राज्यात आजही पावसाचा जोर कायम राहणार ; कोकण कोल्हापूर, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

    राज्यातील अनेक भागांत पुढील चार दिवस पाऊस सक्रीय असणार आहे. हवामान विभागाने अनेक ठिकाणी यलो अलर्ट तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. राज्यातील अनेक भागांत पाऊस सक्रीय झाला आहे. कोकण, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईतील अनेक भागांत पाऊस सुरु आहे. शुक्रवारी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह मुंबई, ठाणे येथे मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

       राज्यात जून महिन्याच्या सुरुवातील पावसाने ओढ दिला होता. त्यानंतर मराठवाडा, विदर्भ वगळता राज्यात सर्वत्र सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला. जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील अनेक भागांत पाऊस सक्रीय झाला आहे. विदर्भात पावसाची तूट असताना जुलै महिन्यात पाऊस सक्रीय झाला आहे. या पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची पातळी वाढत आहे. हवामान विभागाने विदर्भ, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील अनेक भागांत शुक्रवारी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
राज्यातील अनेक भागांत पुढील चार दिवस पाऊस सक्रीय असणार आहे. हवामान विभागाने अनेक ठिकाणी यलो अलर्ट तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात पुढील चार दिवस पाऊस सक्रीय असणार आहे. मराठवाड्यात पुढील चार दिवस मध्यम पावसाचा अंदाज आहे. कोकणातील दोन जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा आँरेंज अलर्ट आहे.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

महंत शांतिगिरीजी महाराजांच्या आशीर्वादासाठी हजारोंचा जनसागर; गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मलवडीत कार्यक्रमाचे आयोजन

Latest News

महंत शांतिगिरीजी महाराजांच्या आशीर्वादासाठी हजारोंचा जनसागर; गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मलवडीत कार्यक्रमाचे आयोजन महंत शांतिगिरीजी महाराजांच्या आशीर्वादासाठी हजारोंचा जनसागर; गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मलवडीत कार्यक्रमाचे आयोजन
  मलवडी (ता. माण )येथे श्री शांतिगिरीजी महाराज आश्रम या ठिकाणी, गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात पार पडला. हजारो
ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी मध्ये पालखी सोहळा थाटामाटात संपन्न
पिंगळी बुद्रुक सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी मनीषा फडतरे
सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग विभागाचे  भारताच्या सकल उत्पन्नात महत्वपूर्ण योगदान - केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी
विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत' योजनेद्वारे  ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला लाभ - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software