युसूफ पठाणसह तीन खासदारांचा एनडीएला स्पष्ट नकार; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

TMC मधून वेगळ्या झालेल्या २० खासदारांपैकी युसूफ पठाण, खलीलुर रहमान आणि अबू ताहेर खान यांचा एनडीएला पाठिंबा देण्यास नकार.

नवी दिल्ली: तृणमूल काँग्रेस पक्षापासून (TMC) वेगळे झालेल्या २० खासदारांपैकी तीन प्रमुख खासदारांनी एनडीएला (NDA) पाठिंबा देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. यामध्ये भारताचे माजी क्रिकेटपटू आणि खासदार युसूफ पठाण यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, हे तिन्ही खासदार एनडीएच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीलाही पूर्णपणे गैरहजर राहिले होते. “आम्ही भाजप किंवा एनडीएचा भाग नाही, त्यामुळे अशा बैठकीला जाण्याचा प्रश्नच येत नाही,” अशी अतिशय रोखठोक भूमिका त्यांनी मांडली आहे. या घडामोडीमुळे सध्या राष्ट्रीय राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

कोण आहेत हे तीन खासदार?

    युसूफ पठाण यांच्यासह एनडीएच्या बैठकीकडे पाठ फिरवणाऱ्या या तीन खासदारांमध्ये पश्चिम बंगालमधील जंगीपूरचे खासदार खलीलुर रहमान आणि मुर्शिदाबादचे खासदार अबू ताहेर खान यांचा समावेश आहे. हे सर्वजण २१ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या एनडीए संसदीय पक्षाच्या पहिल्या ‘मंगल मिलन’ बैठकीला उपस्थित राहिले नव्हते.

    याबाबत माध्यमांशी बोलताना खासदार अबू ताहेर खान यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “आम्ही एनडीएचा भाग नाही आणि आम्ही अधिकृतपणे भाजप मध्येही प्रवेश केलेला नाही. त्यामुळे या बैठकीला जाण्याचा आमचा कोई प्रश्नच नव्हता.” मात्र, दुसरीकडे मतदार संघाच्या विकासासाठी विरोधी पक्षनेते किंवा नेत्यांनी बोलावलेल्या प्रशासकीय बैठकीला आपण उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, मुस्लिम समाजाच्या हिता विरोधातील कोणत्याही निर्णयाला आपण कधीही पाठिंबा देणार नाही, अशी ठाम भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.

राजकीय विश्लेषकांच्या मते, हे तिन्ही खासदार अत्यंत संवेदनशील आणि मुस्लिमबहुल मतदार संघांचे प्रतिनिधित्व करतात. अशा परिस्थितीत भाजप किंवा एनडीएफ़ी वाढणाऱ्या कथित जवळीकीमुळे स्थानिक पातळीवर आणि त्यांच्या मतदार संघात मोठी नाराजी पसरण्याची दाट शक्यता होती. हीचद़ृष्टी डोळ्यासमोर ठेवून या खासदारांनी एनडीएपासून सुरक्षित अंतर राखण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दुसरीकडे, लोकसभेत या नव्या गटाला अधिकृत मान्यता मिळण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे. पक्षांतर विरोधी कायद्याच्या नियमांनुसार या गटाला कायदेशीर संरक्षण मिळण्यासाठी आवश्यक त्या संख्याबळाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा मानला जात असल्याने, या बंडू किंवा वेगळ्या झालेल्या खासदारांची भूमिका आगामी काळात खूप महत्त्वाची ठरणार आहे.

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

महिलांच्या गळ्यातील दागिने लुटणारा सराईत अटकेत; ७ गुन्हे उघडकीस

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software