<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.lokprant.com/expansion-port/tag-6354" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Lokprant RSS Feed Generator</generator>
                <title>वाढवण बंदर - Lokprant</title>
                <link>https://www.lokprant.com/tag/6354/rss</link>
                <description>वाढवण बंदर RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>पालघरच्या कृषी विकासाला मोठी चालना; दापचरीत आंतरराष्ट्रीय कृषी बाजार</title>
                                    <description><![CDATA[<p>पालघरमधील दापचरी येथे १,३९५ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाची कृषी बाजारपेठ उभारणार. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केली जागेची पाहणी.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/dapcharit-international-agricultural-market-is-a-big-boost-to-palghars/article-3896"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/r1-e1787155775555-1024x594.jpeg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">पालघर: </span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">पालघर जिल्ह्यातील दापचरी येथे सुमारे १ हजार ३९५ एकर जागेवर जागतिक दर्जाचा आणि सर्व सुविधांनी युक्त असा अत्याधुनिक कृषी बाजार उभारण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे महाराष्ट्रासह देशातील शेतकरी थेट जागतिक बाजारपेठेशी जोडले जाणार असून</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">स्थानिक स्तरावर रोजगाराच्या हजारो नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी नुकतीच दापचरी येथील या प्रस्तावित प्रकल्पाच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या नियोजनाचा आणि भौगोलिक परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>        </span>या पाहणी दौऱ्यावेळी पालघरचे अपर जिल्हाधिकारी सुभाष भागडे</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">अपर जिल्हाधिकारी बाप्पासाहेब थोरात आणि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंत्री रावल यांनी प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलेल्या संपूर्ण भूखंडाची पाहणी करत गोशाळा परिसर</span>, <span lang="mr" xml:lang="mr">गोहर धाड कृषी विभाग आणि नवा मोहरा कृषी विभाग यांसारख्या विविध परिसरांचा बारकाईने अभ्यास केला आणि अधिकाऱ्यांना आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना दिल्या.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>       </span>फ्रान्समधील जगप्रसिद्ध ‘रुंगीस मार्केट’च्या धर्तीवर महाराष्ट्रात ही अत्याधुनिक आणि जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे. विदर्भ</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">मराठवाडा</span>, <span lang="mr" xml:lang="mr">उत्तर महाराष्ट्र</span>, <span lang="mr" xml:lang="mr">कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांना आपला शेतीमाल या बाजारपेठेत सहज उपलब्ध करून देता येईल. वाढवण बंदर</span>, <span lang="mr" xml:lang="mr">रेल्वे जाळे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">राष्ट्रीय महामार्ग</span>, <span lang="mr" xml:lang="mr">समृद्धी महामार्ग आणि भविष्यातील विमानतळ या सर्व महत्त्वाच्या दळणवळण सुविधांच्या सानिध्यात हा प्रकल्प एक ‘इंटिग्रेटेड मल्टी-मोडल कृषी लॉजिस्टिक्स हब’ म्हणून विकसित केला जात आहे. येथे फळे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">भाजीपाला</span>, <span lang="mr" xml:lang="mr">फुले</span>, <span lang="mr" xml:lang="mr">धान्य</span>, <span lang="mr" xml:lang="mr">मासे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">दुग्धजन्य पदार्थ आणि मांस यांसारख्या सर्व कृषी उत्पादनांसाठी अत्याधुनिक बाजारपेठ</span>, <span lang="mr" xml:lang="mr">प्रक्रिया</span>, <span lang="mr" xml:lang="mr">पॅकिंग</span>, <span lang="mr" xml:lang="mr">साठवणूक (कोल्ड स्टोरेज) आणि थेट निर्यातीची सोय उपलब्ध होणार आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>         </span>या प्रकल्पाचा सर्वात मोठा फायदा स्थानिक नागरिकांना आणि युवकांना होणार असून याद्वारे सुमारे १० हजार नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. यामध्ये स्थानिक युवकांना आणि कामगारांना प्राधान्य दिले जाणार आहे. कृषी प्रक्रिया उद्योग</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">गोदामे</span>, <span lang="mr" xml:lang="mr">लॉजिस्टिक्स</span>, <span lang="mr" xml:lang="mr">पॅकिंग आणि वाहतूक या क्षेत्रांना मोठी चालना मिळेल. याशिवाय</span>, <span lang="mr" xml:lang="mr">पालघर परिसरातील शेतकरी आणि मच्छीमारांना आपला शेतीमाल किंवा उत्पादने विक्रीसाठी मुंबई किंवा वाशी येथे लांब जावे लागणार नाही. त्यांच्याच परिसरात जागतिक दर्जाची बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे त्यांचा वाहतूक खर्च वाचेल</span>,<span lang="mr" xml:lang="mr">मालाला योग्य भाव मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला एक नवी गती प्राप्त होईल.