हिंद महासागर आणि दुसरा उपस्थित जनतेचा व राष्ट्रभक्तांचा तिरंग्याचा महासागर. ज्या तिरंग्यासाठी आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांनी हसत हसत बलिदान दिले</span>, <span lang="mr" xml:lang="mr">सीमेवर आपल्या शूर सैनिकांनी प्राणांची आहुती दिली आणि समस्त देशवासीयांनी स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष केला</span>, <span lang="mr" xml:lang="mr">तो तिरंगा जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत</span>, <span lang="mr" xml:lang="mr">तोपर्यंत सदैव असाच दिमाखात उंच फडकत राहील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाखाली आज भारताने जागतिक पातळीवर मोठी झेप घेतली असून भारत जगातील चौथी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनला आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"><span>     </span><span lang="mr" xml:lang="mr">देशाच्या वैज्ञानिक व तांत्रिक प्रगतीचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की</span>, <span lang="mr" xml:lang="mr">चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले अंतराळयान यशस्वीपणे उतरविणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. अंतराळ संशोधन</span>, <span lang="mr" xml:lang="mr">माहिती तंत्रज्ञान (</span>IT), <span lang="mr" xml:lang="mr">कृत्रिम बुद्धिमत्ता (</span>AI), <span lang="mr" xml:lang="mr">फिनटेक आणि इतर उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने अभूतपूर्व प्रगती साधली आहे. आज भारत जगातील दुसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम म्हणून वेगाने विकसित होत असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">आपल्या देशाकडे जगातील सर्वात मोठी युवाशक्ती आहे. हा तिरंगा हातात घेऊन रस्त्यावर उतरलेल्या या तरुण पिढीला रोखण्याची ताकद आज जगात कोणाकडेही नाही.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"><span>      </span><span lang="mr" xml:lang="mr">भारताची ही वेगाने होणारी घोडदौड काही परकीय व विरोधी शक्तींना खटकत असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">भारताचा विकास रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत</span>; <span lang="mr" xml:lang="mr">परंतु देशाचा हा विकासाचा प्रवास कोणीही थांबवू शकणार नाही</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असा स्पष्ट विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाहिलेल्या ‘विकसित भारत’ आणि ‘नवभारत’च्या संकल्पनेतून आगामी काळात देश जगाच्या नकाशावर सर्वात अग्रस्थानी असेल</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असा दृढ निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. या भव्य तिरंगा रॅलीमुळे मुंबई शहरात संपूर्ण देशभक्तीचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/inauguration-of-rally-of-patriotism-in-rashtra-pratham-tricolor-utsav/article-3563</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/inauguration-of-rally-of-patriotism-in-rashtra-pratham-tricolor-utsav/article-3563</guid>
                <pubDate>Tue, 11 Aug 2026 09:44:51 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/ewtw-e1786375033633.jpeg"                         length="152499"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        