पालकमंत्र्यांच्या ‘जनसंवाद’ला मोठे यश; सांगलीत नागरिकांच्या प्रश्नांना मिळाला न्याय

सांगलीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या 'जनसंवाद' उपक्रमात नागरिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी. अनुपालन बैठकीत रजा रोखीकरणासह अनेक महत्त्वाच्या समस्यांवर तोडगा.

सांगली: सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विशेष संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘शासकीय जनसंवाद’ उपक्रमामुळे सर्वसामान्यांच्या प्रलंबित व किचकट समस्यांना गती मिळत असल्याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे. या लोक कल्याणकारी उपक्रमांतर्गत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या निवेदनांवर प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी नुकतीच एक विशेष अनुपालन सभा पार पडली. या बैठकीत बहुतांश प्रश्न यशस्वीरीत्या मार्गी लागल्याचे समोर आल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर मोठा दिलासा आणि समाधानाची भावना पाहायला मिळाली, तर अनेकांनी थेट पालकमंत्र्यांचे आभार मानले.

       गेल्या ३० जुलै रोजी पार पडलेल्या पहिल्या जनसंवाद सभेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या वैयक्तिक व सार्वजनिक अडचणी अत्यंत संवेदनशीलतेने जाणून घेतल्या होत्या. या सभेत नागरिकांकडून विविध विषयांवर सुमारे शंभर निवेदने प्राप्त झाली होती. या निवेदनांवर गेल्या आठवडाभरात संबंधित शासकीय विभागांनी केलेल्या कार्यवाहीची पडताळणी व समीक्षा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती (DPC) सभागृहात ही विशेष अनुपालन आढावा सभा आयोजित करण्यात आली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले की, शासकीय अधिकाऱ्यांनी प्राप्त प्रत्येक निवेदनाची अतिशय गांभीर्याने दखल घ्यावी आणि पूर्ण संवेदनशीलतेने व पारदर्शकतेने कार्य करावे. लोकाभिमुख दृष्टिकोन ठेवून नागरिकांचे प्रश्न त्वरित सोडविण्यास सर्वांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे, तसेच मंत्रालय स्तरावरील प्रकरणांचा आपण स्वतः वैयक्तिक पाठपुरावा करू, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.

        जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप व समाधान शेंडगे, तसेच पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या आढावा बैठकी दरम्यान उच्च शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या प्राचार्य आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रजा रोखीकरणबाबतचा गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेला महत्त्वाचा प्रश्न उच्च शिक्षण विभागाने तात्काळ कार्यवाही करत अधिकृत परिपत्रक काढून मार्गी लावला. या जलद निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त करत पालकमंत्री महोदयांचे सहर्ष आभार मानले.

      या जनसंवाद व अनुपालन सभेच्या माध्यमातून जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांनी शेतीची नुकसान भरपाई, वीज व पाणीपुरवठा, शेतीला रस्ता मिळणे, महामार्ग विषयक प्रश्न, शासकीय व अनुकंपा नोकरी, जमिनी विषयीचे वाद, अतिक्रमण हटवणे, जागेचा ताबा मिळवणे, उपसा सिंचन योजनेचे पाणी, विकास कामांसाठी निधी, विविध शासकीय दाखले, सातबारा दुरुस्ती, आर्थिक सहाय्य, अनुदान मंजुरी, वर्ग २ ची जमीन वर्ग १ करून घेणे, निवृत्तीवेतन, सिटीसर्व्हे नावनोंदणी, घरपट्टी कमी करणे, शिष्यवृत्ती, कलाकार मानधन आणि बांधकाम परवानगी यांसारखे विविध प्रश्न मांडले होते. प्रत्यक्ष पालकमंत्री आपले गाऱ्हाणे ऐकून घेत आहेत आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसह सर्व विभागांचे अधिकारी एकाच छताखाली उपलब्ध झाल्यामुळे अनेक प्रश्नांवर त्वरित कार्यवाही झाल्याचे निदर्शनास आले. एकूणच लोकाभिमुख पद्धतीने नागरिकांच्या प्रश्नांवर अल्पावधीत तोडगा निघत असल्यामुळे शासन आणि प्रशासना विषयी सर्व सामान्यांचा विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होत आहे.

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

जावळीत मतदारांची ‘सहल’; जिल्हा बँक निवडणुकीत शशिकांत शिंदेंसमोर तगडे आव्हान

Latest News

जावळीत मतदारांची ‘सहल’; जिल्हा बँक निवडणुकीत शशिकांत शिंदेंसमोर तगडे आव्हान जावळीत मतदारांची ‘सहल’; जिल्हा बँक निवडणुकीत शशिकांत शिंदेंसमोर तगडे आव्हान
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत जावळीत राजकीय पेच. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे ३२ मतदार सहलीवर; शशिकांत शिंदेंच्या अडचणीत वाढ....
ब्लिंकिटच्या गोदामात अस्वच्छता; एफडीएकडून परवाना निलंबित
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! आज तिरंगा रॅलीनिमित्त शहरातील वाहतुकीत मोठे बदल; दुपारपासून 'हे' मार्ग राहणार बंद
पिंपरी-चिंचवडमध्ये खड्ड्यांवर आयुक्तांचा दणका; ४८ तासांत बुजवण्याचे आदेश
पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; चार तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software