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>      </span>हा प्रकल्प उभारताना कोणत्याही नागरिकाचे किंवा कुटुंबाचे विस्थापन केले जाणार नाही</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, <span lang="mr" xml:lang="mr">ही या योजनेची महत्त्वाची बाजू आहे. अनेक वर्षांपासून उपयोगाविना पडून असलेल्या सरकारी जमिनीचा सुनियोजित वापर करून हा प्रकल्प उभारला जात आहे. वाढवण डीपवॉटर पोर्ट</span>, <span lang="mr" xml:lang="mr">नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरशी जोडणी असल्यामुळे निर्यातीची प्रक्रिया अत्यंत सुलभ होईल आणि लॉजिस्टिक खर्चात मोठी बचत होईल. हा प्रकल्प केवळ एक व्यापारी बाजारपेठ नसून</span>, <span lang="mr" xml:lang="mr">महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जागतिक क्षितिजावर नेणारा आणि पालघर जिल्ह्याला कृषी व्यापाराचे आंतरराष्ट्रीय केंद्र बनवणारा एक दूरगामी उपक्रम ठरेल</span>, <span lang="mr" xml:lang="mr">असा विश्वास मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"> </span></p>]]></content:encoded>
                
                

                <link>https://www.lokprant.com/dapcharit-international-agricultural-market-is-a-big-boost-to-palghars/article-3896</link>
                <guid>https://www.lokprant.com/dapcharit-international-agricultural-market-is-a-big-boost-to-palghars/article-3896</guid>
                <pubDate>Thu, 20 Aug 2026 11:11:51 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/r1-e1787155775555-1024x594.jpeg"                         length="111797"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वेगवान वाटचाल; फडणवीसांची घोषणा</title>
                                    <description><![CDATA[<p>स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. महाराष्ट्र २०२९-३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनणार; 'चौथी मुंबई' अन् ऑफशोर विमानतळाचा प्लॅन.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.lokprant.com/maharashtra/fadnavis-announcement-of-maharashtras-rapid-progress-towards-a-trillion-dollar/article-3684"><img src="https://www.lokprant.com/media/400/2026-08/मा.-मुख्यमंत्री-स्वातंत्र्य-दिन-स्वागत-समारंभ-10-1024x682.jpeg" alt=""></a><br /><p class="MsoNormal"><strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">मुंबई: </span></strong><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">भारताची वाटचाल आता जागतिक नेतृत्वाच्या दिशेने सुरू असून</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">महाराष्ट्राचे अर्थकारण लवकरच ‘ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी’चे लक्ष्य गाठेल</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">असा दृढ विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेल येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य स्वागत समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विविध देशांचे राजनैतिक अधिकारी</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">वाणिज्यदूत (</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">Consuls), </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">विविध देशांचे प्रतिनिधी आणि राज्यातील प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>         </span>या महत्त्वाच्या कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">मंत्री छगन भुजबळ</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">मंगलप्रभात लोढा</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">आदिती तटकरे</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">राज्यमंत्री योगेश कदम</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">महापौर रितू तावडे</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">प्रधान सचिव आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>      </span>समारंभाला संबोधित करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">भारत ही जगातील सर्वात प्राचीन आणि वैविध्यपूर्ण संस्कृतींपैकी एक असून</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">समावेशकता आणि सहिष्णुता ही आपली मुख्य वैशिष्ट्ये आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आज अधिक सक्षम</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">आत्मविश्वासपूर्ण आणि जागतिक पटलावर निर्णायक भूमिका बजावणारा देश बनला आहे. आज जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताने आपले स्थान प्रस्थापित केले असून लवकरच आपण पाच ट्रिलियन डॉलर्सपेक्षा मोठ्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठू</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मागील एका दशकात गरिबी निर्मूलन</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">पायाभूत सुविधा</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">नवकल्पना आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने अभूतपूर्व प्रगती साधली आहे.