धाराशिवच्या नगरसेवकांची आज ‘मातोश्री’वर बैठक; ओमराजेंसमोर आव्हान

धाराशिवच्या नगरसेवकांची 'मातोश्री'वर महत्त्वाची बैठक; खासदार ओमराजे निंबाळकरांच्या भूमिकेनंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय.

मुंबई: शिवसेना पक्षात काही दिवसांपूर्वी झालेल्या मोठ्या राजकीय घडामोडींमुळे आणि खाडाफोडीच्या राजकारणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. पक्षाच्या ९ पैकी तब्बल ६ खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. या राजकीय भूकंपानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. बंड करणाऱ्या नेत्यांच्या मतदार संघांवर लक्ष केंद्रित करत ठाकरे गटाने आता स्थानिक पातळीवर मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईतील ‘मातोश्री’ निवासस्थानी धाराशिवमधील नगरसेवकांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली असून, या बैठकीमुळे खासदार ओमराजे निंबाळकर यांची नेमकी ताकद किती, याची खरी परीक्षा आज होणार आहे.

         काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथी दरम्यान, धाराशिव लोकसभा मतदार संघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीच्या काळात त्यांची भूमिका संभ्रमावस्थेत आणि तळ्यात-मळ्यात असल्यामुळे राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली होती. मात्र, शेवटी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या या पक्ष प्रवेशानंतर धाराशिव मध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली होती, ज्यामध्ये त्यांनी ओमराजे यांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत हल्लाबोल केला होता. पक्षात फूट पडण्यापूर्वी ठाकरे गटाकडे ९ खासदार होते, मात्र ६ जण निघून गेल्यामुळे आता ठाकरे गटाकडे केवळ ३ खासदार उरले आहेत, तर शिंदे गटाच्या खासदारांची संख्या १३ वर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी आता स्थानिक पातळीवरील बळकटीसाठी कंबर कसली आहे.

         आज मुंबईत ‘मातोश्री’वर होत असलेल्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या बैठकीला धाराशिव मधील किती नगरसेवक उपस्थित राहणार, यावरूनच स्थानिक राजकारणातील खरे चित्र स्पष्ट होणार आहे. ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत नेमके किती नगरसेवक गेले आहेत आणि किती नगरसेवक अजूनही उद्धव ठाकरेंच्या निष्ठावान गटासोबत कायम आहेत, याचा फैसला आजच्या या बैठकीत होणार आहे. या बैठकीनंतर धाराशिवच्या राजकारणात कोणते नवे समीकरण पुढे येणार आणि ठाकरे गट काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

पुण्यातील ‘फ्लाईंग जिप्सी’ प्रकरणात कारवाई; मालक-व्यवस्थापकांना अटक

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software