<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.lokprant.com/mantralaya-mumbai/tag-6307" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Lokprant RSS Feed Generator</generator>
                <title>Mantralaya Mumbai - Lokprant</title>
                <link>https://www.lokprant.com/tag/6307/rss</link>
                <description>Mantralaya Mumbai RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>‘विकसित भारतात महाराष्ट्राची भूमिका निर्णायक’; फडणवीसांचा निर्धार</title>
                                    <description><![CDATA[<p>स्वातंत्र्यदिनी मंत्रालयात ध्वजारोहण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ३६ हजार कोटींची शेतकरी कर्जमाफी आणि १००% दिवसा विजेची घोषणा.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/maharashtras-role-is-decisive-in-developed-india-fadnavis-determination/article-3730"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/images-(31).jpg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">मुंबई: </span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">देशाचा ७९ वा स्वातंत्र्यदिन देशभरात अत्यंत उत्साहात साजरा होत असताना</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. ध्वजारोहणा नंतर राज्यातील आणि देशातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताच्या ८० वर्षांच्या विकास प्रवासाचा आणि महाराष्ट्राच्या उल्लेखनीय कामगिरीचा सविस्तर आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत भारताने जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनण्यापर्यंत मारलेली मजल आणि तब्बल २५ कोटी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढण्याचे यश हे अत्यंत अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"><span>          </span>‘<span lang="mr" xml:lang="mr">विकसित भारत’ ही केवळ मोठी अर्थव्यवस्था उभारण्याची संकल्पना नसून समाजातील प्रत्येक घटकाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणे आणि सर्वांना विकासाच्या प्रवाहात सामावून घेणे आहे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण वाटचालीत महाराष्ट्र देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आणि भारतीय संविधानाची मूल्ये केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्र विकासाच्या मार्गावर वेगाने आगेकूच करत आहे. चालू वर्षाच्या पहिल्या सहा माहीत महाराष्ट्राचा आर्थिक विकासदर सुमारे ८.८ टक्के राहिला असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">राज्यातील १३ जिल्ह्यांनी विकासाचे आपले निर्धारित लक्ष्य पूर्ण केले आहे. हा विकास केवळ काही भागांपुरता मर्यादित न राहता शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवला जात असल्याचे त्यांनी सांगितले.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"><span>          </span><span lang="mr" xml:lang="mr">शेतकरी कल्याणाबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. शासनाने आणलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने’च्या माध्यमातून राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना सुमारे ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जात आहे. सध्या राज्यातील ७६ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवली जात असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">आगामी वर्षभरात राज्यातील शंभर टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचा संकल्प शासनाने पूर्ण केला आहे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असे त्यांनी जाहीर केले. महाराष्ट्राच्या मागील पिढ्यांनी तीव्र दुष्काळ सहन केला असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">आगामी पिढीला कधीही दुष्काळ पाहावा लागू नये यासाठी मराठवाडा</span>, <span lang="mr" xml:lang="mr">विदर्भ</span>, <span lang="mr" xml:lang="mr">उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून पाणी पोहोचवून राज्य कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा विडा शासनाने उचलला आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"><span>         </span><span lang="mr" xml:lang="mr">याचबरोबर</span>, <span lang="mr" xml:lang="mr">देशात प्रथमच महिलांना कायदेशीररित्या ‘महिला शेतकरी’ म्हणून अधिकृत दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. युवकांच्या प्रगतीसाठी शिक्षणाचे हब तयार करताना ‘एज्युसिटी’ संकल्पनेच्या माध्यमातून जागतिक दर्जाची परदेशी विद्यापीठे महाराष्ट्रात आणली जात आहेत आणि स्थानिक विद्यापीठांचा शैक्षणिक स्तर उंचावला जात आहे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">जेणेकरून राज्यातील तरुणांना हव्या त्या उच्चशिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी आपल्याच राज्यात उपलब्ध होऊ शकतील</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात व्यक्त केला.</span></span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/maharashtras-role-is-decisive-in-developed-india-fadnavis-determination/article-3730</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/maharashtras-role-is-decisive-in-developed-india-fadnavis-determination/article-3730</guid>
                <pubDate>Sat, 15 Aug 2026 10:11:58 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/images-%2831%29.jpg"                         length="31914"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>मंत्रालयात स्वातंत्र्यदिनाची रंगीत तालीम; १५ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण</title>
