मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनवर बारामतीत मतभेद; पर्यायी मार्गाची मागणी

मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन मार्गावर बारामतीतील शेतकऱ्यांची चिंता. सुपीक शेती वाचवण्यासाठी पर्यायी मार्गाचा विचार करण्याची प्रशासनाकडे मागणी.

बारामती:  मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनचा प्रस्तावित मार्ग बारामती तालुक्यातून जाणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर परिसरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एका बाजूला या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे विकासाला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असताना, दुसऱ्या बाजूला सुपीक बागायती जमिनींचे नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे विकासाला विरोध नसला तरी बागायती शेतीचे कमीत कमी नुकसान होईल, अशा पर्यायी मार्गाचा विचार करावा, अशी मागणी शेतकरी, नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांकडून होत आहे.

      मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे बारामतीसह पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक, व्यावसायिक आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यासही मदत होणार आहे. मात्र, प्रस्तावित मार्ग बारामतीतील अत्यंत सुपीक आणि बागायती पट्ट्यातून जात असल्याने स्थानिक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

    बारामती परिसर हा ऊस, द्राक्षे, डाळिंब, भाजीपाला आणि इतर नगदी पिकांच्या उत्पादनासाठी राज्यभर ओळखला जातो. या भागातील बागायती शेतीवर हजारो शेतकरी आणि शेतमजुरांची उपजीविका अवलंबून आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती बाधित झाल्यास त्याचा थेट परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. विकासाला विरोध नाही, मात्र शेतकऱ्यांचे हित अबाधित ठेवूनच विकासाचा समतोल साधला जावा, अशी स्थानिकांची भूमिका आहे.

     नागरिकांनी केंद्र सरकार आणि संबंधित रेल्वे प्रशासनाकडे प्रस्तावित मार्गाची अधिकृत अधिसूचना तातडीने जाहीर करण्याची मागणी केली आहे. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकरी, ग्रामपंचायती आणि स्थानिक नागरिकांकडून हरकती व सूचना मागवून त्यावर सविस्तर सुनावणी घेण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. प्राप्त सूचनांचा गांभीर्याने विचार करून आवश्यक ते बदल करत अंतिम मार्ग निश्चित करावा, अशी मागणीही पुढे येत आहे.

बारामती परिसरात सिंचनाची मजबूत व्यवस्था, सहकारी साखर कारखाने, दुग्ध व्यवसाय तसेच विविध कृषी प्रक्रिया उद्योग विकसित झाले आहेत. त्यामुळे येथील सुपीक शेतीचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. अनेक ठिकाणी सरकारी पडीत जमीन किंवा जिरायती क्षेत्र उपलब्ध असल्याने, बागायती जमिनींना कमी फटका बसेल असा पर्यायी मार्ग निवडण्याची शक्यता प्रशासनाने तपासावी, अशी सूचनाही करण्यात येत आहे.

     एकंदरीत, बुलेट ट्रेनसारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकल्पाचे बारामतीकरांनी स्वागत केले असले, तरी पर्यावरणाचा समतोल, सिंचन व्यवस्था, सुपीक शेती आणि शेतकऱ्यांचे दीर्घकालीन हित लक्षात घेऊनच अंतिम मार्ग निश्चित करावा, अशी स्थानिकांची स्पष्ट भूमिका आहे. विकास आणि शेती संरक्षण यांचा समतोल साधणारा निर्णय झाल्यास हा प्रकल्प बारामतीच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

राज्यात ‘पशुधन विमा योजना’ लागू; पशुपालकांना ८५ टक्क्यांपर्यंत प्रीमियम अनुदान

Latest News

राज्यात ‘पशुधन विमा योजना’ लागू; पशुपालकांना ८५ टक्क्यांपर्यंत प्रीमियम अनुदान राज्यात ‘पशुधन विमा योजना’ लागू; पशुपालकांना ८५ टक्क्यांपर्यंत प्रीमियम अनुदान
महाराष्ट्रात 'पशुधन विमा योजना' लागू. नैसर्गिक आपत्ती व रोगांमुळे पशुधन गमावणाऱ्या शेतकऱ्यांना विमा संरक्षण. विमा प्रीमियमवर ८५% शासन अनुदान.
नामांकित बांधकाम व्यावसायिकाला ८ कोटींच्या खंडणीची मागणी; १० लाखांसह त्रिकूट अटकेत
राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निर्मला नवले; पक्षाकडून मोठी जबाबदारी
संसदीय कोंडीवर तोडगा शोधण्याचे प्रयत्न; रिजिजूंची राहुल गांधीं सोबत दुसरी बैठक
जंतरमंतर आंदोलना नंतर सीजेपीमध्ये अंतर्गत कलह; अभिजित दीपकेंवर पक्ष पाताचा आरोप, मनीष ब्रह्मभट यांचा ठिय्या आंदोलन

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software