Dharmendra Pradhan Resigns: नीट पेपरफुटी प्रकरणानंतर मोठी बातमी; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीतील जंतर-मंतरवरील तीव्र आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान मोदींकडे सोपवला.

नवी दिल्ली: देशभरात गाजलेल्या नीट (NEET) परीक्षा प्रश्नपत्रिका लीक प्रकरण आणि बिघडलेल्या शिक्षण व्यवस्थेविरोधात राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तीव्र आंदोलनाला अखेर मोठे यश आले आहे. वाढता दबाव आणि विद्यार्थ्यांचा रोष लक्षात घेत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) आणि देशभरातील विद्यार्थी संघटनांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या ऐतिहासिक आंदोलनाची ही फार मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे.

मागील अनेक आठवड्यांपासून परीक्षांमधील गैरव्यवहार, एनटीएचा (NTA) ढिसाळ कारभार आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या दडपशाहीच्या निषेधार्थ जंतर-मंतरवर धरणे आंदोलन सुरू होते. आंदोलकांच्या मागण्यांपैकी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा ही सर्वात प्रमुख आणि तडजोड न करण्यायोग्य अट होती. या प्रकरणी केंद्र सरकार आणि आंदोलक प्रतिनिधींमध्ये सविस्तर बैठकांचे सत्र सुरू होते. अखेरच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर आणि देशभरात वाढत्या दबावामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. या आंदोलनामुळे सरकारला मोठा निर्णय घेण्यास भाग पाडले असून, परीक्षा प्रणालीमध्ये कडक कायदे आणण्यासह इतर महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत.

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

काही तासांतच मोठा फेरबदल! धर्मेंद्र प्रधान यांच्या एक्झिटनंतर 'हे' निष्ठावंत नेते बनले देशाचे नवे शिक्षण मंत्री

Latest News

काही तासांतच मोठा फेरबदल! धर्मेंद्र प्रधान यांच्या एक्झिटनंतर 'हे' निष्ठावंत नेते बनले देशाचे नवे शिक्षण मंत्री काही तासांतच मोठा फेरबदल! धर्मेंद्र प्रधान यांच्या एक्झिटनंतर 'हे' निष्ठावंत नेते बनले देशाचे नवे शिक्षण मंत्री
नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळात एक मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर काही तासांतच...
खंडाळा पोलिसांची मोठी कारवाई; गांजाची अवैध शेती उध्वस्त, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त
गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल; गोकुळाष्टमीपूर्वी मिळणार दिलासा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन; हजारो शेतकऱ्यांना मिळणार सिंचनाचा लाभ
महाराष्ट्राला बसले भूकंपाचे धक्के; नाशिक आणि पालघरमध्ये जमिनीखालून हालचाली, नागरिक झाले भयभीत

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software