                                    <description><![CDATA[<p>मुंबईतील मंत्रालयात स्वातंत्र्यदिनाची रंगीत तालीम पार पडली. १५ ऑगस्टला सकाळी ९:०५ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण होणार.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/color-rehearsal-of-independence-day-in-mantralaya-flag-hoisting-by/article-3670"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/whatsapp-image-2026-08-13-at-2.34.54-pm-1024x682.jpeg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">मुंबई:</span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"> देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या (</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">Independence Day) <span lang="mr" xml:lang="mr">पार्श्वभूमीवर मंत्रालयातील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">आज मंत्रालयात या सोहळ्याची अधिकृत रंगीत तालीम (</span>Dress Rehearsal) <span lang="mr" xml:lang="mr">अत्यंत उत्साहात आणि शिस्तीत पार पडली. सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार विभागामार्फत या सोहळ्याचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवारी</span>, <span lang="mr" xml:lang="mr">१५ ऑगस्ट रोजी सकाळी ९:०५ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न होणार आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>       </span>आज पार पडलेल्या रंगीत तालीम सोहळ्यात राजशिष्टाचार विभागाचे अवर सचिव अविनाश सोलवट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणा नंतर उपस्थित पोलीस दलाच्या पथकांनी राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली. या दिमाखदार रंगीत तालीमेमध्ये मुंबई पोलीस</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">राज्य राखीव पोलीस दल (</span>SRPF) <span lang="mr" xml:lang="mr">तसेच विशेष घोडेस्वार पथक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. याशिवाय</span>, <span lang="mr" xml:lang="mr">कलाकार किरण शिंदे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">अरुण शिंदे आणि विवेक शिंदे यांनी आपल्या सुमधुर सनई वादनाने वातावरण अधिक देशभक्तीमय केले. या संपूर्ण कार्यक्रमा दरम्यान पोलीस दल</span>, <span lang="mr" xml:lang="mr">मुख्यमंत्री सुरक्षा दल</span>, <span lang="mr" xml:lang="mr">राजशिष्टाचार विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून सर्व व्यवस्थेची पाहणी केली.</span></span></p>
<p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>            </span></span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">आगामी १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यासाठी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">लोकायुक्त</span>, <span lang="mr" xml:lang="mr">मुंबईतील मंत्री</span>, <span lang="mr" xml:lang="mr">खासदार</span>, <span lang="mr" xml:lang="mr">आमदार</span>, <span lang="mr" xml:lang="mr">मुख्य सचिव</span>, <span lang="mr" xml:lang="mr">पोलीस महासंचालक</span>, <span lang="mr" xml:lang="mr">मुख्य निवडणूक आयुक्त</span>, <span lang="mr" xml:lang="mr">मुख्य माहिती आयुक्त</span>, <span lang="mr" xml:lang="mr">महावाणिज्य दूतावासांचे अधिकारी यांच्यासह विविध संवैधानिक संस्था व शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. याशिवाय</span>, <span lang="mr" xml:lang="mr">सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त</span>, <span lang="mr" xml:lang="mr">महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष</span>, <span lang="mr" xml:lang="mr">महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (</span>MPSC) <span lang="mr" xml:lang="mr">अध्यक्ष</span>, <span lang="mr" xml:lang="mr">राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा</span>, <span lang="mr" xml:lang="mr">राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष</span>, <span lang="mr" xml:lang="mr">मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू तसेच भारतीय सेना</span>, <span lang="mr" xml:lang="mr">नौदल</span>, <span lang="mr" xml:lang="mr">वायुदल आणि भारतीय तटरक्षक दलाचे (</span>Indian Coast Guard) <span lang="mr" xml:lang="mr">वरिष्ठ अधिकारी या राष्ट्रीय सोहळ्याला विशेष उपस्थिती लावणार आहेत.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>        </span>स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय परिसर आणि आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">संचलन</span>, <span lang="mr" xml:lang="mr">पार्किंग आणि अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या (</span>VIP) <span lang="mr" xml:lang="mr">स्वागताची चोख तयारी पूर्ण करण्यात आली आहे. आजच्या रंगीत तालीमेद्वारे या सर्व सुरक्षा व व्यवस्थांची कसून खात्री करण्यात आली असून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">सोहळा अत्यंत दिमाखात पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे.</span></span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/color-rehearsal-of-independence-day-in-mantralaya-flag-hoisting-by/article-3670</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/color-rehearsal-of-independence-day-in-mantralaya-flag-hoisting-by/article-3670</guid>
                <pubDate>Thu, 13 Aug 2026 17:31:42 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/whatsapp-image-2026-08-13-at-2.34.54-pm-1024x682.jpeg"                         length="158496"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        