शिंदेंनंतर आता सुनेत्रा पवारांचाही मंत्र्यांना दणका

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महायुती सरकारच्या मंत्र्यांचा कारभार रडारवर घेतला आहे. सर्व मंत्र्यांकडून ६ महिन्यांचा प्रोग्रेस रिपोर्ट मागवला.

मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही राज्यातील मंत्र्यांच्या कारभारावर पकड घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या कामकाजाचा थेट आढावा घेत सुनेत्रा पवार यांनी सर्व मंत्र्यांकडून गेल्या सहा महिन्यांत झालेल्या कामांचा सविस्तर अहवाल मागवला आहे. या अचानक सुरू झालेल्या आढावा सत्रामुळे मंत्र्यांच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आता सर्वच विभागांच्या मंत्र्यांना आपल्या कामकाजाचा आणि निर्णयांचा अधिकृत हिशोब सादर करावा लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केवळ कागदावर आखलेल्या योजना आणि फायलींमधील प्रगतीपेक्षा प्रत्यक्ष जमिनीवर (Ground Level) किती कामे पूर्ण झाली आणि त्यांचा सामान्य नागरिकांना किती फायदा झाला, यावर सुनेत्रा पवार यांचा विशेष भर असणार आहे. सर्वसामान्य जनतेला थेट दिसणाऱ्या विकासकामांचा आणि राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा सखोल आढावा या अहवालांच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी आणि कामांना गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात असून, यामुळे संबंधित सर्वच मंत्र्यांमध्ये या विषयावर जोरदार चर्चा रंगली आहे.

या संपूर्ण आढावा सत्रात सध्या विशेषतः शिक्षण खातं सुनेत्रा पवार यांच्या मुख्य रडारवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सुनेत्रा पवार यांनी सर्वच मंत्र्यांना कामाबाबत अत्यंत स्पष्ट आणि कडक सूचना दिल्या आहेत. केवळ अहवालात आकडेवारी दाखवून चालणार नाही, तर प्रत्यक्ष धरावर आणि जनतेमध्ये दिसणाऱ्या कामगिरीचा ठोस हिशोब द्यावा लागेल, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे. यामुळे येत्या काळात मंत्र्यांच्या कामगिरीचे मोजमाप अधिक कडक होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

मुंबई उपनगरातील विकास कामांना वेग; आशिष शेलारांचे प्रशासनाला निर्देश

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software