मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ५० ई-बसेसचे लोकार्पण; नाशिकच्या वाहतुकीला नवी दिशा

'पीएम ई-बस सेवा' योजनेंतर्गत नाशिक शहराला मिळाल्या ५० अत्याधुनिक ई-बसेस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण, प्रदूषणमुक्त प्रवासाचा नवा अध्याय.

नाशिक: नाशिक शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक, पर्यावरणपूरक, वेगवान आणि पूर्णपणे प्रवासीभिमुख करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या बहुचर्चित ‘पीएम ई-बस सेवा’ योजनेंतर्गत नाशिकसाठी मंजूर झालेल्या तब्बल ५० अत्याधुनिक ई-बसेसचा अधिकृत लोकार्पण सोहळा आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला. या नव्या कोऱ्या ई-बसेसमुळे आता नाशिककरांना अधिक विश्वासार्ह, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असून, शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत एक नवा सुवर्णकाळ सुरू झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

    नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या दिमाखदार सोहळ्यास राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि लोक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या लोकार्पण सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या या योजनेचे महत्त्व अधोरेखित केले. केंद्र शासनाच्या ‘पीएम ई-बस सेवा’ योजनेंतर्गत विशेष प्रयत्नांतून नाशिक शहरासाठी १२ मीटर लांबीच्या ५० अत्याधुनिक ई-बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या असून, आजपासून त्या प्रत्यक्षात नागरिकांच्या सेवेत दाखल होत आहेत, असे त्यांनी सांगितले.

        पारंपारिक डिझेल बसेसमुळे होणारे प्रदूषण आणि त्यांचा वाढता परिचालन खर्च यावर मात करण्यासाठी ई-बसेस अत्यंत फायदेशीर ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ई-बसेसच्या वापरामुळे महापालिकेच्या परिचालन खर्चात मोठी बचत होईलच, शिवाय शहरात पूर्णपणे प्रदूषणमुक्त आणि पर्यावरण पूरक वातावरण राखण्यास मदत होईल. विशेषतः, शहरातील वाढत्या वाहनसंख्येमुळे होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतील, ज्यामुळे खासगी वाहनांवर अवलंबी असण्याचे प्रमाण कमी होईल आणि शहरांतर्गत वाहतूक अधिक सुरळीत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नाशिक शहराचा होणारा झपाट्यावरील विकास आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, भविष्यात शहराच्या ताफ्यात आणखी नवीन बसेस दाखल होणार आहेत, याद्वारे नाशिककरांना अधिक व्यापक, सुलभ आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी शेवटी सांगितले.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

साताऱ्यात ‘पेपर ब्लास्ट’विरोधात पालिका आक्रमक; प्लॅस्टिक युक्त कचऱ्यावर दंडात्मक कारवाई

Latest News

साताऱ्यात ‘पेपर ब्लास्ट’विरोधात पालिका आक्रमक; प्लॅस्टिक युक्त कचऱ्यावर दंडात्मक कारवाई साताऱ्यात ‘पेपर ब्लास्ट’विरोधात पालिका आक्रमक; प्लॅस्टिक युक्त कचऱ्यावर दंडात्मक कारवाई
साताऱ्यात गणेशोत्सवात 'पेपर ब्लास्ट'मुळे पसरणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्यावर पालिकेची कारवाई. १० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आणि विशेष पथके तैनात.
ध्वनिप्रदूषण रोखण्यात अपयशाचा आरोप; पुणे पोलिस आयुक्तां विरोधात अवमान याचिका
ओबीसी आरक्षणावरून राजकीय वातावरण तापले; विजय वडेट्टीवारांचा मनोज जरांगेंना इशारा
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ५० ई-बसेसचे लोकार्पण; नाशिकच्या वाहतुकीला नवी दिशा
तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावर खड्डे बुजविण्याची धडक मोहीम सुरू

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software