नवनीत राणांचे उद्धव ठाकरेंना थेट आव्हान; 'हनुमान चालीसा' पठणासाठी अमरावतीचे निमंत्रण

अमरावती:

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि वादळी बातमी समोर येत असून, भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्या नवनीत राणा यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत बोचरी आणि थेट शब्दांत टीका केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी राम मंदिराच्या 'प्राणप्रतिष्ठा' सोहळ्याला न जाण्याचा निर्णय का घेतला, असा संतप्त सवाल राणा यांनी उपस्थित केला आहे. आज जेव्हा त्यांचे बहुतांश आमदार त्यांना सोडून गेले आहेत आणि पक्षात केवळ ते आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हेच उरले आहेत, तेव्हाच त्यांना अचानक 'रामरक्षा' आणि हिंदुत्वाची आठवण कशी काय झाली, असा टोला त्यांनी लगावला. राजकीय संकटात सापडल्यानंतरच ठाकरेंना या धार्मिक गोष्टी आठवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

याच पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना एक थेट आव्हान व निमंत्रण दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी अमरावतीला यावे आणि आपल्यासोबत एकत्र बसून 'हनुमान चालीसा'चे पठण करावे, असे जाहीर निमंत्रण राणा यांनी दिले. पक्षातील ज्येष्ठ आणि विश्वासू नेते सोडून गेल्यामुळे तसेच राजकीय अस्तित्व धोक्यात आल्यामुळेच उद्धव ठाकरे आता हनुमान चालीसा आणि रामरक्षेचा आसरा घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नवनीत राणा यांच्या या आक्रमक विधानामुळे आणि ठाकरेंना दिलेल्या अमरावतीच्या निमंत्रणामुचे आता भाजप आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातील राजकीय वाद आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली असून, यावर ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

६ बॉलवर ६ सिक्स मारणारा 'तो' जादूगार हरपला!

Latest News

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software