आरसीबीची विजयी सलामी; गतविजेत्या केकेआरचा केला पराभव 

कोलकत्ता : 2025च्या आयपीएल स्पर्धेतील पहिला सामना कोलकाता नाईट राईडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु यांच्यामध्ये झाला. या सामन्यात आरसीबीने जबरदस्त कामगिरी करत दणदणीत विजय मिळवला. केकेआरने दिलेल्या 175 धावांचे आव्हान आरसीबीच्या संघाने 16 व्या षटकामध्ये  पूर्ण केले. या सामन्यात विराट कोहलीने धमाकेदार नाबाद 59 धावांची अर्धशतकी खेळी करत आरसीबीच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. 

     केकेआरने दिलेल्या 175 धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या आरसीबीच्या सलामी जोडीने आक्रमक फलंदाजी केली. दोघांनी 8.3 षटकांत 95 धावांची मॅच विनिंग भागीदारी केली. पण 95 धावांवर फिलीप साल्टच्या रुपाने संघाला पहिला धक्का बसला. यानंतर विराट कोहली (59 धावा) आणि कर्णधार रजत पाटीदार (34 धावा) यांनी संघाला सावरले. शेवटी 16.2 षटकात विराट कोहली आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी संघाला विजय मिळवून दिला. हंगामच्या पहिल्याच सामन्यात आरसीबाने एकहाती विजय मिळवला. या सामन्यात आरसीबीची अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली. 

    गोलंदाजांकडून प्रथम गोलंदाजी करताना केकेआर सारख्या बलाढ्य संघाला 175 धावांत रोखले, गोलंदाजीत कृणाल पांड्याने 4 षटकात 29 धावा देत 3 विकेट्स घेतल्या, शिवाय जोश हेझलवूडनेही 2 विकेट्स घेतल्या. तर केकेआरकडून अजिंक्य रहाणेने 56 धावांची सर्वाधिक खेळी खेळली. लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीकडून विराटने 59 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने संघाला एकतर्फी विजय मिळवून दिली. तत्तपूर्वी फिलीप साल्टने 56 धावांची वादळी खेळी करत सामना आरसीबीच्या पारड्यात आणला. मात्र तो 56 धावांवर बाद झाला, त्याला वरुण चक्रवर्तीने बाद केले.

     यानंतर देवदत्त पडिक्कलने 10 धावा करुन बाद झाला. त्यानंतर चाैथ्या क्रमाकावर आलेल्या रजत पाटीदार 34 धावांची वादळी खेळी खेळत संघाला विजायाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले, तो 34 धावांवर बाद शेवटी लियाम लिव्हिंगस्टोनने सलग चाैकर खेचत सामना 16.2 षटकात आरसीबीच्या नावे केला. अशाप्रकारे आरसीबीने आयपीएल 2025 च्या हंगामात विजयाने सुरूवात केली.

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

मान्सून काळात आपत्तीवर सर्व विभागांनी समन्वयाने मात करावी; नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्याचे नियोजन करा- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

Latest News

मान्सून काळात आपत्तीवर सर्व विभागांनी समन्वयाने मात करावी; नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्याचे नियोजन करा- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे मान्सून काळात आपत्तीवर सर्व विभागांनी समन्वयाने मात करावी; नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्याचे नियोजन करा- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे
पुणे: गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच आगामी मान्सूनमधील पावसाचा अंदाज पाहता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसोबत सर्वच...
किसन वीर'चे गळित हंगाम २०२४-२५ चे ऊस बील आदा
विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी श्री क्षेत्र चांदवड येथे रेणुका देवीचे घेतले दर्शन
महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे राज्य - उद्योग मंत्री उदय सामंत
सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software