- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- 'बेगानी शादीत अब्दुल्ला दिवाना'; परिणय फुके यांचा संजय राऊतांना टोला
'बेगानी शादीत अब्दुल्ला दिवाना'; परिणय फुके यांचा संजय राऊतांना टोला
भाजप आमदार परिणय फुके यांची संजय राऊत आणि काँग्रेसवर जोरदार टीका. अजित डोवाल यांच्या लोकमान्य टिळक पुरस्काराबाबत मांडली भूमिका.
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची आणि चर्चेत असलेली बातमी समोर येत आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार परिणय फुके यांनी काँग्रेस पक्षावर अतिशय तिखट शब्दांत टीका केली आहे. विरोधकांकडे कोणताही ठोस मुद्दा उरलेला नाही, आणि आगामी काळात काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षाचे स्थान पूर्णपणे संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे, असा दावा आमदार फुके यांनी केला आहे. तसेच त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यासह विविध राजकीय विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.
काँग्रेस पक्षावर आणि विरोधकांवर टीका:
माध्यमांशी बोलताना आमदार परिणय फुके म्हणाले की, आज देशात आणि राज्यात काँग्रेस पक्षांतर्गत तीव्र असंतोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. काँग्रेस पक्षापेक्षा इतर लहान संघटनांनी आणि पक्षांनी अधिक मोठी आंदोलने उभी केली आहेत. देशात छोटे-छोटे मुद्दे उचलून धरत राजकीय स्पेस निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून, काँग्रेस पक्षामध्ये सध्या असुरक्षिततेचे आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे विरोधी पक्षाची हक्काची स्पेस आता वेगाने संपुष्टात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी बोलताना फुके यांनी राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचे जोरदार समर्थन केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेल्या विविध योजनांमुळे राज्यातील लाखो शेतकरी वर्गाला मोठा आर्थिक फायदा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यातील अनेक महत्त्वाच्या योजना थेट राज्याच्या तिजोरीतून राबवल्या जात असून, केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांचीही यात प्रभावी जोड मिळाली आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांवर कुठल्याही प्रकारची कात्री लागणार नाही आणि दोन्ही सरकारांच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांपर्यंत योजना पोहोचतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना आमदार फुके यांनी ‘बेगानी शादीत अब्दुल्ला दिवाना’ अशी खोचक टीका केली. विनाकारण दुसऱ्यांच्या आंदोलनावर आणि घडामोडींवर विनाकारण वक्तव्य करणे हेच संजय राऊत यांचे एकमेव काम उरले आहे, असा टोला त्यांनी लगावला. तसेच, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना पुणे येथे मिळणाऱ्या प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराला काही संघटनांकडून होत असलेल्या विरोधावर बोलताना, पुरस्काराला विरोध करण्याचे कोणतेही कारण नसून केवळ माध्यमांमध्ये चर्चा राहण्यासाठी काही लहान-मोठी संघटनांकडून असे प्रकार केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