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>      </span>महाराष्ट्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख शक्तिकेंद्र असल्याचे अधोरेखित करत मुख्यमंत्री म्हणाले की</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">राज्य हे देशाचे उत्पादन क्षेत्रातील अग्रणी केंद्र</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">स्टार्टअप्सची राजधानी आणि गुंतवणुकीचे मुख्य आकर्षण बनले आहे. मुंबई ही केवळ देशाची आर्थिक राजधानी नसून</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">ती आता जागतिक गुंतवणूक आकर्षित करणारे प्रमुख केंद्र ठरत आहे. मुंबई आणि नवी मुंबईचा परिसर देशाची ‘डेटा सेंटर राजधानी’ म्हणून वेगाने विकसित होत आहे. राज्याच्या सागरी सामर्थ्याला नवी दिशा देण्यासाठी पालघर जिल्ह्यात उभारले जाणारे वाढवण बंदर हे देशातील सर्वात मोठ्या जवाहरलाल नेहरू बंदरापेक्षा (</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">JNPA) </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">तब्बल तीनपट मोठे असणार असून</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">त्याचा जगातील अव्वल दहा बंदरांमध्ये समावेश होईल</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">अशी माहिती त्यांनी दिली.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>        </span>याशिवाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात साकारत असलेली ‘तिसरी मुंबई’ आता प्रत्यक्षात आकार घेत असून</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">तिथे एज्युकेशन सिटी</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">मेडी सिटी</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">इनोव्हेशन सिटी</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">स्पोर्ट्स सिटी</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">जीसीसी सिटी आणि नवे व्यावसायिक जिल्हे उभे राहत आहेत. एवढेच नव्हे तर वाढवण बंदर ते विरार या पट्ट्यात ‘चौथी मुंबई’ विकसित करण्याची संकल्पना असून</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">पालघर जिल्ह्यात देशातील पहिले ऑफशोर विमानतळ उभारण्याची राज्याची महत्त्वाकांक्षा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुंबई</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">पुणे व एमएमआर परिसरासोबतच छत्रपती संभाजीनगर</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">नागपूर</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">चंद्रपूर</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">नाशिक आणि अहिल्यानगर ही नवी विकासकेंद्रे म्हणून उदयास येत असून</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">संरक्षण</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">स्वच्छ ऊर्जा व अत्याधुनिक तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत आहे. महाराष्ट्र हे देशातील पहिले उपराष्ट्रीय ट्रिलियन डॉलर अर्थकारण असलेले राज्य बनण्याच्या मार्गावर असून</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">२०२९-३० पर्यंत हे ध्येय निश्चितपणे साध्य केले जाईल</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">असे त्यांनी सांगितले.</span></p>
<p class="MsoNormal"><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr"><span>     </span>याप्रसंगी बोलताना मंत्री जयकुमार रावल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेचा उल्लेख करत</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आर्थिक व औद्योगिक क्षेत्रात अधिक बळकट होत असल्याचे सांगितले. तसेच</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">कौन्सुलर कॉर्प्सचे डेप्युटी डीन तथा पोलंडचे महावाणिज्य दूत थॉमस यांनी मनोगत व्यक्त करताना भारताने स्वातंत्र्यानंतर केलेली प्रगती जगासाठी प्रेरणादायी असल्याचे म्हटले. राजशिष्टाचार विभागाचे सचिव डॉ. राजेश गवांदे यांनी स्वागत केले</span><span style="font-size:16pt;line-height:107%;">, </span><span lang="mr" style="font-size:16pt;line-height:107%;" xml:lang="mr">तर महाराष्ट्राच्या प्रगतीचे दर्शन घडवणारी विशेष ध्वनिचित्रफित यावेळी दाखविण्यात आली.</span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></p>
<p class="MsoNormal"><span style="font-size:16pt;line-height:107%;"> </span></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>प्रांत (महाराष्ट्र)</category>
                                    

                <link>https://www.lokprant.com/maharashtra/fadnavis-announcement-of-maharashtras-rapid-progress-towards-a-trillion-dollar/article-3684</link>
                <guid>https://www.lokprant.com/maharashtra/fadnavis-announcement-of-maharashtras-rapid-progress-towards-a-trillion-dollar/article-3684</guid>
                <pubDate>Fri, 14 Aug 2026 12:04:12 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.lokprant.com/media/2026-08/%E0%A4%AE%E0%A4%BE.-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AD-10-1024x682.jpeg"                         length="121657"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Rajsita Ade]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        