संसदीय कोंडीवर तोडगा शोधण्याचे प्रयत्न; रिजिजूंची राहुल गांधीं सोबत दुसरी बैठक

संसदेतील गतिरोध दूर करण्यासाठी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची राहुल गांधींशी सलग दुसऱ्यांदा भेट. विधेयकांवर झाली सविस्तर चर्चा.

नवी दिल्ली: संसदेच्या चालू पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात निर्माण झालेला गतिरोध दूर करण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी अवघ्या दोन दिवसांत सलग दुसऱ्यांदा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची प्रत्यक्ष भेट घेतली आहे. महत्त्वाची विधेयके संसदेत मंजूर करून घेण्यासाठी सरकारकडे पूर्ण संख्याबळ असले, तरी काँग्रेस हा देशातील मुख्य विरोधी पक्ष असल्याने सरकार सर्व विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या महत्त्वपूर्ण भेटीत विधेयकांना पाठिंबा देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली असून, ‘इंडिया’ आघाडीच्या सर्व घटक पक्षांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडली आहे.

      पावसाळी अधिवेशना दरम्यान सभागृहाच्या काम काजावरून सरकार आणि काँग्रेस पक्षामध्ये सतत तीव्र खटके उडाले आहेत. काँग्रेससह विरोधकांनी सरकारवर भ्रमाचे वातावरण तयार करून महत्त्वाच्या मुद्द्यांवरवरील चर्चेपासून पळ काढल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत उपस्थित राहून विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर द्यावे, अशी ठाम मागणी विरोधी पक्षांकडून सतत लावून धरण्यात आली आहे. या सर्व गदारोळामुळे आणि राजकीय संघर्षांमुळे संसदेचे कामकाज वारंवार विस्कळीत होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे नेहमी संसदेत उपस्थित असतात, असे सांगत त्यांनी विरोधकांच्या गदारोळावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, विरोधकांच्या रोजच्या गदारोळामुळे संसदेत कामकाज प्रभावित होत असून, याचा सर्वाधिक फटका काँग्रेसच्या नवीन खासदारांना बसत आहे, कारण गदारोळामुळे त्यांना सभागृहात आपली मते मांडण्याची संधी मिळत नाही. पंतप्रधान मोदींनी नेहमीच देशातील विद्यार्थ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी ऐतिहासिक व धाडसी निर्णय घेतले आहेत, मात्र दुर्दैवाने विरोधी पक्ष रोज सकाळी येऊन केवळ विरोध प्रदर्शन करतो.

    लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत झालेली आपली चर्चा अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडली असल्याचे किरेन रिजिजू यांनी नमूद केले. काँग्रेस आणि इतर सर्व विरोधी पक्षांशी सतत संवाद सुरू ठेवावा, हीच सरकारची प्रामाणिक इच्छा आहे. आपण सर्वजण राजकीय पातळीवर एकमेकांचे वैरी असू शकतो, परंतु आपण कोणीही एकमेकांचे शत्रू नाही, असे सांगत देश हितासाठी आणि लोकशाहीच्या बळकटी साठी सर्वानी एकत्र मिळून काम करणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या बैठकीनंतर आता संसदेतील सुरू असलेली कोंडी फुटून आगामी काळात कामकाज सुरळीत चालण्यास मदत होणार का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

राज्यात ‘पशुधन विमा योजना’ लागू; पशुपालकांना ८५ टक्क्यांपर्यंत प्रीमियम अनुदान

Latest News

राज्यात ‘पशुधन विमा योजना’ लागू; पशुपालकांना ८५ टक्क्यांपर्यंत प्रीमियम अनुदान राज्यात ‘पशुधन विमा योजना’ लागू; पशुपालकांना ८५ टक्क्यांपर्यंत प्रीमियम अनुदान
महाराष्ट्रात 'पशुधन विमा योजना' लागू. नैसर्गिक आपत्ती व रोगांमुळे पशुधन गमावणाऱ्या शेतकऱ्यांना विमा संरक्षण. विमा प्रीमियमवर ८५% शासन अनुदान.
नामांकित बांधकाम व्यावसायिकाला ८ कोटींच्या खंडणीची मागणी; १० लाखांसह त्रिकूट अटकेत
राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निर्मला नवले; पक्षाकडून मोठी जबाबदारी
संसदीय कोंडीवर तोडगा शोधण्याचे प्रयत्न; रिजिजूंची राहुल गांधीं सोबत दुसरी बैठक
जंतरमंतर आंदोलना नंतर सीजेपीमध्ये अंतर्गत कलह; अभिजित दीपकेंवर पक्ष पाताचा आरोप, मनीष ब्रह्मभट यांचा ठिय्या आंदोलन

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software