चंद्रपूरमध्ये ट्रक आणि ऑटोरिक्षाचा भीषण अपघात

सहा जणांचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी

   चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तहसीलमध्ये गुरुवारी  एका ट्रकने ऑटोरिक्षाला धडक दिली. या अपघातात  सहा जणांचा मृत्यू झाला असून त्यात तीन महिलांचा समावेश आहे. असे पोलिसांनी सांगितले. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास राजुरा-गडचांदूर रोडवरील कपनगावजवळ घडली. 

सात प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ऑटोरिक्षाचा अपघात

      राजुराहून पाचगावला निघालेल्या ऑटोरिक्षाचा भीषण अपघात झाला असून जेव्हा ऑटोरिक्षा कपनगावजवळ पोहोचली तेव्हा विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने त्याला धडक दिली. ही टक्कर इतकी भीषण होती की संपूर्ण ऑटोरिक्षा समोरून चिरडली गेली, असे राजुरा पोलिस ठाण्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघातात समावेश असलेल्या व्यक्तींपैकी  तिघांचा उपचाराआधीच मृत्यू झाला होता. जखमींपैकी तिघांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले, असे त्यांनी सांगितले. वर्षा मंडले (41), तनु पिंपळकर (18), ताराबाई पापुलवार (60), रवींद्र बोबडे (48), शंकर पिपेरे (50) आणि ऑटोरिक्षा चालक प्रकाश मेश्राम (50) अशी मृतांची नावे आहेत , असे अधिकाऱ्याने सांगितले. ऑटो रिक्षाला धडक देणारा ट्रक जप्त करण्यात आला आहे, परंतु त्याचा चालक फरार आहे, असे त्यांनी सांगितले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

केव्ही सीआर सोलापूर येथे या पदांसाठी भरती... जाणून घ्या सविस्तर

Latest News

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software