मुंबई उच्च न्यायालयात माळी-मदतनीस पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

मुंबई उच्च न्यायालयात माळी/मदतनीस पदांच्या २ जागांसाठी भरती जाहीर. ७ वी पास उमेदवारांना अर्ज करता येणार, अंतिम तारीख २० ऑगस्ट २०२६.

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयामार्फत ‘माळी/मदतनीस’ (Gardener/Helper) या पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण ०२ रिक्त जागा भरल्या जाणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २० ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करावे लागणार आहेत.

भरतीचा संक्षिप्त तपशील:

  • भरती करणारी संस्था: मुंबई उच्च न्यायालय
  • पदाचे नाव: माळी / मदतनीस
  • रिक्त जागांची संख्या: ०२ जागा
  • नोकरीचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र
  • वेतनश्रेणी: दरमहा रु. १६,६०० ते ५२,४००/-
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन
  • शैक्षणिक पात्रता: उमेदवार किमान सातवी (७ वी) उत्तीर्ण असावा.
  • वयोमर्यादा: १८ ते ३८ वर्षे (राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत नियमांनुसार सवलत असून कमाल मर्यादा ४३ वर्षे राहील).

नियुक्तीचा कालावधी व अटी:

निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती ही सुरुवातीला ठराविक कालावधीसाठी असेल. मात्र, उमेदवाराची कामगिरी आणि माननीय उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालयाच्या तत्कालीन गरजेनुसार ही नियुक्ती आणखी बारा महिन्यांच्या कालावधीसाठी वाढवली जाऊ शकते.

महत्त्वाच्या लिंक्स व तपशील:

या भरतीशी संबंधित सविस्तर माहिती, आवश्यक पात्रता, कामाचे स्वरूप, एकत्रित मानधन (शुल्क), तसेच मुलाखतीची तारीख व ठिकाण इत्यादी सर्व तपशील माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत https://bombayhighcourt.nic.in या संकेतस्थळावर १ ऑगस्ट २०२६ पासून उपलब्ध करून देण्यात आला आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख:

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले ऑफलाइन अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रेंसह निर्धारित मुदतीत म्हणजेच २० ऑगस्ट २०२६ पूर्वी सादर करणे बंधनकारक आहे. अंतिम मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, त्यामुळे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

२ कोटींच्या दंडाची भीती दाखवून १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी शिवाजीनगरच्या महिला तलाठ्यासह कोतवालावर गुन्हा दाखल

Latest News

२ कोटींच्या दंडाची भीती दाखवून १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी शिवाजीनगरच्या महिला तलाठ्यासह कोतवालावर गुन्हा दाखल २ कोटींच्या दंडाची भीती दाखवून १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी शिवाजीनगरच्या महिला तलाठ्यासह कोतवालावर गुन्हा दाखल
विशेष वृत्त/पुणे: इमारतीच्या पाया खोदकामात नियमबाह्य काम झाल्याचे सांगून दोन कोटी रुपयांचा दंड ठोकण्याची भीती दाखवत तब्बल १० लाख रुपयांच्या...
११ ऑगस्टला ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा करण्याचे बलुच संघटनांचे आवाहन; पाकिस्तानची चिंता वाढली
राज्याच्या अन्नधान्य कोट्यात कपात होणार नाही; प्रल्हाद जोशींचे मोठे आश्वासन
कर प्रणालीत मोठे बदल करण्याच्या तयारीत मोदी सरकार; परदेशी गुंतवणूकदारांना मिळणार मोठा दिलासा
अवैध मासेमारी रोखण्यासाठी महाराष्ट्र-गोवा समन्वय; नितेश राणेंचा पुढाकार

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software