राज्याच्या अन्नधान्य कोट्यात कपात होणार नाही; प्रल्हाद जोशींचे मोठे आश्वासन

राष्ट्रीय अन्न सुरक्षा सुधारणा विधेयक २०२६ बाबत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींचे राज्यसभेत स्पष्टीकरण. रेशन धान्यात कोणतीही कपात केली जाणार नाही.

नवी दिल्ली: संसदेच्या उच्चगृहात (राज्यसभा) प्रश्नोत्तराच्या तासात एका महत्त्वपूर्ण प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केले की, प्रस्तावितराष्ट्रीय अन्न सुरक्षा (सुधारणा) विधेयक, २०२६’ अंतर्गत देशातील कोणत्याही राज्याला किंवा पात्र लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणामध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही.

     या विधेयकाच्या मसुद्यावर सध्या देशातील सर्व राज्य सरकारांकडून सविस्तर अभिप्राय आणि महत्त्वाच्या सूचना मागवण्यात आल्या आहेत. या सुधारणां मागील मुख्य उद्देश स्पष्ट करताना मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, देशभरात अन्नधान्याचं योग्य आणि सुरळीत वाटप सुनिश्चित करणं, विविध लाभांच्या बाबतीत समानता प्रस्थापित करणं आणि सध्याच्या कुटुंबाधारित प्रणालीमुळे वितरणात निर्माण होणाऱ्या तफावती किंवा त्रुटी दूर करणं हा या विधेयकाचा प्रमुख हेतू आहे.

या नव्या सुधारणांमुळे सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अधिक सक्षम होईल आणि सर्व पात्र लाभार्थ्यांना हक्काचे अन्नधान्य पारदर्शक पद्धतीने मिळत राहील, असा विश्वास सरकारतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

२ कोटींच्या दंडाची भीती दाखवून १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी शिवाजीनगरच्या महिला तलाठ्यासह कोतवालावर गुन्हा दाखल

Latest News

२ कोटींच्या दंडाची भीती दाखवून १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी शिवाजीनगरच्या महिला तलाठ्यासह कोतवालावर गुन्हा दाखल २ कोटींच्या दंडाची भीती दाखवून १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी शिवाजीनगरच्या महिला तलाठ्यासह कोतवालावर गुन्हा दाखल
विशेष वृत्त/पुणे: इमारतीच्या पाया खोदकामात नियमबाह्य काम झाल्याचे सांगून दोन कोटी रुपयांचा दंड ठोकण्याची भीती दाखवत तब्बल १० लाख रुपयांच्या...
११ ऑगस्टला ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा करण्याचे बलुच संघटनांचे आवाहन; पाकिस्तानची चिंता वाढली
राज्याच्या अन्नधान्य कोट्यात कपात होणार नाही; प्रल्हाद जोशींचे मोठे आश्वासन
कर प्रणालीत मोठे बदल करण्याच्या तयारीत मोदी सरकार; परदेशी गुंतवणूकदारांना मिळणार मोठा दिलासा
अवैध मासेमारी रोखण्यासाठी महाराष्ट्र-गोवा समन्वय; नितेश राणेंचा पुढाकार

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software