भाजप महिला मोर्चा जिल्हा चिटणीसपदी सौ. सारिका शिवराज शेंडे यांची निवड

शिखर शिंगणापूरच्या माजी सरपंच सौ. सारिका शिवराज शेंडे यांची सातारा जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या चिटणीसपदी निवड.

दहिवडी: भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या सातारा जिल्हा चिटणीसपदी शिखर शिंगणापूर (ता. माण) येथील माजी सरपंच सौ. सारिका शिवराज शेंडे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ. सोनिया जयकुमार गोरे यांनी त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सातारा जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. या प्रक्रियेत माण-खटाव तालुक्यातील अनेक महिला कार्यकर्त्यांच्या पक्षासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. त्याच अनुषंगाने सौ. सारिका शेंडे यांची जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी बोलताना सौ. सोनिया गोरे म्हणाल्या की, महिला मोर्चाच्या माध्यमातून पक्षसंघटना अधिक बळकट करण्याबरोबरच महिला सक्षमीकरणाशी संबंधित शासकीय व सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने आणि एकजुटीने काम करावे.

सौ. सारिका शेंडे यांच्या निवडीमुळे शिखर शिंगणापूर परिसरासह माण तालुक्यातील भाजप महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

२ कोटींच्या दंडाची भीती दाखवून १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी शिवाजीनगरच्या महिला तलाठ्यासह कोतवालावर गुन्हा दाखल

Latest News

२ कोटींच्या दंडाची भीती दाखवून १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी शिवाजीनगरच्या महिला तलाठ्यासह कोतवालावर गुन्हा दाखल २ कोटींच्या दंडाची भीती दाखवून १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी शिवाजीनगरच्या महिला तलाठ्यासह कोतवालावर गुन्हा दाखल
विशेष वृत्त/पुणे: इमारतीच्या पाया खोदकामात नियमबाह्य काम झाल्याचे सांगून दोन कोटी रुपयांचा दंड ठोकण्याची भीती दाखवत तब्बल १० लाख रुपयांच्या...
११ ऑगस्टला ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा करण्याचे बलुच संघटनांचे आवाहन; पाकिस्तानची चिंता वाढली
राज्याच्या अन्नधान्य कोट्यात कपात होणार नाही; प्रल्हाद जोशींचे मोठे आश्वासन
कर प्रणालीत मोठे बदल करण्याच्या तयारीत मोदी सरकार; परदेशी गुंतवणूकदारांना मिळणार मोठा दिलासा
अवैध मासेमारी रोखण्यासाठी महाराष्ट्र-गोवा समन्वय; नितेश राणेंचा पुढाकार

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software