- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- १५ जूनला राज्यभर चक्काजाम आंदोलन; महाराष्ट्रातील दिव्यांग बांधव, शेतकरी पेटला
१५ जूनला राज्यभर चक्काजाम आंदोलन; महाराष्ट्रातील दिव्यांग बांधव, शेतकरी पेटला

शेतकऱ्यांची कर्जमाफी, पिकाला हमीभाव यांसह विविध मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांनी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरु केले आहे. आज उपोषणाचा सहावा दिवस असून सकाळी कडू यांना रक्ताची उलटी होऊन प्रकृती ढासळल्याने राज्यात सरकारविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

- चक्काजाम आंदोलनाचे आवाहन करणारी बाईट
राज्यभरातील दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर, मूकबधिर, कामगार, वाहनचालक, मेंढपाळ, मच्छीमार, बेघर आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे. राज्यभरातून ४०हुन अधिक आमदार, १० पेक्षा जास्त खासदार आणि शेकडो संस्था संघटना यांनी बच्चू कडू यांच्या उपोषणस्थळी भेट देऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. मात्र दुसरीकडे सरकारने अजूनही शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत. बच्चू कडू यांचा लढा अजूनही सुरूच आहे.
बच्चू कडू यांनी १६ मुद्दे मांडत शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. ८ जूनपासून ते उपोषणाला बसलेत.. मात्र सरकारने अजूनही बच्चू कडू यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत कोणतीही हालचाल केलेली नाही. त्यामुळे प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांसाठीच्या या लढ्याची धार आणखी बोथट करण्यासाठी येत्या १५ जूनला म्हणजेच रविवारी संपूर्ण महाराष्ट्रात चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा प्रहार संघटनेकडून देण्यात आला आहे.या चक्काजाम आंदोलनात कोणतीही गाडी रस्त्यावर फिरताना दिसणार नाही. महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी, शेतकऱ्यांची काळजी असणाऱ्या विविध संघटनांनी आणि बच्चू कडू याना पाठिंबा देणाऱ्या पक्षांनी या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन प्रहार कडून करण्यात आलं आहे.
दरम्यान, काल- परवा अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होते. काही ठिकाणी रस्त्यावर जाळपोळ बघायला मिळाली. डवरगावात तर बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी थेट टोकाचे पाऊल उचलत स्वतःला जमिनीत गाडून घेतलं. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, स्वामिनाथन आयोग लागू करावा अशा प्रकारच्या मागण्या करत प्रहारच्या कार्यकर्तांनी स्वतःलाच जमिनीत गाडून घेत टोकाचं पाऊल उचललं. एकूणच काय तर बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन हळू हळू उग्र रूप घेताना दिसतंय. अशावेळी सरकारला आता तरी जाग येईल का? मंत्र्यांचे डोळे आता तरी उघडतील का? हा प्रश्न आहे.

खबरें और भी हैं
एअर इंडियाच्या विमानाचा उड्डाण घेताच अपघात
सेतू कार्यालयातील सर्व्हर डाउनमुळे नागरिक संतप्त
नऱ्हे येथे एका सराईताने पेटवल्या 7 गाड्या
पर्यटनस्थळ परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
