दिल्लीतील महाराष्ट्र सदनात तिरंगा रॅली; ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात 'हर घर तिरंगा' अभियानाअंतर्गत भव्य तिरंगा रॅली पार पडली. डॉ. श्वेता सिंघल व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देशभक्तीमय वातावरण.

नवी दिल्ली: येथील महाराष्ट्र सदनात ‘हर घर तिरंगा’ अभियानाला अत्यंत उत्साहात  आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि राष्ट्रध्वजाप्रती आदर व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र सदन परिसरात काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीने संपूर्ण परिसर तिरंगामय झाला होता. महाराष्ट्र सदनच्या नवी दिल्लीतील निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल यांच्या प्रमुख उपस्थितीत या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.

        या रॅलीत महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहाय्यक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक लेखा अधिकारी निलेश केदारे, महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापक प्रमोद कोलपते आणि सुरक्षा अधिकारी अनिल चोरगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. हातात तिरंगा ध्वज घेऊन निघालेल्या या रॅलीमुळे संपूर्ण महाराष्ट्र सदन परिसर राष्ट्रभक्तीच्या घोषणांनी दुमदुमला होता. उपस्थितांनी यावेळी राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्याचा संकल्प करत देशप्रेमाचा संदेश दिला.

          हर घर तिरंगा’ या अभियानाचे महत्त्व सांगताना प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले की, त्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपल्या घरावर तिरंगा फडकवावा आणि देशाचा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करावा. राष्ट्रध्वजा बद्दल असलेली आदर आणि अभिमानाची भावना अधिक वृद्धिंगत करण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या रॅलीच्या माध्यमातून दिल्लीत असलेल्या महाराष्ट्र सदनाने देशप्रेमाचा एक आगळावेगळा आविष्कार सादर केला असून, या उपक्रमामुळे उपस्थित सर्वांमध्ये देशभक्तीची नवी ऊर्जा संचारली आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

राष्ट्रपती मुर्मूंचे देशवासीयांना संबोधन; जागतिक अस्थिरतेतही भारताची अर्थव्यवस्था मजबूत

Latest News

राष्ट्रपती मुर्मूंचे देशवासीयांना संबोधन; जागतिक अस्थिरतेतही भारताची अर्थव्यवस्था मजबूत राष्ट्रपती मुर्मूंचे देशवासीयांना संबोधन; जागतिक अस्थिरतेतही भारताची अर्थव्यवस्था मजबूत
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे देशाला संबोधन. भारताचा विकास दर जागतिक सरासरीच्या दुप्पट, ७८ वीरता पुरस्कारांना मंजुरी.
इस्रो अभ्यास दौरा पूर्ण करून ४१ विद्यार्थी नागपुरात दाखल; पालकमंत्र्यांनी साधला संवाद
शौर्य आणि सेवेला सलाम; महाराष्ट्रातील ८२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
महाराष्ट्र लोकायुक्तात दोन न्यायिक, दोन बिगर न्यायिक सदस्यांचा शपथविधी
पुण्यात लक्ष्मण हाके-नवनाथ वाघमारे आक्रमक; सरकारच्या भूमिकेवर नाराजी

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software