- Hindi News
- सातारा
- भुईंज येथे उद्योगपती सतशिष्य यशवंत कुलकर्णी यांचे व्याख्यान संपन्न
भुईंज येथे उद्योगपती सतशिष्य यशवंत कुलकर्णी यांचे व्याख्यान संपन्न

तिर्थक्षेत्र भुईंज म्हणून उदयास येण्यासाठी सदगुरू नारायण महाराजांनी दिलेले योगदान व केलेली तपस्या जपून ठेवा. हे कृष्णाकाठचे आध्यात्मिक संस्कार केंद भविष्यात खूप काही शिकवेल याची जबाबदारी सर्व ग्रामस्थांच्यासहीत सेवेकरी यांनी घ्यावी असे प्रतिपादन यशवंत कुलकर्णी यांनी केले.

यावेळी चोलताना यशवंत कुलकर्णी पुढे म्हणाले की, सदगुरू नारायण महाराजांनी चार दशकापासून भुईंज येथे आचार्य भृगुमहर्षिच्या या तपोभूमित केलेली तपञ्चर्या व संशोधन हे मानवजातीला नवसंजीवनी देणारे ठरले याही पेक्षा आम्हा शिष्य व सेवेकरी यांना ऋपीमहर्षिची परंपरा, शिकवण अनुभवायला मिळाली. इथली भूमी व कृष्णानदी परिसर सदगुरूंच्या संकल्पनेतील तिर्थक्षेत्र भुईंज म्हणूनच विकसीत झाले आहे. याचे पावित्र्य व मांगल्य जपण्याची आपली जबाबदारी आहे असे ते यावेळी म्हणाले.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत जेष्ठ सेवेकरी प्रा. विठ्ठलराव जाधवराव यांनी केले तर प्रास्ताविक माजी सरपंच अर्जुननाना भोसले यांनी केले भय्यासाहेब जाधवराव यांनी उपस्थितांचे आभार मानले सुत्र संचालन जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रामदास जाधव यांनी केले कार्यक्रमास भुईज आणि परिसरातील सेवेकरी, शिष्यगण, भाविक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. कार्यकमाचे संयोजन दत्तसेवेकरी मंडळ, आचार्य भृगुऋषी आश्रम सेवेकरी, ज्ञानेश्वरी पारायण मंडळ, सदगुरू आण्णांच्या लेकी ग्रुप, प्रेस क्लब भुईन, जेष्ठ नागरिक संघ यांच्या सामुदायिक सहकार्यातून केले जाते.

खबरें और भी हैं
एअर इंडियाच्या विमानाचा उड्डाण घेताच अपघात
सेतू कार्यालयातील सर्व्हर डाउनमुळे नागरिक संतप्त
नऱ्हे येथे एका सराईताने पेटवल्या 7 गाड्या
पर्यटनस्थळ परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
